शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

काळोखात होत होती वाळूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:28 IST

शहरालगत वाहनारी वर्धा नदी सध्या ठणठण कोरडी झाली असून याच संधीचे सोने सध्या वाळू माफिया करीत आहे. वर्धा नदीच्या गुंजखेडा घाटातून अवैधपणे वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच बगळ्याची भूमिका घेणारे खनिकर्म विभाग जागे झाले.

ठळक मुद्देगुंजखेडा येथील प्रकार : खनिकर्म विभागाने दोन मालवाहू वाहने केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरालगत वाहनारी वर्धा नदी सध्या ठणठण कोरडी झाली असून याच संधीचे सोने सध्या वाळू माफिया करीत आहे. वर्धा नदीच्या गुंजखेडा घाटातून अवैधपणे वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच बगळ्याची भूमिका घेणारे खनिकर्म विभाग जागे झाले. शिवाय त्यांच्याकडून छापा टाकून वाळूची तस्करी करणारे दोन मालवाहू जप्त करण्यात आले आहे.केंद्रीय दारूगोळा भांडाराची पाणी पुरवठा यंत्रणा याच परिसरात आहे. त्यामुळेच येथील वाळू घाटाचा लिलाव यंदाही झालेला नाही. मोठ्या प्रमाणात या परिसरात वाळू असून नदीही कोरडी झाल्याची संधी साधून वाळू माफियांकडून संधीचे सोनच केले जात आहे. अवैध वाळू तस्करीला आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभाग, खनिकर्म विभाग, पोलीस विभाग यांची आहे. परंतु, तेही बगळ्याची भूमिका घेत असल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. सूर्य मावळतीला गेल्यानंतर सर्वत्र काळोख पसताच हे वाळू माफिया मनमर्जीने वाळूची चोरी करून त्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच जिल्हा खनिकर्म विभागाच्या चमुने छापा टाकून वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले. शिवाय पंचनामा करण्यासाठी पुलगाव येथील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व पटवारी यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३२ ए.एस. ५०२ व ट्राली क्रमांक एम.एच. ३२ ए. ९४६५ ही वाहने जप्त केली आहे. शिवाय गुंजखेडा बाटा नजिक हनुमान मंदीराजवळ अंदाजे १५ ते २० ब्रांस वाळूसाठ्या बाबत मौका पंचनामा, कुलुभनगर येथील नवीन वसाहत जवळ वेगवेगळ्या ठिकाणी मिळून जवळपास २०० ब्रांस वाळू, ले-आऊटचे दक्षिण भागात अंदाजे १०० ब्रांस अशोक राहिले यांचे घराचे पूर्व व पश्चिम बाजू प्रत्येकी अंदाजे १०० ब्रांस व २० ब्रांस असा एकूण ५२० ब्रास वाळू बाबत मोका पंचनामा, याच परिसरातील जोशी फ्रॉट परिसरातील नगराळे यांचे घराजवळील अंदाजे ५ ब्रॉस, फुलझेले यांचे घराजवळील अंदाजे ५ व १० ब्रांस, चर्च जवळील अंदाजे २० ब्रांस, माहूरे कॉन्व्हेंट जवळील अंदाजे १६ ब्रांस वाळू बाबत मौका पंचनामा स्थानीय पुनम व पॅलेस मंगल कार्यालय पार्कींग परिसरातील ४०० ब्रांस वाळू साठ्याबाबतचा मौका पंचनामाकरून कार्यवाहीचा अहवाल ्रसादर करण्याच्या सूचना जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्याचे पथक तयार केले आहे. या पथकाव्दारे सर्वत्र तपासणी करण्यात येणार असल्याने वाळू घेताना नागरिकांची त्याची पावती स्वत: कडे ठेवावी. जर पावती नसेल व घरासमोर वाळूसाठा दिसून आला तर तो जप्त करुन साठेदारावर कारवाई केली जाईल.- डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

टॅग्स :sandवाळू