शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी, आष्टी व वर्धा तालुक्यात धुव्वाधार

By admin | Updated: July 23, 2014 23:44 IST

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले़ नदी, नाल्यांना पूर असून घरांत पाणी शिरले़ अप्पर वर्धा प्रकल्पाने जलस्तर गाठला़ निम्न वर्धाचे ३१ गेट १ मीटरने उघडले

जिल्ह्यात २४ तासांत अतिवृष्टी : २ हजार १७२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान; ३३५ गावांना फटकावर्धा : पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले़ नदी, नाल्यांना पूर असून घरांत पाणी शिरले़ अप्पर वर्धा प्रकल्पाने जलस्तर गाठला़ निम्न वर्धाचे ३१ गेट १ मीटरने उघडले असून अप्पर वर्धा १०० टक्के भरले़ यामुळे बुडित क्षेत्रातील ३७ तर निम्न वर्धांतर्गत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला़ जिल्ह्यात ३३५ गावांतील १६४२ घरांची पडझड झाली़ यात ६ हजार ५५३ व्यक्ती बाधित झाले़अतिवृष्टीमुळे कारंजा व आर्वी तालुक्यातील नदी व नाल्यांच्या काठावरील घरांत पाणी शिरले़ आर्वी ते तळेगाव तसेच अमरावती मार्गावरील नाल्याला पूर आल्याने काही काळ वाहतूक बंद होती. जिल्ह्यात २४ तासांत १५५.१५ मिमी पावसाची नोंद झाली़ वर्धा व आष्टी तालुक्यात २०० मिमी पाऊस पडला़ जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, नाले ओसंडून वाहत आहे़ आर्वी तालुक्यात नांदोरा, शिरपूर व जळगाव येथील नाल्याच्या काठावर असलेल्या घरांत पाणी शिरले़ कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा, बोटोना, पारधी, चिचोली, सावरवाडी, वाघेडा आदी गावांतील नाल्याच्या काठावरील ५० घरांत पाणी शिरले़ शिवाय तालुक्यातील १९३ घरांची अंशत: पडझड झाली़ यात कारंजा मंडळात ५६, सारवाडी ४९, ठाणेगाव ३३, कन्नमवारग्राम ४५ घरांची पडझड झाली़ यात ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ ६८ गावांतील शेतपिकांनाही फटका बसला़ बांध फुटल्याने शेती खरडून निघाली़ सततच्या पावसामुळे वर्धा, यशोदा, वणा, पोथरा, लाल नाला आदींसह नाले फुगले आहेत़ देवळी तालुक्यातील बोरगाव-आलोडा, सरूळ-वायगाव, देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा नदीच्या पुरामुळे दुपारपर्यंत बंद होती. लालनाला धरणाचे पाच दरवाजे उघडले असून पोथरा धरण ओव्हरफ्लो आहे़ वाघाडी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वर्धा-समुद्रपूर मार्ग सकाळी ४ तास बंद होता. मार्डा येथे नाल्याच्या पुरामुळे १० घरातील पारधी लोकांना प्राथमिक शाळेत हलविण्याची तयारी केली होती; पण पावसाने उसंत घेतल्याने प्रक्रिया थांबविण्यात आली़ डोंगरगाव, आसोला, कोरा परिसरातील काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अतिवृष्टीने चारमंडळच्या ५० घरांचे अंशत: नुकसान झाले. अंतरगाव, घोरपड, चापापूर, वानरचुआ, सावंगी, लोखंडी, वाघेडा, सायगव्हान, धोंडगाव, समुद्रपूर, वायगाव (ह.), रेणकापूर, निंभा, बोडखा, मुरादपूर, पाइकमारी आदी गावांतील ४३ घरांचे नुकसान झाले. सेलू तालुक्यात केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले़(लोकमत न्यूज नेटवर्क)