शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ताबा न घेताच वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:45 IST

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील आठ वाळू घाटांचा ई-लिलाव करण्यात आला. लिलाव झाल्यावर घाटधारकांनी तहसीलदारांकडून ताबा घेतल्यानंतरच वाळू उपसा करणे बंधनकारक आहे. परंतु वाळू माफीयांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी ताबा घेण्यापूर्वीच विना रॉयल्टी वाळू उपसा सुरु केला आहे.

ठळक मुद्देविनारॉयल्टी वाहतूक : काही ठिकाणी लागल्या मशीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील आठ वाळू घाटांचा ई-लिलाव करण्यात आला. लिलाव झाल्यावर घाटधारकांनी तहसीलदारांकडून ताबा घेतल्यानंतरच वाळू उपसा करणे बंधनकारक आहे. परंतु वाळू माफीयांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी ताबा घेण्यापूर्वीच विना रॉयल्टी वाळू उपसा सुरु केला आहे. यासोबतच नियमबाह्यरित्या वाळू काढण्यासाठी मशिनीही लावण्यात आल्या आहे. या घाटधारकांनी सुरुवातीलाच शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार अवलंबिल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी वाळू घाटांचा लिलाव न झाल्यामुळे जिल्ह्यातील बहूतांश नद्या आणि नाल्यांना लक्ष करुन अवैधरित्या राजरोसपणे वाळू उपसा चालविला. रात्रीच्या अंधाराचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात आहे. घाटाचा लिलाव न झाल्याने चोरीची वाळू दामदुप्पट विकली जात होती. आताही स्पर्धेमुळे वाळूचे दर कमी झाले असून चोरी काही थांबली नाही.यावर्षी जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात इस्मालपूर, सोनेगाव (रिठ), नांदगाव (बोरगाव), पारडी (नगाजी), धोची, शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव-२ या आठ घाटांचा ई-लिलाव केला. या घाटांच्या लिलावातून शासनाला ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५० रुपयाचा महसूल प्राप्त झाला.सर्वात जास्त बोली धोची आणि मांडगाव याच घाटाची लागली असून हे दोन्ही वाळूघाट कोटीच्या पार गेले आहे. लिलाव प्रक्रिया पार पडल्यावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक तहसीलदारांकडून घाटाचा ताबा घ्यावा आणि त्यानंतरच घाटातून वाळू उपसा करावा, अशी नियमावली आहे. ताबा घेतल्यानंतर लिलावादरम्यान घाटात निर्देशीत केलेला वाळूसाठा उपसण्याची परवानगी दिली जाते. पंरतु लिलावात नमुद केलेल्या साठ्यापेक्षा जास्त वाळू काढता यावी म्हणून घाटधारकांनी ताबा घेण्यापूर्वीच उपसा सुरु केला आहे. त्यासाठी चक्क पोकलँड मशिनचाही वापर होत असल्याची स्थानिकांंकडून ओरड होत आहे.लिलाव झालेल्या आठ वाळू घाटांपैकी नांदगाव (बोरगांव), शिवणी, धोची व सोनेगाव (रिठ) या चारच घाटधारकांनी तहसीलदारांकडून रितसर ताबा घेतला असून बाकींनी अद्यापही ताबा न घेता विना रॉयल्टीने वाळुची वाहतूक चालविली आहे. जिल्ह्यातील इतरही वाळू घाटातून दिवसरात्र अवैधरित्या वाळू उपसा सुरु असून महसूल व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला कोट्यवधी रुपयाचा चुना लागत आहे. यात सर्वसामान्यांसह वाळू घाट असलेल्या गावकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाकडून कारवाईकडे कानाडोळा केल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.लिलाव होण्यापूर्वीपासून घाटातून वाळू चोरीलिलाव एकाच्या नावावर असला तरी प्रत्यक्ष त्या घाटात चार ते पाच जण साथिदार आहेत. ज्या घाटाचे लिलाव करण्यात आले त्यापैकी बहुतांश घाटातून लिलावापुर्वीपासूनच वाळू उपसा सुरु असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.आताही लिलाव झाल्यावरही अनेकांनी जिल्हा खनिकर्म कार्यालयातून रॉयल्टी बुक न घेता अवैधरित्या विना रॉयल्टी वाहतूक सुरु केली आहे. त्यामुळे शासनाच्या महसूल बुडविण्याचे काम जोमात सुरु असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याची गरज आहे.लिलावानंतर तहसीलदारांकडून घाटधारंकानी रितसर घाटाचा ताबा घेणे बंधनकारक आहे. ताबा घेतल्याशिवाय वाळूचा उपसा करता येत नाही. सोबतच वाहतूक करण्यासाठी रॉयल्टी बुकही दिले जाते. आणि एसएमएस प्रणालीही कार्यान्वीत करण्यात आली आहे. आजपर्यंतच चार घाटांनी ताबा घेतला असून ज्यांनी ताबा न घेता वाळूची उचल केली असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.डॉ. इम्रान खान, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

टॅग्स :sandवाळू