शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

ताबा न घेताच वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:45 IST

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील आठ वाळू घाटांचा ई-लिलाव करण्यात आला. लिलाव झाल्यावर घाटधारकांनी तहसीलदारांकडून ताबा घेतल्यानंतरच वाळू उपसा करणे बंधनकारक आहे. परंतु वाळू माफीयांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी ताबा घेण्यापूर्वीच विना रॉयल्टी वाळू उपसा सुरु केला आहे.

ठळक मुद्देविनारॉयल्टी वाहतूक : काही ठिकाणी लागल्या मशीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील आठ वाळू घाटांचा ई-लिलाव करण्यात आला. लिलाव झाल्यावर घाटधारकांनी तहसीलदारांकडून ताबा घेतल्यानंतरच वाळू उपसा करणे बंधनकारक आहे. परंतु वाळू माफीयांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी ताबा घेण्यापूर्वीच विना रॉयल्टी वाळू उपसा सुरु केला आहे. यासोबतच नियमबाह्यरित्या वाळू काढण्यासाठी मशिनीही लावण्यात आल्या आहे. या घाटधारकांनी सुरुवातीलाच शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार अवलंबिल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी वाळू घाटांचा लिलाव न झाल्यामुळे जिल्ह्यातील बहूतांश नद्या आणि नाल्यांना लक्ष करुन अवैधरित्या राजरोसपणे वाळू उपसा चालविला. रात्रीच्या अंधाराचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात आहे. घाटाचा लिलाव न झाल्याने चोरीची वाळू दामदुप्पट विकली जात होती. आताही स्पर्धेमुळे वाळूचे दर कमी झाले असून चोरी काही थांबली नाही.यावर्षी जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात इस्मालपूर, सोनेगाव (रिठ), नांदगाव (बोरगाव), पारडी (नगाजी), धोची, शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव-२ या आठ घाटांचा ई-लिलाव केला. या घाटांच्या लिलावातून शासनाला ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५० रुपयाचा महसूल प्राप्त झाला.सर्वात जास्त बोली धोची आणि मांडगाव याच घाटाची लागली असून हे दोन्ही वाळूघाट कोटीच्या पार गेले आहे. लिलाव प्रक्रिया पार पडल्यावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक तहसीलदारांकडून घाटाचा ताबा घ्यावा आणि त्यानंतरच घाटातून वाळू उपसा करावा, अशी नियमावली आहे. ताबा घेतल्यानंतर लिलावादरम्यान घाटात निर्देशीत केलेला वाळूसाठा उपसण्याची परवानगी दिली जाते. पंरतु लिलावात नमुद केलेल्या साठ्यापेक्षा जास्त वाळू काढता यावी म्हणून घाटधारकांनी ताबा घेण्यापूर्वीच उपसा सुरु केला आहे. त्यासाठी चक्क पोकलँड मशिनचाही वापर होत असल्याची स्थानिकांंकडून ओरड होत आहे.लिलाव झालेल्या आठ वाळू घाटांपैकी नांदगाव (बोरगांव), शिवणी, धोची व सोनेगाव (रिठ) या चारच घाटधारकांनी तहसीलदारांकडून रितसर ताबा घेतला असून बाकींनी अद्यापही ताबा न घेता विना रॉयल्टीने वाळुची वाहतूक चालविली आहे. जिल्ह्यातील इतरही वाळू घाटातून दिवसरात्र अवैधरित्या वाळू उपसा सुरु असून महसूल व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला कोट्यवधी रुपयाचा चुना लागत आहे. यात सर्वसामान्यांसह वाळू घाट असलेल्या गावकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाकडून कारवाईकडे कानाडोळा केल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.लिलाव होण्यापूर्वीपासून घाटातून वाळू चोरीलिलाव एकाच्या नावावर असला तरी प्रत्यक्ष त्या घाटात चार ते पाच जण साथिदार आहेत. ज्या घाटाचे लिलाव करण्यात आले त्यापैकी बहुतांश घाटातून लिलावापुर्वीपासूनच वाळू उपसा सुरु असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.आताही लिलाव झाल्यावरही अनेकांनी जिल्हा खनिकर्म कार्यालयातून रॉयल्टी बुक न घेता अवैधरित्या विना रॉयल्टी वाहतूक सुरु केली आहे. त्यामुळे शासनाच्या महसूल बुडविण्याचे काम जोमात सुरु असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याची गरज आहे.लिलावानंतर तहसीलदारांकडून घाटधारंकानी रितसर घाटाचा ताबा घेणे बंधनकारक आहे. ताबा घेतल्याशिवाय वाळूचा उपसा करता येत नाही. सोबतच वाहतूक करण्यासाठी रॉयल्टी बुकही दिले जाते. आणि एसएमएस प्रणालीही कार्यान्वीत करण्यात आली आहे. आजपर्यंतच चार घाटांनी ताबा घेतला असून ज्यांनी ताबा न घेता वाळूची उचल केली असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.डॉ. इम्रान खान, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

टॅग्स :sandवाळू