शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

ताबा न घेताच वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:45 IST

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील आठ वाळू घाटांचा ई-लिलाव करण्यात आला. लिलाव झाल्यावर घाटधारकांनी तहसीलदारांकडून ताबा घेतल्यानंतरच वाळू उपसा करणे बंधनकारक आहे. परंतु वाळू माफीयांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी ताबा घेण्यापूर्वीच विना रॉयल्टी वाळू उपसा सुरु केला आहे.

ठळक मुद्देविनारॉयल्टी वाहतूक : काही ठिकाणी लागल्या मशीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील आठ वाळू घाटांचा ई-लिलाव करण्यात आला. लिलाव झाल्यावर घाटधारकांनी तहसीलदारांकडून ताबा घेतल्यानंतरच वाळू उपसा करणे बंधनकारक आहे. परंतु वाळू माफीयांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी ताबा घेण्यापूर्वीच विना रॉयल्टी वाळू उपसा सुरु केला आहे. यासोबतच नियमबाह्यरित्या वाळू काढण्यासाठी मशिनीही लावण्यात आल्या आहे. या घाटधारकांनी सुरुवातीलाच शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार अवलंबिल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी वाळू घाटांचा लिलाव न झाल्यामुळे जिल्ह्यातील बहूतांश नद्या आणि नाल्यांना लक्ष करुन अवैधरित्या राजरोसपणे वाळू उपसा चालविला. रात्रीच्या अंधाराचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात आहे. घाटाचा लिलाव न झाल्याने चोरीची वाळू दामदुप्पट विकली जात होती. आताही स्पर्धेमुळे वाळूचे दर कमी झाले असून चोरी काही थांबली नाही.यावर्षी जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात इस्मालपूर, सोनेगाव (रिठ), नांदगाव (बोरगाव), पारडी (नगाजी), धोची, शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव-२ या आठ घाटांचा ई-लिलाव केला. या घाटांच्या लिलावातून शासनाला ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५० रुपयाचा महसूल प्राप्त झाला.सर्वात जास्त बोली धोची आणि मांडगाव याच घाटाची लागली असून हे दोन्ही वाळूघाट कोटीच्या पार गेले आहे. लिलाव प्रक्रिया पार पडल्यावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक तहसीलदारांकडून घाटाचा ताबा घ्यावा आणि त्यानंतरच घाटातून वाळू उपसा करावा, अशी नियमावली आहे. ताबा घेतल्यानंतर लिलावादरम्यान घाटात निर्देशीत केलेला वाळूसाठा उपसण्याची परवानगी दिली जाते. पंरतु लिलावात नमुद केलेल्या साठ्यापेक्षा जास्त वाळू काढता यावी म्हणून घाटधारकांनी ताबा घेण्यापूर्वीच उपसा सुरु केला आहे. त्यासाठी चक्क पोकलँड मशिनचाही वापर होत असल्याची स्थानिकांंकडून ओरड होत आहे.लिलाव झालेल्या आठ वाळू घाटांपैकी नांदगाव (बोरगांव), शिवणी, धोची व सोनेगाव (रिठ) या चारच घाटधारकांनी तहसीलदारांकडून रितसर ताबा घेतला असून बाकींनी अद्यापही ताबा न घेता विना रॉयल्टीने वाळुची वाहतूक चालविली आहे. जिल्ह्यातील इतरही वाळू घाटातून दिवसरात्र अवैधरित्या वाळू उपसा सुरु असून महसूल व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला कोट्यवधी रुपयाचा चुना लागत आहे. यात सर्वसामान्यांसह वाळू घाट असलेल्या गावकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाकडून कारवाईकडे कानाडोळा केल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.लिलाव होण्यापूर्वीपासून घाटातून वाळू चोरीलिलाव एकाच्या नावावर असला तरी प्रत्यक्ष त्या घाटात चार ते पाच जण साथिदार आहेत. ज्या घाटाचे लिलाव करण्यात आले त्यापैकी बहुतांश घाटातून लिलावापुर्वीपासूनच वाळू उपसा सुरु असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.आताही लिलाव झाल्यावरही अनेकांनी जिल्हा खनिकर्म कार्यालयातून रॉयल्टी बुक न घेता अवैधरित्या विना रॉयल्टी वाहतूक सुरु केली आहे. त्यामुळे शासनाच्या महसूल बुडविण्याचे काम जोमात सुरु असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याची गरज आहे.लिलावानंतर तहसीलदारांकडून घाटधारंकानी रितसर घाटाचा ताबा घेणे बंधनकारक आहे. ताबा घेतल्याशिवाय वाळूचा उपसा करता येत नाही. सोबतच वाहतूक करण्यासाठी रॉयल्टी बुकही दिले जाते. आणि एसएमएस प्रणालीही कार्यान्वीत करण्यात आली आहे. आजपर्यंतच चार घाटांनी ताबा घेतला असून ज्यांनी ताबा न घेता वाळूची उचल केली असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.डॉ. इम्रान खान, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

टॅग्स :sandवाळू