शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावांत मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून कृषी पंपांचा वापर होतो. यात शेतकऱ्यांना मोठ्या वीज देयकाचा सामना करावा लागतो. यातून शेतकऱ्यांची सुटका होण्याकरिता शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ही योजना राबविण्याची जबाबदारी खासगी संस्थेसह महावितरणला देण्यात आली आहे. आर्वी विभागातील सहा गावांत ही ...

ठळक मुद्देमहावितरणचे काम सुरू : शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून कृषी पंपांचा वापर होतो. यात शेतकऱ्यांना मोठ्या वीज देयकाचा सामना करावा लागतो. यातून शेतकऱ्यांची सुटका होण्याकरिता शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ही योजना राबविण्याची जबाबदारी खासगी संस्थेसह महावितरणला देण्यात आली आहे. आर्वी विभागातील सहा गावांत ही योजना कार्यान्वीत होणार आहे.आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून शासन दरबारी नोंद असलेल्या वर्धेत शेतकऱ्यांच्या उत्थानाकरिता अनेक योजना राबविण्यात येत आहे. पण अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे योजना कुचकामी ठरत असल्याने आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. झालेल्या आत्महत्या सिंचनाच्या अत्यल्प प्रमाणामुळे होत असल्याचे कारण पुढे आल्याने कोरडवाहू असलेल्या या वर्धा जिल्ह्यात सिंचनाची सोय वाढविण्यात येत आहे. याच सिंचनाकरिता शासनाच्यावतीने विहिरी असलेल्या शेतकऱ्यांना कृषी पंप देण्यात आले आहे. मात्र त्याचा वापर करताना येत असलेल्या देयकाचा भार आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अधिक झाल्याने त्यांना दिलासा देण्याकरिता मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यात महावितरणच्यावतीने आंजी, खरांगणा, विजयगोपाल, कारंजा, साहूर आणि पिंपळखुटा या गावांत ही वाहिनी सुरू होत आहे. तर काही गावांत खासगी संस्थेमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील या गावांत योजनेचे काम सुरू झाले आहे. आंजी येथे महावितरणच्या सबस्टेशनच्या शेजारी असलेल्या रिकाम्या जागेवर ही योजना सुरू करण्यात येत आहे. आंजीत योजनेच्या अंमलबजावणीकरिता सौर पॅनल लावण्याचे काम सुरू आहे. योजना पूर्णत्त्वास येताच या भागातील शेतकऱ्यांना दिवसाला १२ तास विज देणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त विजभाराच्या भुर्दंडापासून बचाव होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.शेतकऱ्यांना वेगळ्या फिडरवरून जोडणीजिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडून कृषी पंपाची मागणी करण्यात आली आहे. या मागणीपोटी आज स्थितीत ३,२३१ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहे. शासनाच्या नव्या धोरणामुळे प्रतीक्षा यादीत असलेल्या शेतकऱ्यांना उच्च दाब वितरण प्रणालीतून जोडणी देण्यात येणार आहे. याकरिता दोन शेतकरी मिळून एक फिडर राहणार आहे.या नव्या जोडणीनुसार २०१६-१७ मध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या ८२६ शेतकºयांना प्रथम लाभ मिळणार आहे. यातही प्रारंभी ४७५ शेतकऱ्यांची लॉटरी लागणार आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात २०१५-१६ मधील २२ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. २०१७-१८ मध्ये २ हजार १२४ आणि २०१८-१९ मध्ये आतापर्यंत २५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्वच शेतकºयांना शासनाने दिलेल्या सुचनेनुसार नव्या योजनेत जोडणी मिळणार आहे.शासनाकडून सर्वेक्षण सुरूया योजनेच्या अंमलबजावणीकरिता शासनाच्यावतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. हा सर्व्हे झाल्यानंतर योजनेच्या अंमलाकरिता लागणारा निधी मिळणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.नव्या पद्धतीमुळे वीज गळतीला ब्रेकआतापर्यंत शेतकऱ्यांना दूर पर्यंत तारा टाकून कृषी पंपांना जोडणी दिल्या जात होती. यात अंतर अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात वीज गळती होत होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. नव्याने राबविण्यात येत असलेल्या एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम) मुळे या प्रकाराला आळा बसेल आणि अपघातही कमी होतील. शेतकऱ्यांच्या कृषी पंपात काही बिघाड आल्यास थेट सबस्टेशनवरून त्या पंपाचा पुरवठा बंद होणार असल्याने विजेच्या धक्क्याचे प्रमाण कमी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.शासनाने शेतकऱ्यांना वाढत असलेल्या देयकांपासून मुक्ती देण्याकरिता नव्या योजना अंमलात आणल्या आहेत. यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना आहे. ती महावितरणच्यावतीने जिल्ह्यातील सहा गावांत कार्यान्वीत होणार आहे. तर शेतकऱ्यांना योग्य वीज पुरवठा मिळावा याकरिता एचव्हीडीएस योजना कार्यान्वीत केली आहे. या दोन्ही योजना अल्पावधीत जिल्ह्यात सुरू होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता,महावितरण वर्धा.