शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

आष्टीतील सहा मोठ्या पुलांनी गाठली शंभरी

By admin | Updated: August 5, 2016 02:10 IST

१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शहिदभूमीतील सहा मोठ्या पुलांनी शंभरी गाठली आहे,

राज्यमार्गच जीवघेणा : सातत्याने दुर्लक्ष अमोल सोटे आष्टी (शहीद) १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शहिदभूमीतील सहा मोठ्या पुलांनी शंभरी गाठली आहे, तर लहान २४ पूल अखेरच्या घटका मोजत आहे. केंद्र तथा राज्य शासन याकडे गांभीर्याने घेताना दिसत नाही. एखादी घटना घडल्यास प्रशासन थातुरमातूर उपाययोजना करून मोकळे होते. त्यामुळे सामान्यांच्या जीविताशी खेळ मांडला जात असल्याचे बोलल्या जात आहे. नागपूर-अमरावती या राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर वर्धा-अमरावती जिल्ह्याची सिमा म्हणून जोडलेल्या खडका पुलाची वयोमर्यादा संपली आहे. पाच वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात आले होते. यावेळी जुना पूल कायम ठेवून दुसऱ्या बाजुने नवीन पूल बांधण्यात आला. त्यामुळे एका बाजुची वाहतूक जुन्याच पुलावरून होत आहे. कुठल्याही क्षणी येथे दुर्घटना घडू शकते. वर्धा नदीच्या पात्रात अवाढव्य जागेत हा महाकाय पूल आपली वयोमर्यादा पूर्ण करून चुकला आहे. आष्टी-साहुर-द्रुगवाडा राज्यमार्ग २४४ वर द्रुगवाडा गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रातील पूल वर्धा-अमरावती जिल्ह्याची सीमा जोडतो. वरूड, मध्यप्रदेश, मुलताई, बैतुलकडे ये-जा करणारी शेकडो वाहने दिवसरात्र बिनधास्तपणे धावत आहे. या पुलाला १२५ वर्षे पूर्ण झाली आहे. कुठल्याही क्षणी हा पूल कोसळण्याचा धोका आहे. मध्यप्रदेश शासनाने महाराष्ट्र सरकारला यासंदर्भात दोनदा पत्रव्यवहार केला आहे. पण राज्यशासन दखल घ्यायला तयार नाही. पूल वाहतुकीकरिता सक्षम असल्याचा शेरा देवून शासन जबाबदारीतून मोकळे झाले आहे. आष्टी-मोर्शी रस्त्यावर अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य गेटसमोरील पूलही मुदतबाह्य झाला आहे. १९४० साली या पुलाचे काम करण्यात आले होते. वर्धा-अमरावती जिल्ह्याला जोडणारा हा पूल बारमाही धरणाच्या पाण्यात असल्यामुळे क्षतीग्रस्त झाला आहे. दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक आणि धरणाचे दरवाजे उघडल्यावर पाण्याचा आनंद लुटण्यासाठी येणारे हजारो पर्यटक याच पुलावर उभे राहतात. अप्पर वर्धा धरण विभागाने पुलाची दुरूस्ती केलेली नाही. या पुलाशेजारी पर्यायी दुसरा पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभाग वेळकाढू धोरण ठेवत आहे. आष्टी-परसोडा मार्गावर लेंडी नदीवरील पुलानेही वयोमर्यादा पार केली आहे. जीर्ण झालेल्या पुलावरून प्रवासी वाहतूक करीत आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहून वाहतूक ठप्प होते. येथे नवीन पूल तात्काळ बांधण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. याच मार्गावर आणखी दुसरा पूल परसोडा गावाच्या अलीकडे आहे. दोन्ही बाजूला उंच भाग असल्याने पूल खोलात भागात आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक प्रभावित होते. आष्टी-साहुर रस्त्यावर धाडी गावाच्या अलीकडे जामचा पूल आहे. या पुलाची वयोमर्यादाही संपली आहे. २४ छोटे पूल धोक्याचे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेले आष्टी तालुक्यातील २४ लहान पूल नव्या बांधकामाच्या प्रतिक्षेत आहे. निधी नसल्याच्या कारणावरून बांधकामाकडे सतत चालढकल केली जात आहे. या पुलांवरून पाणी वाहत असल्याने पावसाळ्यात वाहतूक प्रभावित होते. पुलावरून पाणी उतरेपर्यंत वाट पाहावी लागते. या २४ लहान पुलांमध्ये - तळेगाव-आष्टी रस्त्यावर ३ पूल, आष्टी-साहूर रस्त्यावर ३, आष्टी-थार रस्त्यावर ४, आष्टी-परसोडा मार्गावर ३, चिस्तूर-भारसवाडा-खडकी मार्गावर ४, खडकी-खंबीत बेलोरा- ४, साहूर-माणिकवाडा मार्गावर २ तर साहूर-वडाळा मार्गावरील एका पुलांची वयोमर्यादा संपली आहे.