शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

भरउन्हात बसफेऱ्यांअभावी प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:37 IST

जीवाची लाहीलाही करणारे ऊन, लग्नसराईचा हंगाम, एसटी बसेसचा अभाव, अनेक रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटत नसल्याने तासनतास ताटकळत राहणारे प्रवासी एखादी बस आली की जीवाच्या आकांताने बसकडे धाव घेतल्याचे चित्र बसस्थानकावर पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देपुलगाव आगाराचे नियोजन ढेपाळले : प्रवाशांची बसस्थानकावर गर्दी

प्रभाकर शहाकार ।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जीवाची लाहीलाही करणारे ऊन, लग्नसराईचा हंगाम, एसटी बसेसचा अभाव, अनेक रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटत नसल्याने तासनतास ताटकळत राहणारे प्रवासी एखादी बस आली की जीवाच्या आकांताने बसकडे धाव घेतल्याचे चित्र बसस्थानकावर पाहावयास मिळत आहे.एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास, सौजन्य सप्ताह, प्रवासी जोडो अभियान, हात दाखवा बस थांबवा, हे अभियान चालविणारे परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्याची ऐसीतैशी करताना दिसत असल्याची प्रवाशांची ओरड आहे. जवळपास सहा दशकांपेक्षाही अधिक काळापासून गाव खेड्यापासून तर शहराच्या रस्त्यावर परिवहन मंडळाची बस धावत आहे. रौप्य महोत्सवी वर्षात परिवहन महामंडळाने प्रवाशांचा मनोरंजनात्मक प्रवास व्हावा म्हणून बसगाड्यांमध्ये साऊंड सिस्टीम सुरू केली होती. ती बंद करून बसगाड्यांमध्ये टी.व्ही. बसविण्यात आले. साहजिकच प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी परिवहन मंडळाची बस आपलीशी वाटू लागली. मध्यंतरी अनेक मार्गावर खासगी वातानुकूलित बससेवा सुरू झाली. आरामदायी व जलद सेवेमुळे प्रवासी या सेवेकडे आकर्षित होऊ लागले. मात्र, काही काळातच याही खासगी सेवेत तुघलकी कारभार सुरू झाला.याचाच लाभ घेत परिहवन मंडळाने प्रवाशी जोडो अभियान, हात दाखवा बस थांबवा, सौजन्य सप्ताह आदी अभियान राबवित प्रवाशांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला. याचा अल्पावधीतच बोजवारा उडाला. दिवाळीत प्रवाशांची गर्दी पाहता मंडळाकडून होणारी भाडवाढ, सुट्या पैशासाठी वाहकाशी होणारा वाद, मार्गात प्रवासी बसेसची प्रतीक्षा करीत राहतो. हात दाखवितो मात्र, त्याचा हात तसाच राहतो. चालक बस थांबवत नाही. भंगार बसगाड्या, फाटलेले आसन, काच नसणाºया खिडक्या, धक्कामार बस आदी सर्व बाबी प्रवाशांकरिता त्रासदायक ठरत आहेत. याची कैफियत मांडायची तर कुणाकडे? असा प्रश्न सतत प्रवाशांतून केला जात आहे.इतकेच नव्हे, तर बसस्थानकावरील पंखे भर उन्हाळ्यातही बंद राहणे, रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात अंधाराचे साम्राज्य, पाण्याचा अभाव या सर्व गोष्टी परिवहन मंडळाच्या पथ्यावर पडून खासगी प्रवासी वाहतूक फोफावत आहे. उन्हाळ्यात लग्न सराईच्या हंगामात परिवहन महामडळाने अतिरिक्त फेºया सुरू करणे किंवा अतिरिक्त बसेसची व्यवस्था करणे गरजेचे असते. परंतु, नेमके याच काळात प्रासंगिक करारासाठी बसेस दिल्या जातात. परिणामी, स्थानकात वेळापत्रक प्रभावित होते. अनेक बसच्या फेºया रद्द केल्या जातात. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी होते.एखादी बस आली की खांद्यावर मुले घेऊन प्रवासी मंडळी, जीवाच्या आकांताने बसकडे धाव घेते. बसमध्ये चढण्याच्या घाईत प्रवाशांचे खिसे, महिलांच्या पर्स, महिलांना धक्काबुक्की हे सर्व प्रकार होऊनही बस भरून जाते. त्यातही वाहक मात्र सुटे पैसे न देताच आपले भले करून घेतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पहिवहन मंडळाने लग्नसराईत अतिरिक्त बसेसची व्यवस्था करणे, वेळापत्रकानुसार फेºया, चालक वाहकांची प्रवाशांची सौजन्यपूर्ण वागणूक आदी बाबींकडे लक्ष घेऊन आपली सेवा ही प्रवाशांच्या सेवेसाठीच ठेवावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

टॅग्स :state transportएसटी