शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पुलगाव वगळता सर्वत्र सुरळीत वाहतूक

By admin | Updated: May 1, 2015 01:38 IST

परिवहन मंत्रालय मोटर वाहन कायदा रद्द करून रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक आणत असल्याचे समोर..

वर्धा : परिवहन मंत्रालय मोटर वाहन कायदा रद्द करून रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक आणत असल्याचे समोर येताच राज्यभर परिवहन विभागात गुरुवारी बंद पुकारण्यात आला. वर्धेतही त्याचे पडसाद दिसले. मात्र पुलगाव वगळता सर्वत्र शांतता होती. पुलगाव आगारातील पाच बसगाड्या चालकांनी अडविल्याने त्या दोन तास उशिरा सोडण्यात आल्या. यामुळे काही फेऱ्यांत अनियमितता दिसून आली.वर्धा, तळेगाव, हिंगणघाट व आर्वी आगारातील सर्वच बसगाड्या सुरळीत सुटल्या. येथे कोणत्याही प्रवाशाला त्रास झाला नाही. प्रारंभी काही चालकांनी गाड्या नेण्यास विरोध दर्शविला; मात्र या विधेयकावर केवळ चर्चा सुरू असून ते अद्याप पारीत झाले नसल्याची माहिती मिळताच त्यांनी आपापल्या बसगाड्या काढल्या. यामुळे वर्धेत या बंदचा विशेष परिणात दिसून आला नाही. पुलगाव येथील पाच चालकांनी या आंदोलनाला आपला पाठींबा दिल्याचे दिसून आले. त्यांनी बसस्थानकावरून गाड्या काढण्यास नकार दिला. यामुळे या आगारातील पाच फेऱ्या विलंबाने झाल्याने प्रवाश्यांना त्रासाचा सामन करावा लागला. (प्रतिनिधी)प्रासंगिक करारावरील १६ गाड्याही रवाना केंद्र शासनाच्या या अध्यादेशाला विरोध दर्शविण्याकरिता परिवहन विभागाच्यावतीने बंद पुकारण्यात आला होता. यामुळे प्रासंगिक करारावरील गाड्या जातील अथवा नाही असे वाटत असताना त्या गाड्या नियमित वेळत पोहोचल्या. गुरुवारी जिल्ह्यात एकूण १६ गाड्या आज करारावर होत्या. ई-रिक्षाचा निषेध नोंदविण्याकरिता आॅटो युनियनच्यावतीने गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला. यात शहरासह आसपासच्या परिसरातील आॅटोची चाके थांबली होती. यामुळे वर्धेत येणाऱ्या नागरिकांना भर उन्हात पायी प्रवास करावा लागला. धरणे आंदोलन करण्यापूर्वी आॅटो युनियनच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन सादर केले. सदर बंद सायंकाळी ५ वाजेपर्यंत असल्याची माहिती युनियनचे जिल्हाध्यक्ष देवा निखाडे यांनी दिली. निवेदनात विम्याचे वाढते दर, महाराष्ट्रातील आॅटो चालकांकरिता कल्याणकारी महामंडळाची घोषणा, दहा वर्षांच्या आतील जुने परवाने नुतनिकरण करण्यात यावे, ज्येष्ठ आॅटो चालकांना पेंशन योजना लागू करण्यात यावी, आॅटो चालकांकरिता असलेली कलम ६६/१९२ कलम रद्द करावी, आॅटोवर नवीन मिटर न थोपता जुन्या मिटरवर आॅटो पासींग करण्यात यावे, आॅटो मिटरचे कैलीब्रेशन सर्टिफिकेटवर लाणारा दंड रद्द करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकडे आजचा बंद पुकारण्यात आला होता. सदर निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. ४बसस्थानकासमोर असलेल्या आॅटो स्टॅण्डवर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्हा चालक-मालक आॅटो युनीयनचे जिल्हाध्यक्ष देवा निखाडे, जिल्हा महासचिव फिरोज पठाण, जिल्हा उपाध्यक्ष सुनील राऊत, शहर अध्यक्ष सुरेश कंजर यांच्यासह युनीयनचे तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील शाखेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.