शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव वगळता सर्वत्र सुरळीत वाहतूक

By admin | Updated: May 1, 2015 01:38 IST

परिवहन मंत्रालय मोटर वाहन कायदा रद्द करून रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक आणत असल्याचे समोर..

वर्धा : परिवहन मंत्रालय मोटर वाहन कायदा रद्द करून रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक आणत असल्याचे समोर येताच राज्यभर परिवहन विभागात गुरुवारी बंद पुकारण्यात आला. वर्धेतही त्याचे पडसाद दिसले. मात्र पुलगाव वगळता सर्वत्र शांतता होती. पुलगाव आगारातील पाच बसगाड्या चालकांनी अडविल्याने त्या दोन तास उशिरा सोडण्यात आल्या. यामुळे काही फेऱ्यांत अनियमितता दिसून आली.वर्धा, तळेगाव, हिंगणघाट व आर्वी आगारातील सर्वच बसगाड्या सुरळीत सुटल्या. येथे कोणत्याही प्रवाशाला त्रास झाला नाही. प्रारंभी काही चालकांनी गाड्या नेण्यास विरोध दर्शविला; मात्र या विधेयकावर केवळ चर्चा सुरू असून ते अद्याप पारीत झाले नसल्याची माहिती मिळताच त्यांनी आपापल्या बसगाड्या काढल्या. यामुळे वर्धेत या बंदचा विशेष परिणात दिसून आला नाही. पुलगाव येथील पाच चालकांनी या आंदोलनाला आपला पाठींबा दिल्याचे दिसून आले. त्यांनी बसस्थानकावरून गाड्या काढण्यास नकार दिला. यामुळे या आगारातील पाच फेऱ्या विलंबाने झाल्याने प्रवाश्यांना त्रासाचा सामन करावा लागला. (प्रतिनिधी)प्रासंगिक करारावरील १६ गाड्याही रवाना केंद्र शासनाच्या या अध्यादेशाला विरोध दर्शविण्याकरिता परिवहन विभागाच्यावतीने बंद पुकारण्यात आला होता. यामुळे प्रासंगिक करारावरील गाड्या जातील अथवा नाही असे वाटत असताना त्या गाड्या नियमित वेळत पोहोचल्या. गुरुवारी जिल्ह्यात एकूण १६ गाड्या आज करारावर होत्या. ई-रिक्षाचा निषेध नोंदविण्याकरिता आॅटो युनियनच्यावतीने गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला. यात शहरासह आसपासच्या परिसरातील आॅटोची चाके थांबली होती. यामुळे वर्धेत येणाऱ्या नागरिकांना भर उन्हात पायी प्रवास करावा लागला. धरणे आंदोलन करण्यापूर्वी आॅटो युनियनच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन सादर केले. सदर बंद सायंकाळी ५ वाजेपर्यंत असल्याची माहिती युनियनचे जिल्हाध्यक्ष देवा निखाडे यांनी दिली. निवेदनात विम्याचे वाढते दर, महाराष्ट्रातील आॅटो चालकांकरिता कल्याणकारी महामंडळाची घोषणा, दहा वर्षांच्या आतील जुने परवाने नुतनिकरण करण्यात यावे, ज्येष्ठ आॅटो चालकांना पेंशन योजना लागू करण्यात यावी, आॅटो चालकांकरिता असलेली कलम ६६/१९२ कलम रद्द करावी, आॅटोवर नवीन मिटर न थोपता जुन्या मिटरवर आॅटो पासींग करण्यात यावे, आॅटो मिटरचे कैलीब्रेशन सर्टिफिकेटवर लाणारा दंड रद्द करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकडे आजचा बंद पुकारण्यात आला होता. सदर निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. ४बसस्थानकासमोर असलेल्या आॅटो स्टॅण्डवर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्हा चालक-मालक आॅटो युनीयनचे जिल्हाध्यक्ष देवा निखाडे, जिल्हा महासचिव फिरोज पठाण, जिल्हा उपाध्यक्ष सुनील राऊत, शहर अध्यक्ष सुरेश कंजर यांच्यासह युनीयनचे तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील शाखेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.