शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बाजारात ‘सन्नाटा’; रस्त्यांवर बेफिक्रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असताना आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाययोजनांबाबत सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यात आजवर एकही बाधित किंवा संशयित रुग्ण आढळलेला नाही.

ठळक मुद्देकोरोना व्हायरस : शासकीय कार्यालयातही शुकशुकाट, पानटपऱ्यांचे शटर डाऊन; काळजी घेणारे नगण्यच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव अथवा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासनासोबतच आता नागरिकही काही प्रमाणात काळजी घेऊ लागले आहेत. मात्र, त्यांची संख्या अत्यंत नगण्यच राहिली आहे. गुरुवारी वर्धा शहरात ठिकठिकाणी पाहणी केली असता, संमिश्र चित्र दिसले. शासकीय कार्यालयांत गर्दीला बऱ्यापैकी ओहोटी दिसली. मात्र, अन्य सार्वजनिक ठिकाणची गर्दी अजूनही ओसरलेली दिसत नाही. विशेष म्हणजे, स्वत:ची कोणतीही काळजी न घेता हे नागरिक घोळक्याने गप्पा मारताना, हस्तांदोलन करताना, सर्रास रस्त्यावरच थुंकताना आढळून आले.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असताना आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाययोजनांबाबत सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यात आजवर एकही बाधित किंवा संशयित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, यामुळे बेफिकीर राहणे परवडणारे नाही, अशाच पद्धतीने प्रशासनाच्या हालचाली सुरू आहे. प्रचंड सतर्कता या आजाराच्या अनुषंगाने बाळगली जात असतानाही बहुतांश नागरिक मात्र, अजूनही याविषयी गंभीर झालेले दिसत नाहीत. गुरुवारी याच अनुषंगाने वर्धा येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, नगरपरिषद, बसस्थानक, जिल्हा रुग्णालय, बाजारपेठेत पाहणी केली असता संमिश्र चित्र पाहायला मिळाले. जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरिकांची वर्दळ कमी झालेली दिसून आली.आष्टीत बाजारपेठ, हॉटेल्स बंदआष्टी शहरामधील सर्व हॉटेल, किराणा दुकान, कापड दुकाने बुधवारपासून बंद आहेत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये व एकत्र जमू नये, असे आवाहन करण्यात आल्याने सर्वजण आपल्या घरातच आहेत. कुठेही एकत्र समूह दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा धसका सर्वांनी घेतल्याचे एकूणच चित्र पाहायला मिळत आहे.शीतपेयांच्या हातगाडीवर गर्दीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढावी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आहारात कडधान्याचा समावेश करण्यासोबतच नारळाचे पाणी, दही, मठ्ठा, लस्सी आदी घ्यावे, असा सल्ला दिला जात असल्याने लस्सी, मठ्ठा विक्रीच्या हातगाड्यांवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.कोरोनाची अशी आहेत लक्षणेकोरोना हा इतर फ्ल्यू सारखाच आजार आहे. त्याची लक्षणेही तशीच असतात. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, श्वसनास त्रास होणे अशी प्राथमिक लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत असतात.वरील लक्षणे आढळणारा व्यक्ती हा कोरोनाग्रस्त असतो, असे नव्हे. जर तो कोरोनाग्रस्त देशातून आलेला असेल, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेला असेल, तरच त्यांना संभाव्य कोरोनासदृश रुग्ण म्हणता येते.या गोष्टी करणे आवश्यकसाबण, हॅण्डवॉश व पाण्याचा वापर करून हात सतत स्वच्छ करावेत. शिंकताना किंवा खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल झाकावा.सर्दी किंवा फ्ल्यूसदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक उपचार घ्यावेत.वेळेत जेवण व पुरेशी झोप घ्यावी. मांसाहार किंवा अंडी खाताना त्या पुरेशा शिजलेल्या किंवा उकडलेल्या आहेत, याची खात्री करावी.या गोष्टी करणे टाळावेसर्दी किंवा फ्ल्यूसृश लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळावा. हस्तांदोलन, गळाभेट शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा.सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर थुंकू नये. जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.गर्दीच्या ठिकाणी जाणे तसेच प्रवास करणे शक्यतो टाळावे. शिवाय गर्दी होणारे कार्यक्रम ठेऊ नयेत व अशा ठिकाणी जाणेही टाळायला हवे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस