लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव अथवा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासनासोबतच आता नागरिकही काही प्रमाणात काळजी घेऊ लागले आहेत. मात्र, त्यांची संख्या अत्यंत नगण्यच राहिली आहे. गुरुवारी वर्धा शहरात ठिकठिकाणी पाहणी केली असता, संमिश्र चित्र दिसले. शासकीय कार्यालयांत गर्दीला बऱ्यापैकी ओहोटी दिसली. मात्र, अन्य सार्वजनिक ठिकाणची गर्दी अजूनही ओसरलेली दिसत नाही. विशेष म्हणजे, स्वत:ची कोणतीही काळजी न घेता हे नागरिक घोळक्याने गप्पा मारताना, हस्तांदोलन करताना, सर्रास रस्त्यावरच थुंकताना आढळून आले.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असताना आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाययोजनांबाबत सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यात आजवर एकही बाधित किंवा संशयित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, यामुळे बेफिकीर राहणे परवडणारे नाही, अशाच पद्धतीने प्रशासनाच्या हालचाली सुरू आहे. प्रचंड सतर्कता या आजाराच्या अनुषंगाने बाळगली जात असतानाही बहुतांश नागरिक मात्र, अजूनही याविषयी गंभीर झालेले दिसत नाहीत. गुरुवारी याच अनुषंगाने वर्धा येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, नगरपरिषद, बसस्थानक, जिल्हा रुग्णालय, बाजारपेठेत पाहणी केली असता संमिश्र चित्र पाहायला मिळाले. जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरिकांची वर्दळ कमी झालेली दिसून आली.आष्टीत बाजारपेठ, हॉटेल्स बंदआष्टी शहरामधील सर्व हॉटेल, किराणा दुकान, कापड दुकाने बुधवारपासून बंद आहेत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये व एकत्र जमू नये, असे आवाहन करण्यात आल्याने सर्वजण आपल्या घरातच आहेत. कुठेही एकत्र समूह दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा धसका सर्वांनी घेतल्याचे एकूणच चित्र पाहायला मिळत आहे.शीतपेयांच्या हातगाडीवर गर्दीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढावी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आहारात कडधान्याचा समावेश करण्यासोबतच नारळाचे पाणी, दही, मठ्ठा, लस्सी आदी घ्यावे, असा सल्ला दिला जात असल्याने लस्सी, मठ्ठा विक्रीच्या हातगाड्यांवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.कोरोनाची अशी आहेत लक्षणेकोरोना हा इतर फ्ल्यू सारखाच आजार आहे. त्याची लक्षणेही तशीच असतात. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, श्वसनास त्रास होणे अशी प्राथमिक लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत असतात.वरील लक्षणे आढळणारा व्यक्ती हा कोरोनाग्रस्त असतो, असे नव्हे. जर तो कोरोनाग्रस्त देशातून आलेला असेल, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेला असेल, तरच त्यांना संभाव्य कोरोनासदृश रुग्ण म्हणता येते.या गोष्टी करणे आवश्यकसाबण, हॅण्डवॉश व पाण्याचा वापर करून हात सतत स्वच्छ करावेत. शिंकताना किंवा खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल झाकावा.सर्दी किंवा फ्ल्यूसदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक उपचार घ्यावेत.वेळेत जेवण व पुरेशी झोप घ्यावी. मांसाहार किंवा अंडी खाताना त्या पुरेशा शिजलेल्या किंवा उकडलेल्या आहेत, याची खात्री करावी.या गोष्टी करणे टाळावेसर्दी किंवा फ्ल्यूसृश लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळावा. हस्तांदोलन, गळाभेट शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा.सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर थुंकू नये. जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.गर्दीच्या ठिकाणी जाणे तसेच प्रवास करणे शक्यतो टाळावे. शिवाय गर्दी होणारे कार्यक्रम ठेऊ नयेत व अशा ठिकाणी जाणेही टाळायला हवे.
बाजारात ‘सन्नाटा’; रस्त्यांवर बेफिक्रे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असताना आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाययोजनांबाबत सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यात आजवर एकही बाधित किंवा संशयित रुग्ण आढळलेला नाही.
बाजारात ‘सन्नाटा’; रस्त्यांवर बेफिक्रे’
ठळक मुद्देकोरोना व्हायरस : शासकीय कार्यालयातही शुकशुकाट, पानटपऱ्यांचे शटर डाऊन; काळजी घेणारे नगण्यच