शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

बारमाही पाण्याची पूर्तता करेल श्रीराम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:00 IST

गिरड (पेठ) गावालगत असलेल्या श्रीराम तलावातील गाळाचा अनुगामी लोकराज्य महाअभियान आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उपसा करण्यात आल्याने बारमाही पाण्याची पूर्तता होणार आहे.

ठळक मुद्देअनुलोमचा पुढाकार : लोकसहभागातून झाला १३०० घनमीटर गाळाचा उपसा

लालसिंह ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : गिरड (पेठ) गावालगत असलेल्या श्रीराम तलावातील गाळाचा अनुगामी लोकराज्य महाअभियान आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उपसा करण्यात आल्याने बारमाही पाण्याची पूर्तता होणार आहे. यामुळे जनावरांच्या तृष्णा-तृप्तीची सोय होणार शिवाय, या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास ओलिताचे क्षेत्र वाढणार आहे. तलावाचे पात्र खोल झाल्याने बारमाही पाण्याची पूर्तता श्रीराम तलाव करणार आहे.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या उपक्रमांतर्गत श्रीराम तलावातील एक हजार तीनशे घनमीटर गाळाचा उपसा लोकसहभागातून करण्यात आला आहे. पन्नासवर शेतकऱ्यांनी तलावातून काढलेला सुपीक गाळ शेतात टाकला आहे. या तलावातून ४५० ट्रॅक्टर गाळाचा उपसा करून शेतशिवारात शेतकऱ्यांनी टाकलेला आहे. यामुळे शेतजमीन सुपीक होणार असून उत्पादनातही वाढ होईल.या तलावाच्या सभोवताल असणाºया विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. श्रीराम तलावातील गाळ साधारणत: दीड मीटर खोलीपर्यंत काढल्याने पाण्याचा साठा दीड मीटरने अधिक राहणार आहे. दरवर्षी या तलावाचा ग्रामपंचायतीच्या वतीने लिलाव करण्यात येतो. या तलावात माशांचे उत्पादन घेतले जाते. चार-सहा व्यावसायिकांना यातून रोजगार मिळतोच; ग्रामपंचायतीलादेखील उत्पन्न मिळते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. कालांतराने मगन संग्रहालय समितीने या तलावाच्या पाळीचे अस्तरीकरण आणि खोलीकरण केले होते. दहा वर्षांनंतर हा तलाव गाळाने बुजला होता. या तलावात दरवर्षी बारमाही पाणी उपलब्द असते. मे महिन्याच्या अखेरीस हे पाणी आटते. मात्र, या तलावातील गाळ उपसा केल्याने यापुढे बारमाही पाण्याची सोय झाली आहे.अनुगामी लोकराज्य महा अभियानाच्या माध्यमातून गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या कार्यक्रमातून श्रीराम तलावातील गाळ उपसा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच विजय तडस, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फकिरा खडसे, अनुलोमचे समन्वयक प्रवीण पोहणे यांची उपस्थिती होती. आयोजनाकरिता आशीष भांदककर, अनुलोमचे वस्ती मित्र राहुल खडसे, अजय बावणे, वैभव कुंभलकर, प्रफुल्ल झाडे, खेमराज खंडाळे आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Waterपाणी