शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कंचनपूर येथे पाण्यासाठी माजी सैनिकांसह चिमुकल्यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:10 IST

जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकडून श्रमदान कारण्यात येत आहे. यात आर्वी तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायतीत कंचनपूर या गावानेही कंबर कसली आहे. श्रमदानातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरुण-तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : पाणीदार गावाकरिता सकाळपासूनच श्रमदान; कुदळ फावडे घेऊन निघते नागरिकांची यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकडून श्रमदान कारण्यात येत आहे. यात आर्वी तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायतीत कंचनपूर या गावानेही कंबर कसली आहे. श्रमदानातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरुण-तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी या येथे माजी सैनिकांनी श्रमदान केले. आदिवासी बहुल असलेल्या या गावांत जलसंवर्धनाची कामे जोरात सुरू आहे. भारत माता की जय, जय जवान, जय किसानचा जयघोष करून येथे श्रमदानाला प्रारंभ होतो.महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटनेचे सचिव श्यामभाऊ परसोडिकर यांनी गावाच्या आणखी काही भागाची पाहणी केली. प्रहार संघटनेचे पुलगाव देवळी विधानसभा प्रमुख राजेश सावरकर यांना गावाजवळील नाला रूंदीकरणासाठी पाच दिवस पोकलँड जर मिळाला तर रसुलाबादही पाणीदार होईल, असे म्हटले असता त्यांनी दोन दिवस पाणी द्यायला कबुल केले.कंचनपूर येथे श्रमदानाला माजी कर्नल चित्तरंजन चौडे, अरुण हस्ती, विजय भुते, विवेक ठाकरे, प्रहार संघटना माजी सैनिक सेल अध्यक्ष, सलुते, भानुदास सोमनाथ, बिपिन मोघे, चिमुकल्यांपैकी समीक्षा, कुणाल, भूमिका, दर्शन सावरकर, अंशु व टीना अजमिरे, माजी पं.स. सदस्य तुळशीदस भबुतकर, पं.स. सदस्य अरुणा रा. सावरकर, सरपंच राजश्री धारगवे, ग्रामसेवक अशोक बोबडे, किशोर सावरकर, प्रिती सावरकर, नितीन धाडसे, प्रफुल अनवाने, राजूभाऊ मानकर, डॉ. लोकेंद्र दाभिरे, ग्रामपंचायत सदस्य कल्पना उईके, ज्ञानेश्वर मानकर, भास्कर देऊळकर, प्रकाश सातभाई, राहुल सावरकर, पिंटू काळपांडे, संतोष लाडे, नसीम सौदागर, घनश्याम क्षीरसागर, मंगेश चौधरी, मंगेश काटोले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला.खैरी येथील संपूर्ण गाव जाते श्रमदानालाविरुळ (आकाजी) - येथून जवळच असलेल्या व निसर्गाच्या कुशीत लपलेल्या खैरी या गावाने वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. यामुळे गावकरी रोज पहाटे चार वाजता उठून श्रमदान करतात. शंभर टक्के आदीवासी बहुल असलेल्या या गावकऱ्यांना श्रमदानासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून आज वर्धा येथील फिनिक्स अकँडमीच्या विद्यार्थांनी गावात येवून गावकºयांसोबत श्रमदान करून त्यांचा उत्साह वाढविला. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा