शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा संचालक असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:16 IST

हिंगणघाट बाजार समितीबाबत जे ऐकत ते तेच आज आपण डोळ्यांनी बघितले. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू असलेले काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा माणूस बाजार समितीच्या संचालक मंडळात असावा.....

ठळक मुद्देसुभाष देशमुख : हिंगणघाट कृउबासच्या नवीन लिलाव शेडचा लोकार्पण सोहळा

ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : हिंगणघाट बाजार समितीबाबत जे ऐकत ते तेच आज आपण डोळ्यांनी बघितले. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू असलेले काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा माणूस बाजार समितीच्या संचालक मंडळात असावा या दृष्टीने बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे, असे पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ४ कोटींच्या नवीन लिलाव शेडच्या लोकार्पण प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री तथा आ. रणजित कांबळे, किशोर दिघे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थूटे, आर्वी बाजार समितीचे दिलीप काळे, समुद्रपूर बाजार समितीचे हिम्मत चतुर, मधुसूदन हरणे, उपसभापती हरीष वडतकर आदींची उपस्थिती होती.ना. देशमुख पुढे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी बाजार समित्या खुल्या बाजारात येत असताना या बाजार समित्या आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाल्या पाहिजे. राज्यातील शेतकरी सन्मानाने जगावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आॅनलाईन कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील ७७ लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिले आहे. पहिल्या पात्र यादीत ४७.३१ लाख खातेदाराचा समावेश आहे. त्यांचे २३ हजार कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत. त्यापैकी १२ हजार ३८१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. ३१ मार्चपर्यंत या सर्वांचा सातबारा कोरा करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जुलैनंतर कुणाकडूनही व्याजाची वसुली केली जाणार नाही. जे शेतकरी निकषात बसतात; पण अन्य कारणाने ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांनी ३१ मार्चनंतर अर्ज सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पहिली यादी क्लिअर झाली की अन्य पात्र शेतकरी यांनाही न्याय देण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मार्गदर्शन करताना आ. रणजित कांबळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने पुढाकार द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा घोडे व इब्राहिम बक्स यांनी केले. कार्यक्रमादरम्यान शेतकरी पाल्याना लॅपटॉप वितरण, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटप, विविध योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. आभार सचिव टी. सी. चांभारे यांनी मानले.