शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा संचालक असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:16 IST

हिंगणघाट बाजार समितीबाबत जे ऐकत ते तेच आज आपण डोळ्यांनी बघितले. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू असलेले काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा माणूस बाजार समितीच्या संचालक मंडळात असावा.....

ठळक मुद्देसुभाष देशमुख : हिंगणघाट कृउबासच्या नवीन लिलाव शेडचा लोकार्पण सोहळा

ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : हिंगणघाट बाजार समितीबाबत जे ऐकत ते तेच आज आपण डोळ्यांनी बघितले. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू असलेले काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा माणूस बाजार समितीच्या संचालक मंडळात असावा या दृष्टीने बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे, असे पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ४ कोटींच्या नवीन लिलाव शेडच्या लोकार्पण प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री तथा आ. रणजित कांबळे, किशोर दिघे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थूटे, आर्वी बाजार समितीचे दिलीप काळे, समुद्रपूर बाजार समितीचे हिम्मत चतुर, मधुसूदन हरणे, उपसभापती हरीष वडतकर आदींची उपस्थिती होती.ना. देशमुख पुढे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी बाजार समित्या खुल्या बाजारात येत असताना या बाजार समित्या आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाल्या पाहिजे. राज्यातील शेतकरी सन्मानाने जगावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आॅनलाईन कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील ७७ लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिले आहे. पहिल्या पात्र यादीत ४७.३१ लाख खातेदाराचा समावेश आहे. त्यांचे २३ हजार कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत. त्यापैकी १२ हजार ३८१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. ३१ मार्चपर्यंत या सर्वांचा सातबारा कोरा करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जुलैनंतर कुणाकडूनही व्याजाची वसुली केली जाणार नाही. जे शेतकरी निकषात बसतात; पण अन्य कारणाने ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांनी ३१ मार्चनंतर अर्ज सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पहिली यादी क्लिअर झाली की अन्य पात्र शेतकरी यांनाही न्याय देण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मार्गदर्शन करताना आ. रणजित कांबळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने पुढाकार द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा घोडे व इब्राहिम बक्स यांनी केले. कार्यक्रमादरम्यान शेतकरी पाल्याना लॅपटॉप वितरण, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटप, विविध योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. आभार सचिव टी. सी. चांभारे यांनी मानले.