शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १४५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात राहणाºया नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यात संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावात करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात येतात यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार झाला आहे.

ठळक मुद्दे२ कोटी ६९ लाख ७८ हजारांचा खर्च अपेक्षित

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येत्या उन्हाळ्यात जानेवारी २०२० ते मार्च पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यांतील आरखड्यानुसार पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यासाठी १०४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना संभाव्य टंचाईग्रस्त १४५ गावांसाठी प्रस्तावित करण्यात आल्या असून एकूण २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात राहणाºया नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यात संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावात करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात येतात यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार झाला आहे. आराखड्यानुसार १४५ गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईची स्थिती उद्भवू शकते. त्यासाठी जिल्ह्यात १०४ उपाययोजना सुद्धा पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या आहेत.संबंधीत कामे हिवाळ्यात सुरू करून नागरिकांना उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी संबंधित उपाययोजनांना जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच मंजुरी देणे अपेक्षित आहे. ग्रामीण पुरवठा विभागाच्यावतीने उन्हाळ्यात उपाययोजना मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर त्याला मंजुरी मिळण्यास विलंब होते. परिणामी, उन्हाळा संपल्यानंतर उपाय योजनांची कामे सुरू होतात. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने पाणी टंचाई उपाय योजनांच्या गावाची यादीसह कृषी आराखडा शासनाला पाठविला आहे. त्यात जानेवारी ते मार्च २०२० या ३ महिन्यातील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी एकूण प्रस्तावित १४५ गावांसाठी एकूण १०४ उपायोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. या उपाययोजनांना २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये आर्वी तालुक्यातील २८ गावांसाठी ४८ उपायोजना, आष्टी तालुक्यातील २३ गावांसाठी ३०, कारंजा तालुक्यातील ४९ गावांसाठी ६९, सेलू तालुक्यातील २ गावांकरिता ४, हिंगणघाट तालुक्यातील १० गावांसाठी १२, समुद्रपूर तालुक्यातील ३३ गावांसाठी ३५ उपयायोजनांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.अधिग्रहित विहिरींचा समावेशआर्वी तालुक्यातील २८ ठिकाणी २० विहिरी, आष्टी तालुक्यातील २३ ठिकाणी १२, कारंजातील ४९ ठिकाणी २७, सेलू २ ठिकणी २, हिंगणघाट तालुक्यातील १० ठिकाणी ५, समुद्रपूर तालुक्यातील ३३ ठिकाणी २ खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे अपेक्षीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात