शहरं
Join us  
Trending Stories
1
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
2
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
3
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
5
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
6
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...
7
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
8
मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक
9
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
10
PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम
11
चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार!
12
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज
13
ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश
14
PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न
15
कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक
16
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
17
"तिच्या लिव्हरचा भाग कापून टाकावा लागला", १४ तास सुरू होती दीपिकाची सर्जरी, शोएबने दिले हेल्थ अपडेट
18
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
19
भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला
20
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड

जिल्ह्यात १४५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात राहणाºया नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यात संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावात करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात येतात यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार झाला आहे.

ठळक मुद्दे२ कोटी ६९ लाख ७८ हजारांचा खर्च अपेक्षित

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येत्या उन्हाळ्यात जानेवारी २०२० ते मार्च पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यांतील आरखड्यानुसार पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यासाठी १०४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना संभाव्य टंचाईग्रस्त १४५ गावांसाठी प्रस्तावित करण्यात आल्या असून एकूण २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात राहणाºया नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यात संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावात करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात येतात यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार झाला आहे. आराखड्यानुसार १४५ गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईची स्थिती उद्भवू शकते. त्यासाठी जिल्ह्यात १०४ उपाययोजना सुद्धा पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या आहेत.संबंधीत कामे हिवाळ्यात सुरू करून नागरिकांना उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी संबंधित उपाययोजनांना जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच मंजुरी देणे अपेक्षित आहे. ग्रामीण पुरवठा विभागाच्यावतीने उन्हाळ्यात उपाययोजना मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर त्याला मंजुरी मिळण्यास विलंब होते. परिणामी, उन्हाळा संपल्यानंतर उपाय योजनांची कामे सुरू होतात. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने पाणी टंचाई उपाय योजनांच्या गावाची यादीसह कृषी आराखडा शासनाला पाठविला आहे. त्यात जानेवारी ते मार्च २०२० या ३ महिन्यातील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी एकूण प्रस्तावित १४५ गावांसाठी एकूण १०४ उपायोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. या उपाययोजनांना २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये आर्वी तालुक्यातील २८ गावांसाठी ४८ उपायोजना, आष्टी तालुक्यातील २३ गावांसाठी ३०, कारंजा तालुक्यातील ४९ गावांसाठी ६९, सेलू तालुक्यातील २ गावांकरिता ४, हिंगणघाट तालुक्यातील १० गावांसाठी १२, समुद्रपूर तालुक्यातील ३३ गावांसाठी ३५ उपयायोजनांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.अधिग्रहित विहिरींचा समावेशआर्वी तालुक्यातील २८ ठिकाणी २० विहिरी, आष्टी तालुक्यातील २३ ठिकाणी १२, कारंजातील ४९ ठिकाणी २७, सेलू २ ठिकणी २, हिंगणघाट तालुक्यातील १० ठिकाणी ५, समुद्रपूर तालुक्यातील ३३ ठिकाणी २ खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे अपेक्षीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात