शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कर्जमाफीवरून भाजपला अडचणीत आणण्यासाठी सेना विदर्भात आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:14 IST

राज्यात भाजप सोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा भंडाफोड करून भाजपच्या अडचणी वाढविण्याचा विडा विदर्भात उचलला आहे.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी उघडले तक्रार केंद्र सेना नेत्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

अभिनय खोपडे ।आॅनलाईन लोकमतवर्धा : राज्यात भाजप सोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा भंडाफोड करून भाजपच्या अडचणी वाढविण्याचा विडा विदर्भात उचलला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याच्याबाबत आदेश देताच विदर्भात सेना नेते आक्रमक झाले आहेत. विदर्भाच्या विविध तालुका मुख्यालयात २७ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत सेनेने बँकांसमोर मंडप टाकून शेतकऱ्याकडून अडचणी लिहून घेण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाही. त्यामुळे ही कर्जमाफी योजना किती खरी याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह शिवसेनेने आग्रहीपणे लावून धरली होती. काँग्रेसने या संदर्भात राज्याच्या विविध भागात संघर्ष यात्रा काढली होती. त्यानंतर शिवसेनेने अनेक बँकांसमोर ढोलताशे वाजवून भाजपला अडचणीत आणण्याचे काम केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली. यात दीड लाखांपर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे. व नियमित कर्ज भरणाऱ्याना अनुदान दिले जाणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या मंत्र्यांनी धनादेश वितरित करण्याचे काम दिवाळीपूर्वीच केले. व २७ आॅक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची व्यवस्था केली. मात्र बँकेत शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. ही बाब लक्षात घेवून शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करण्याच्या दृष्टीकोणातून विविध तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन व मदत केंद्र सुरू करून थेट भाजपवरच हल्लाबोल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या कर्जमाफी योजनेचे श्रेय भाजपच्या पदरात पडू नये यासाठी शिवसेनेचे नेते आक्रमक आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अत्यल्पच मिळणार अनेकांना रकमा मिळाल्या नाही.या बाबीवर फोकस करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वत: संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहे.अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यासंदर्भातील माहिती नाही. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने बँकेत उत्तर दिल्या जात नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, संपर्क नंबर आदी माहिती आम्ही जमा करून घेत आहोत. शिवसेनेचे कार्यकर्ते अशा शेतकऱ्यांसोबत बँकेतील व त्याच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास येणाºया अडचणी दूर करण्यास मदत करेल. शेतीचे काम सोडून शेतकऱ्यांला बँकेकडे पुन्हा पुन्हा यावे लागणार नाही. सर्व काम शिवसैनिक करून देतील. यासाठीच मदत व मार्गदर्शन केंद्र आहे. शिवाय अनेकांनी या कर्जमाफीचे श्रेय घेणारे फलक गावागावात लावले आहे. ते फलकावर तर आम्ही शेतकऱ्यांसोबत मदतीसाठी आहो हा ही संदेश या अभियानातून शिवसेनेला जनतेला द्यायचा आहे.- अशोक शिंदेसंपर्क प्रमुख, शिवसेना व माजी आमदार,हिंगणघाट विधानसभा क्षेत्र

टॅग्स :Farmerशेतकरी