शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

कालवा झिरपल्याने शिवपांदण पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:31 IST

हमदापूर आणि शिवनगर सीमेवरून बोरधरणाचा कालवा काढण्यात आला आहे. मात्र या कालव्याच्या पाटचऱ्या आणि उपकालव्याची स्वच्छता केलेली नाही.

ठळक मुद्देपाटचऱ्यां बुजल्या : शेतकऱ्यांना होतो मनस्ताप

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : हमदापूर आणि शिवनगर सीमेवरून बोरधरणाचा कालवा काढण्यात आला आहे. मात्र या कालव्याच्या पाटचऱ्या आणि उपकालव्याची स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे पाणी लगतच्या शेतात शिरत आहे. तसेच शिवनगर पांदण पाण्याखाली आली आहे.हा कालवा पुढे बावापूर, रज्जकपूर, देरडा येथून जातो. कालव्याच्या पाण्यामुळे येथील शेतकºयांना लाभ झाला. रबी हंगामात येथील शेतकरी पिके घेऊ लागली. काही प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निकाली निघाला. मात्र लघुसिंचन विभागाचे दुर्लक्ष असल्याने शेतकºयांना या कालव्याचा आता त्रास होत आहे. उपकालव्याचे पाणी लगतच्या शेतात वाहत आहे. त्यामुळे रबी पिके प्रभावीत होत आहे. शिवाय पाण्याचा अपव्यय होत आहे. दिवसाला लाखो लिटर पाणी वाहत असताना याकडे कुणाचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.उपकालव्याच्या पाण्यामुळे शिवपांधन चिखलमय झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना ये-जा करताना अडचण येत आहे. सरकारी यंत्रणेच्या गलथान कारभाराचा फटका शेतकरी सहन करीत आहे. सिंचनाकरिता सोडण्यात आलेल्या पाण्याचा याप्रकारे अपव्यय होत आहे.बावापूर येथील प्रकारउपकालवे व पाटचऱ्यांची स्वच्छता वेळेवर नसल्याने होत नसल्याने यात झुडपे वाढले आहे. गाळ साचला असल्याने बावापूर ते रज्जकपूर दरम्यान रस्त्यावर पाणीच पाणी दिसते. पाण्याचा प्रवाह वेगवान असाल्याने शेतात पाणी शिरते. बावापूरच्या शिवपांधणीवर चिखल तयार झाल्याने आवागमन करणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या भासते. याप्रकारे पाण्याचा अपव्यय थांबविण्याची गरज आहे.