शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आता पाच रुपयांत मिळणार शिवभोजन थाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

सरकारकडून शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना आता केवळ पाच रुपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत भोजन उपलब्ण होणार आहे. राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढत जात आहेत.

ठळक मुद्देआठही तालुक्यांत राहणार केंद्र : जिल्ह्यात १ हजार नागरिकांची भूक भागविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दैनंदिन कामकाजावरच अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अनेकांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे. अशा मंडळींना आता सहज जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने आठही तालुक्यात १ एप्रिलपासून शिवभोजन थाळींची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावरुन १ हजार व्यक्तींची पाच रुपयांत भूक भागविली जाणार आहे.सरकारकडून शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना आता केवळ पाच रुपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत भोजन उपलब्ण होणार आहे. राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढत जात आहेत. संसर्गातून होणाऱ्या या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. परंतु, या काळात हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यासोबतच बाहेरगावावरून आलेल्यांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने गरिब नागरिकांसाठी सुरु केलेल्या शिवभोजन थाळींचे लक्षांक प्रतिदिवशी ४०० वरून १ हजार केला आहे. त्यातील ४०० थाळी अगोदरच वर्धा शहरातील रेल्वे स्टेशन समोर, सामान्य रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्हा न्यायालयासमोर शिवभोजन केंद्रावर सुरु आहे.आता उर्वरित ६०० थाळींचे विभाजन आठही तालुक्याकरिता करण्यात आले आहे. त्यामध्ये वर्धा (ग्रामीण), सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर या तालुक्यात प्रत्येकी ७५ थाळींची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबतचे तालुकास्थळावर आदेश देण्यात आले आहे.आता थाळीऐवजी मिळणार पॅकेट्सशिवभोजन थाळी योजनंतर्गत गरीब व गरजू लोकांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर असल्यामुळे शासन व वैद्यकीय क्षेत्रातील विशेषज्ञ नागरिकांना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करीत आहे. परिणामी शासनाने थाळी ऐवजी आता शिवभोजन पॅकेट्स स्वरुपात विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.भोजनालयातही सोशल डिस्टन्सिंगशिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतूक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. भोजनालय चालकांनी जेवण तयार करण्याआधी हात कमीतकमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतूक करुन घेणे, भोजन तयार करणाºया तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घेण्याच्याही सूचना केल्या आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय