शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
3
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
4
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
5
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
6
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
7
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
8
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
9
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
10
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
11
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
12
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
13
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
14
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
15
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
16
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
17
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
18
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
20
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?

शहराला आले गोठ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

बुधवारी दाते मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे नगरपालिकेकडे जाणाऱ्या दोन ते अडीच किलोमीटर मार्गापर्यंत विविध ठिकाणी शेकडोवर जनावरे ठिय्या देऊन होती. जनावरांनी शहरवासीयांना वेठीस धरले असताना, तसेच अपघाताची शक्यता असताना पशुपालकांना देणे-घेणे नाही.

ठळक मुद्देरहदारी असुरक्षित : चौक आणि विविध रस्त्यांवर जनावरांचा कब्जा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील विविध रस्त्यांवर जनावरांकडून अघोषित ‘रास्तारोको’ केला जात असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडत असून रहदारी असुरक्षित झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रक पोलिस शाखेचे सोईस्कर दुर्लक्ष आहे.पावसामुळे निर्माण होणारे चिखलमय वातावरण म्हणून पावसाळ्यात दरवर्षीच पाळीव, मोकाट जनावरे शहरातील महत्त्वपूर्ण आर्वी नाका चौक, आरती चौक, धुनिवाले चौक, आर्वी मार्ग, शहरातून जाणारा एकमेव प्रमुख मार्ग आदी ठिकाणी दररोज जनावरांचे कळप रस्त्यावर असतात. एकावेळी १५ ते २० व त्यापेक्षा जनावरे रस्त्यावर, चौकात उभी राहत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच वाट काढावी लागत आहे. यात सांडही राहत असल्याने बऱ्याचवेळा जनावरांच्या टक्कर होतात. ठाकरे मार्केटसमोरील व आर्वी मार्गावर हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. बुधवारी दाते मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे नगरपालिकेकडे जाणाऱ्या दोन ते अडीच किलोमीटर मार्गापर्यंत विविध ठिकाणी शेकडोवर जनावरे ठिय्या देऊन होती. जनावरांनी शहरवासीयांना वेठीस धरले असताना, तसेच अपघाताची शक्यता असताना पशुपालकांना देणे-घेणे नाही. या जनावरांना ते पहाटेच गोठ्याबाहेर काढतात. ही जनावरे थेट शहर गाठत विविध ठिकाणी ठाण मांडून बसतात. वाहनचालकांनी हॉर्न वाजवूनही ती जागची हलत नाहीत. यापूर्वी या मोकाट, पाळीव जनावरांमुळे अनेक अपघात झाले आहेत.मोकाट, पाळीव जनावरांचा बंदोबस्त करून दंडात्मक कारवाई करण्याचा पालिकेचा अधिकार असताना, हा विभागही झोपेत आहे. त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला नाही.पाच-दहा कि.मी. च्या परिघात हजारावर जनावरेशहरातील पाच-दहा किलोमीटरच्या अंतरात दररोज हजारावर जनावरे ठाण मांडून बसत आहेत. यामुळे वाहनधारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहेत. निम्म्या रस्त्यावर जनावरांचा कब्जा, याचवेळी विरुद्ध दिशेने मोठे वाहन आल्यास दुचाकीचालकांना वाट कोठून काढावी, असा प्रश्न पडतो. मोकाट जनावरांचा पालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वर्धेकर नागरिकांंनी केली आहे.वाहतूक पोलिस दंडवसुलीत व्यस्तवाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलिसांची आहे. असे असताना शहरातील अनेक चौकात वाहतूक पोलिस शोधूनही सापडत नाहीत. जेथे कर्तव्यावर आहेत, तेथे वाहतूक सुरळीत करण्याचे काम न करता केवळ दंडवसुलीत मग्न असतात.जनावरांची धरपकड मोहीम नाहीचमोकाट जनावरे आणि श्वानांनी शहरात हैदोस घातला असताना पावसाळा संपत आला तरी पालिकेकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. गतवर्षी पालिकेने जनावरांची धरपकड करून पशुपालकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी मात्र, नगरपालिकेचा संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. एखाद्या अपघाताची पालिकेला प्रतीक्षा असावी, अशी संतप्त प्रतिक्रिया अभियंता नीरज पाबळे यांनी व्यक्त केली.