शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शहराला आले गोठ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

बुधवारी दाते मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे नगरपालिकेकडे जाणाऱ्या दोन ते अडीच किलोमीटर मार्गापर्यंत विविध ठिकाणी शेकडोवर जनावरे ठिय्या देऊन होती. जनावरांनी शहरवासीयांना वेठीस धरले असताना, तसेच अपघाताची शक्यता असताना पशुपालकांना देणे-घेणे नाही.

ठळक मुद्देरहदारी असुरक्षित : चौक आणि विविध रस्त्यांवर जनावरांचा कब्जा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील विविध रस्त्यांवर जनावरांकडून अघोषित ‘रास्तारोको’ केला जात असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडत असून रहदारी असुरक्षित झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रक पोलिस शाखेचे सोईस्कर दुर्लक्ष आहे.पावसामुळे निर्माण होणारे चिखलमय वातावरण म्हणून पावसाळ्यात दरवर्षीच पाळीव, मोकाट जनावरे शहरातील महत्त्वपूर्ण आर्वी नाका चौक, आरती चौक, धुनिवाले चौक, आर्वी मार्ग, शहरातून जाणारा एकमेव प्रमुख मार्ग आदी ठिकाणी दररोज जनावरांचे कळप रस्त्यावर असतात. एकावेळी १५ ते २० व त्यापेक्षा जनावरे रस्त्यावर, चौकात उभी राहत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच वाट काढावी लागत आहे. यात सांडही राहत असल्याने बऱ्याचवेळा जनावरांच्या टक्कर होतात. ठाकरे मार्केटसमोरील व आर्वी मार्गावर हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. बुधवारी दाते मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे नगरपालिकेकडे जाणाऱ्या दोन ते अडीच किलोमीटर मार्गापर्यंत विविध ठिकाणी शेकडोवर जनावरे ठिय्या देऊन होती. जनावरांनी शहरवासीयांना वेठीस धरले असताना, तसेच अपघाताची शक्यता असताना पशुपालकांना देणे-घेणे नाही. या जनावरांना ते पहाटेच गोठ्याबाहेर काढतात. ही जनावरे थेट शहर गाठत विविध ठिकाणी ठाण मांडून बसतात. वाहनचालकांनी हॉर्न वाजवूनही ती जागची हलत नाहीत. यापूर्वी या मोकाट, पाळीव जनावरांमुळे अनेक अपघात झाले आहेत.मोकाट, पाळीव जनावरांचा बंदोबस्त करून दंडात्मक कारवाई करण्याचा पालिकेचा अधिकार असताना, हा विभागही झोपेत आहे. त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला नाही.पाच-दहा कि.मी. च्या परिघात हजारावर जनावरेशहरातील पाच-दहा किलोमीटरच्या अंतरात दररोज हजारावर जनावरे ठाण मांडून बसत आहेत. यामुळे वाहनधारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहेत. निम्म्या रस्त्यावर जनावरांचा कब्जा, याचवेळी विरुद्ध दिशेने मोठे वाहन आल्यास दुचाकीचालकांना वाट कोठून काढावी, असा प्रश्न पडतो. मोकाट जनावरांचा पालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वर्धेकर नागरिकांंनी केली आहे.वाहतूक पोलिस दंडवसुलीत व्यस्तवाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलिसांची आहे. असे असताना शहरातील अनेक चौकात वाहतूक पोलिस शोधूनही सापडत नाहीत. जेथे कर्तव्यावर आहेत, तेथे वाहतूक सुरळीत करण्याचे काम न करता केवळ दंडवसुलीत मग्न असतात.जनावरांची धरपकड मोहीम नाहीचमोकाट जनावरे आणि श्वानांनी शहरात हैदोस घातला असताना पावसाळा संपत आला तरी पालिकेकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. गतवर्षी पालिकेने जनावरांची धरपकड करून पशुपालकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी मात्र, नगरपालिकेचा संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. एखाद्या अपघाताची पालिकेला प्रतीक्षा असावी, अशी संतप्त प्रतिक्रिया अभियंता नीरज पाबळे यांनी व्यक्त केली.