शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

अन् हरवतोय पक्ष्यांचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:11 IST

वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे.

ठळक मुद्देसिमेंट काँक्रिटचे जंगल वाढतीवर : वृक्ष व पक्षीप्रेमींकडून वर्तविली जातेय चिंता

आॅनलाईन लोकमतवर्धा : वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. इतकेच नव्हे तर वर्धा शहरात वाढत असलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल व सुरू असलेली वृक्षतोड यामुळे अनेकांना भुरळ लावणाऱ्या पक्ष्यांचा निवाराच हिरावला जात आहे.भारतीय संस्कृतीत झाडाचे वेगळे महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर आयुर्वेदाचे जनक महर्षी चरक यांनीही वातावरणाच्या शुद्धतेसाठी झाडाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मात्र, मनुष्यासह प्राणी व पक्ष्यांना प्राणवायू देणाºया मोठाल्या वृक्षांची विकासाच्या नावालाखी कत्तल केली जात असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर वर्धा शहरासह परिसरात झपाट्याने सिमेंट काँक्रीटचे जंगलही वाढत असल्याचे वास्तव आहे. शहर परिसरातील अवैध वृक्ष कत्तल आणि दिवसेंदिवस वाढत असलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल यामुळे सध्या शहराच्या आजूबाजूला व शहरात नेहमी दिसणाऱ्या विविध व आकर्षक पक्ष्यांचा निवाराच हरवित आहे. त्यामुळे एक एक रोपट लावून त्याचे संगोपन करणारे वृक्ष प्रेमी आणि पक्षी प्रेमींकडून चिंता वर्तविली जात आहे.निवृत्त अभियंत्यांचा ‘तो’ प्रयोग पुन्हा करणे गरजेचेविकास कामादरम्यान ज्या ठिकाणी विकास काम होत आहे तेथील कामही पूर्ण व्हावे आणि त्या परिसरातील वृक्ष जीवंत रहावे या उद्देशाने सुमारे साडे तीन वर्षांपूर्वी एका कनिष्ठ अभियंत्यांनी शहरात अनोखा प्रयोग केला होता. त्यांचा तो प्रयोग यशस्वीही झाला. वृक्षांचे महत्त्व ओळखून बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता विकास गुंजेवार यांनी जिल्हा न्यायालय परिसरात विकास कामात बाधा ठरणारे पिंपळाचे वृक्ष त्याकाळात विविध यंत्रांच्या सहाय्याने मुळासकट उपडून ते दुसºया ठिकाणी लावले. सध्या हे वृक्ष जीवंत असून त्यांचा तो प्रयोग वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने फायद्याचा असल्याने पुन्हा नव्या जोमाने तो सध्या राबविण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात.वास्तुची जागा आणि झाडंज्या जागी तुळशीचे रोप असेल तेथे घर बांधणे केव्हाही उत्तम असते. कारण तुळस आपल्या चारी बाजूचे ५० मीटरपर्यंतचे वातावरण शुद्ध ठेवते. शास्त्रातही हे रोप फारच पवित्र मानण्यात आले आहे.घराजवळ नेहमी अशोक किंवा शमीचे झाड लावल्याने विविध दोष दूर होतात.आंबा, कडूनिंब, बेहेडा, पिंपळ, अगस्त, चिंच ही झाडे घराजवळ असणे चांगले नसते.ज्या जमिनीवर पपई, आवळा, पेरू, डाळिंब, पलाश आदी वृक्ष जास्त प्रमाणात असतात ती जागा वास्तुशास्त्रात चांगली मानली जाते.ज्या वृक्षांवर फुलं येतात आणि वेल व वनस्पती सरळ वाढत जाते ती जमीनसुद्धा वास्तुशास्त्रात चांगल मानले जाते.