शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

अन् हरवतोय पक्ष्यांचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:11 IST

वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे.

ठळक मुद्देसिमेंट काँक्रिटचे जंगल वाढतीवर : वृक्ष व पक्षीप्रेमींकडून वर्तविली जातेय चिंता

आॅनलाईन लोकमतवर्धा : वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. इतकेच नव्हे तर वर्धा शहरात वाढत असलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल व सुरू असलेली वृक्षतोड यामुळे अनेकांना भुरळ लावणाऱ्या पक्ष्यांचा निवाराच हिरावला जात आहे.भारतीय संस्कृतीत झाडाचे वेगळे महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर आयुर्वेदाचे जनक महर्षी चरक यांनीही वातावरणाच्या शुद्धतेसाठी झाडाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मात्र, मनुष्यासह प्राणी व पक्ष्यांना प्राणवायू देणाºया मोठाल्या वृक्षांची विकासाच्या नावालाखी कत्तल केली जात असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर वर्धा शहरासह परिसरात झपाट्याने सिमेंट काँक्रीटचे जंगलही वाढत असल्याचे वास्तव आहे. शहर परिसरातील अवैध वृक्ष कत्तल आणि दिवसेंदिवस वाढत असलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल यामुळे सध्या शहराच्या आजूबाजूला व शहरात नेहमी दिसणाऱ्या विविध व आकर्षक पक्ष्यांचा निवाराच हरवित आहे. त्यामुळे एक एक रोपट लावून त्याचे संगोपन करणारे वृक्ष प्रेमी आणि पक्षी प्रेमींकडून चिंता वर्तविली जात आहे.निवृत्त अभियंत्यांचा ‘तो’ प्रयोग पुन्हा करणे गरजेचेविकास कामादरम्यान ज्या ठिकाणी विकास काम होत आहे तेथील कामही पूर्ण व्हावे आणि त्या परिसरातील वृक्ष जीवंत रहावे या उद्देशाने सुमारे साडे तीन वर्षांपूर्वी एका कनिष्ठ अभियंत्यांनी शहरात अनोखा प्रयोग केला होता. त्यांचा तो प्रयोग यशस्वीही झाला. वृक्षांचे महत्त्व ओळखून बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता विकास गुंजेवार यांनी जिल्हा न्यायालय परिसरात विकास कामात बाधा ठरणारे पिंपळाचे वृक्ष त्याकाळात विविध यंत्रांच्या सहाय्याने मुळासकट उपडून ते दुसºया ठिकाणी लावले. सध्या हे वृक्ष जीवंत असून त्यांचा तो प्रयोग वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने फायद्याचा असल्याने पुन्हा नव्या जोमाने तो सध्या राबविण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात.वास्तुची जागा आणि झाडंज्या जागी तुळशीचे रोप असेल तेथे घर बांधणे केव्हाही उत्तम असते. कारण तुळस आपल्या चारी बाजूचे ५० मीटरपर्यंतचे वातावरण शुद्ध ठेवते. शास्त्रातही हे रोप फारच पवित्र मानण्यात आले आहे.घराजवळ नेहमी अशोक किंवा शमीचे झाड लावल्याने विविध दोष दूर होतात.आंबा, कडूनिंब, बेहेडा, पिंपळ, अगस्त, चिंच ही झाडे घराजवळ असणे चांगले नसते.ज्या जमिनीवर पपई, आवळा, पेरू, डाळिंब, पलाश आदी वृक्ष जास्त प्रमाणात असतात ती जागा वास्तुशास्त्रात चांगली मानली जाते.ज्या वृक्षांवर फुलं येतात आणि वेल व वनस्पती सरळ वाढत जाते ती जमीनसुद्धा वास्तुशास्त्रात चांगल मानले जाते.