शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

हातांच्या थरथरत्या स्पर्शाने चित्रप्रदर्शन संपते.....

By admin | Updated: January 30, 2016 02:26 IST

चित्र जास्त बोलकी असतात शब्दांपेक्षा. त्यामुळे सबंध सेवाग्राम आश्रम फिरल्यावर प्रत्येकाची पावले लगबगीने महात्मा गांधी चित्रप्रदर्शनाकडे वळतात.

हुतात्मा दिन विशेष : समाजाचे नैतिक अध:पतन रोखण्याकरिता गांधीविचार हाच पर्यायपराग मगर वर्धाचित्र जास्त बोलकी असतात शब्दांपेक्षा. त्यामुळे सबंध सेवाग्राम आश्रम फिरल्यावर प्रत्येकाची पावले लगबगीने महात्मा गांधी चित्रप्रदर्शनाकडे वळतात. गांधीजींचा जीवनपट सुरू होतो. पहायला गेलं तर जास्तीत जास्त १० मिनिटही लागत नाही चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी. या १० मिनिटात मन कितीतरी वर्षांचा प्रवास करून येतं. चित्रप्रदर्शनाच्या अंतीम टप्प्यावर गांधीजींच्या निधनाची काही चित्र पाहताना, त्यांना स्पर्श करताना हात थरथरतो. प्रदर्शन संपते. पण मनात खोलवर मुरत मुरत जाते...महात्मा गांधी यांच्या चित्ररूपी आठवणी, दस्तावेज, नोंदी आदींचे महात्मा गांधी चित्रप्रदर्शनात एकत्रीकरण करण्यात आले आहे. सहज आणि सोप्प्या पद्धतीने महात्मा गांधी सर्वांना कळावे यासाठी हे चित्रप्रदर्शन तयार करण्यात आले. दररोज शेकडो नागरिक या प्रदर्शनाला भेटी देतात. महात्मा गांधी यांच्या बालपणाने हा प्रवास सुरू होतो. त्यांच्या पोरबंदर येथील टुमदार घराची प्रतिकृती, गांधीजींचं शिक्षण, असा हा प्रवास पुढे त्यांना टे्रनमधून हाकलून देण्याच्या प्रसंगाला पुढे घेत मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळ, त्यांनी भोगलेला तुरूंगवास असा प्रवास होत शेवटी सगळे पोहोचतात ते ३० जानेवारी १९४८ या दिवसावर. याच दिवशी गांधीजींची हत्या झाली. त्या छायाचित्रांना स्पर्श करताना अनेकांचे हात थरथरतात. गांधींजी आपल्यात नाही याची जाणीव होते. त्यामुळे प्रदर्शनातून बाहेर आल्यावरही मन महात्मा गांधींमध्ये अडकून राहातं. आज महात्मा गांधी यांना जाऊन ६८ वर्ष लोटली. पण ते त्यांचं अस्तित्व चित्ररूपातून जाणवत असल्याची भावना चित्रप्रदर्शन पाहणारे नागरिक व्यक्त करतात. पवनारचा स्तंभ देतो आठवणींना उजाळा ३० जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अस्थिरक्षा पवनार येथील धाम पात्रात शिरवून येथे गोमुख कुंड आणि महात्मा गांधी समाधी स्तंभाची निर्मिती झाली. त्यानंतर १२ फेब्रुवारीला महात्मा गांधी यांच्या तेराव्या दिवसाचे औचित्य साधून सर्वोदय मेळा सुरू झाला. त्यामुळे हा स्तंभ आजही महात्मा गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देतो. बांधकाम विभागाने हे बांधकाम केले. पण सदर काम कधी झाले, कुणाच्या हस्ते झाले याची कुठलीही नोंद येथे नाही. गांधींचे विचारच सर्व प्रश्नांवर उपायजगभरात भयानक दहशतवाद बोकाळला आहे. देशात सध्या असलेली अस्थिरता सामान्य माणसांपासून लपलेली नाही. जल जंगल, जमीन यांचे दोहन भयानक पातळीवर होत आहे. अश्या परिस्थितीते सर्व देश गांधी विचारांकडे झुकत चालले आहे. त्यामुळेच गांधी विचारांची प्रासंगीकता लक्षात घेऊन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच प्रशिक्षण वर्ग, निसर्गाचा अभ्यास, महिला वर्गाला प्रबोधन, दारूबंदी चळवळ आणि गांधीजींची जीवनशैली आदी कार्यक्रम व उपक्रम राबविणे सुरू केले आहे. आजच्या दिवशी त्यांच्या विचारांची गरज प्रकर्शाने जाणवते अश्या भावना सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी व्यक्त केल्या. गांधींच्या विचारांची प्रासंगिकता अधिक वाढली आहेमहात्मा गांधी यांना जाऊन आज ६८ वर्ष लोटली. आज मागे वळून पाहताना देशातच नाही तर सम्पूर्ण जगात अस्थिरता पसरली आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. ही अस्थिरता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकही आहे. या सर्वांची घडी नीट बसविण्याचं सामर्थ्य गांधी तत्वज्ञानात आहे. गांधी विचारातच या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहे. सत्तेवर आलेल्या प्रत्येकाने केवळ गांधीजींची प्रतीमा समोर ठेवून नाही तर त्यांचे विचार समोर ठेवून कृती करण्याची गरज आहे. सगळीकडे नैतिक अध:पतन होत आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. याची उत्तरे शोधण्यासाठीच गांधी आश्रमात येण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यावेळी गांधी विचारांची प्रासंगीकता अधिक वाढली आहे अश्या भावना सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव मागे वळून पाहताना व्यक्त करतात.