शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हातांच्या थरथरत्या स्पर्शाने चित्रप्रदर्शन संपते.....

By admin | Updated: January 30, 2016 02:26 IST

चित्र जास्त बोलकी असतात शब्दांपेक्षा. त्यामुळे सबंध सेवाग्राम आश्रम फिरल्यावर प्रत्येकाची पावले लगबगीने महात्मा गांधी चित्रप्रदर्शनाकडे वळतात.

हुतात्मा दिन विशेष : समाजाचे नैतिक अध:पतन रोखण्याकरिता गांधीविचार हाच पर्यायपराग मगर वर्धाचित्र जास्त बोलकी असतात शब्दांपेक्षा. त्यामुळे सबंध सेवाग्राम आश्रम फिरल्यावर प्रत्येकाची पावले लगबगीने महात्मा गांधी चित्रप्रदर्शनाकडे वळतात. गांधीजींचा जीवनपट सुरू होतो. पहायला गेलं तर जास्तीत जास्त १० मिनिटही लागत नाही चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी. या १० मिनिटात मन कितीतरी वर्षांचा प्रवास करून येतं. चित्रप्रदर्शनाच्या अंतीम टप्प्यावर गांधीजींच्या निधनाची काही चित्र पाहताना, त्यांना स्पर्श करताना हात थरथरतो. प्रदर्शन संपते. पण मनात खोलवर मुरत मुरत जाते...महात्मा गांधी यांच्या चित्ररूपी आठवणी, दस्तावेज, नोंदी आदींचे महात्मा गांधी चित्रप्रदर्शनात एकत्रीकरण करण्यात आले आहे. सहज आणि सोप्प्या पद्धतीने महात्मा गांधी सर्वांना कळावे यासाठी हे चित्रप्रदर्शन तयार करण्यात आले. दररोज शेकडो नागरिक या प्रदर्शनाला भेटी देतात. महात्मा गांधी यांच्या बालपणाने हा प्रवास सुरू होतो. त्यांच्या पोरबंदर येथील टुमदार घराची प्रतिकृती, गांधीजींचं शिक्षण, असा हा प्रवास पुढे त्यांना टे्रनमधून हाकलून देण्याच्या प्रसंगाला पुढे घेत मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळ, त्यांनी भोगलेला तुरूंगवास असा प्रवास होत शेवटी सगळे पोहोचतात ते ३० जानेवारी १९४८ या दिवसावर. याच दिवशी गांधीजींची हत्या झाली. त्या छायाचित्रांना स्पर्श करताना अनेकांचे हात थरथरतात. गांधींजी आपल्यात नाही याची जाणीव होते. त्यामुळे प्रदर्शनातून बाहेर आल्यावरही मन महात्मा गांधींमध्ये अडकून राहातं. आज महात्मा गांधी यांना जाऊन ६८ वर्ष लोटली. पण ते त्यांचं अस्तित्व चित्ररूपातून जाणवत असल्याची भावना चित्रप्रदर्शन पाहणारे नागरिक व्यक्त करतात. पवनारचा स्तंभ देतो आठवणींना उजाळा ३० जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अस्थिरक्षा पवनार येथील धाम पात्रात शिरवून येथे गोमुख कुंड आणि महात्मा गांधी समाधी स्तंभाची निर्मिती झाली. त्यानंतर १२ फेब्रुवारीला महात्मा गांधी यांच्या तेराव्या दिवसाचे औचित्य साधून सर्वोदय मेळा सुरू झाला. त्यामुळे हा स्तंभ आजही महात्मा गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देतो. बांधकाम विभागाने हे बांधकाम केले. पण सदर काम कधी झाले, कुणाच्या हस्ते झाले याची कुठलीही नोंद येथे नाही. गांधींचे विचारच सर्व प्रश्नांवर उपायजगभरात भयानक दहशतवाद बोकाळला आहे. देशात सध्या असलेली अस्थिरता सामान्य माणसांपासून लपलेली नाही. जल जंगल, जमीन यांचे दोहन भयानक पातळीवर होत आहे. अश्या परिस्थितीते सर्व देश गांधी विचारांकडे झुकत चालले आहे. त्यामुळेच गांधी विचारांची प्रासंगीकता लक्षात घेऊन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच प्रशिक्षण वर्ग, निसर्गाचा अभ्यास, महिला वर्गाला प्रबोधन, दारूबंदी चळवळ आणि गांधीजींची जीवनशैली आदी कार्यक्रम व उपक्रम राबविणे सुरू केले आहे. आजच्या दिवशी त्यांच्या विचारांची गरज प्रकर्शाने जाणवते अश्या भावना सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी व्यक्त केल्या. गांधींच्या विचारांची प्रासंगिकता अधिक वाढली आहेमहात्मा गांधी यांना जाऊन आज ६८ वर्ष लोटली. आज मागे वळून पाहताना देशातच नाही तर सम्पूर्ण जगात अस्थिरता पसरली आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. ही अस्थिरता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकही आहे. या सर्वांची घडी नीट बसविण्याचं सामर्थ्य गांधी तत्वज्ञानात आहे. गांधी विचारातच या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहे. सत्तेवर आलेल्या प्रत्येकाने केवळ गांधीजींची प्रतीमा समोर ठेवून नाही तर त्यांचे विचार समोर ठेवून कृती करण्याची गरज आहे. सगळीकडे नैतिक अध:पतन होत आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. याची उत्तरे शोधण्यासाठीच गांधी आश्रमात येण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यावेळी गांधी विचारांची प्रासंगीकता अधिक वाढली आहे अश्या भावना सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव मागे वळून पाहताना व्यक्त करतात.