शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

गांधी जिल्ह्यातील वृक्ष देणार विदेशात सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:40 IST

वर्धा जिल्ह्याला गांधीजी व विनोबांचा वारसा लाभला असल्याने त्यांचे विचार हे सातासमुद्रापार पोहोचले आहे. आता तर येथील नर्सरीत उगविलेल्या रोपांची विदेशातही निर्यात होऊ लागल्याने हे रोप मोठे होऊन विदेशात सावली देणार आहे.

ठळक मुद्देहिंगणघाटच्या रोपट्यांची ब्राझीलमध्ये निर्यातदिगांबर खांडरे यांनी नोकरी सोडून फुलविली नर्सरी

भास्कर कलोडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा जिल्ह्याला गांधीजी व विनोबांचा वारसा लाभला असल्याने त्यांचे विचार हे सातासमुद्रापार पोहोचले आहे. त्यामुळेच या जिल्ह्याचे देशपातळीवर नावलौकीक आहे. आता तर येथील नर्सरीत उगविलेल्या रोपांची विदेशातही निर्यात होऊ लागल्याने हे रोप मोठे होऊन विदेशात सावली देणार आहे.हिंगणघाट येथील दिगांबर खांडरे यांची राष्ट्रीय महामार्गावरील वणानदी लगत ३५ एकर शेती आहे. त्यांनी या शेतीत सुरुवातीला १० हजार फुट जागेवर स्नेहल नर्सरी तयार केली. १९९२ पासून सुरु झालेली ही नर्सरी दिवसेंदिवस बहरतच गेली. त्यांच्याकडील शेती कमी पडू लागल्याने त्यांनी ३० एकर शेती किरायाने घेतली आहे. आता ही नर्सरी तब्बल ५५ एकर परिसरात पसरली आहे. या नर्सरीत जवळपास ५०० ते ५५० प्रजातीचे ५५ ते ६० लाख रोप उपलब्ध आहेत. १ फुटापासून तर १५ फुटांपर्यंत असलेल्या या रोपांना व झाडांना मोठी मागणी आहे. या नर्सरीतून महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा यासह आता विदेशातही रोपांचा पुरवठा केल्या जातो. नुकताच या नर्सरीतील बांबूचे ६ ते ८ फुट उंचीचे १५०० तर पहाडी भागाला हिरवे गार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वडेलिया या प्रजातीचे ५ लाख रोपे ब्राझीलला पाठविण्यात आले आहे. या रोपांची लागवड ब्राझीलच्या एका रिसॉर्टमध्ये केली जाणार आहे. जयपूर येथील संस्थेच्या माध्यमातून या रोपांची मागणी नोंदविण्यात आली होती. स्नेहन नर्सरीतून इतक्या मोठ्या प्रमाणात रोपांची निर्यात केल्याने त्यांच्या नर्सरीकडे अनेकांचा ओघ वाढला आहे.

वृक्षाबद्दलची आवडच झाली व्यवसायस्नेहल नर्सरीचे मालक दिगांबर खांडरे हे वनविभागात लेखापाल म्हणून कार्यरत होते. त्यांना वृक्षाबद्दल आवड असल्याने त्यांनी १९९२ मध्ये नर्सरी सुरु केली. पण, नर्सरीतील हिरवळ पाहून दिगांबर यांचे मन नोकरीत रमत नव्हते त्यामुळे त्यांनी २००३ मध्ये नोकरी सोडून पुर्णवेळ नर्सरीकडेच लक्ष केंद्रीत केले. त्यांना आता कृषी पदविका प्राप्त असलेले शशांक व शुभांक हे दोन्ही मुल मदत करीत आहे. मोठा मुलगा शशांक हा नर्सरीची देखभाल तर लहान मुलगा शुभांक हा माकेटींग सांभाळतो. या तिनही बापलेकांच्या मेहनतीने त्यांच्या या नसरी व्यवसायातून वर्षाकाठी अडीच ते तीन कोटींची उलाढाल होते. दिगांबर खांडरे यांच्या या अलौकीक कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार व सुंदलाल बहूगुणा हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.ग्राहकांच्या मागणीनुसार नर्सरीतून रोपांचा पुरवठा केल्या जातो. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी रोप पोहोचवून देण्याची आमची जबाबदारी असून ती चोखपणे पार पाडत असल्याने रोपांचीही मागणी वाढत आहे. नुकाताच मागणीनुसार ब्राझीललाही रोपे पाठविण्यात आली आहे. महाराष्ट्रातून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात रोपांची निर्यात होत असावी.दिगांबर खांडरे, शेतकरी, हिंगणघाट

वर्षभरासाठी ७० मजुरांना दिला रोजगारशासकीय नोकरी सोडून जमिनीवर हिरवळ फुलविण्यासोबतच इतरांच्याही आयुष्यात हिरवळ फुलवावी, यासाठी मजुरांना जवळ केले. त्यांनी वर्षभरासाठी ६५ ते ७० मजुरांना रोजगार दिला आहे. यातील पन्नास टक्के मजूर स्थानिक तर पन्नास टक्के मजूर बाहेरील असल्याचे सांगण्यात आले आहे. या नर्सरीमुळे या मजुरांना नियमित रोजगार मिळत असल्याने त्यांचेही जीवन सुखकर झाले आहे.

हिंगणघाट सारख्या लहानशा शहरात इतकी मोठी नर्सरी तयार करुन त्यात विविध प्रजातीचे लाखो रोप व वृक्ष आहेत. दिगांबर खांडरे यांनी उत्तमरित्या ही नर्सरी फुलविली असून येथील रोप विदेशात पाठविणे ही गौरवास्पद बाब आहे. त्यांच्या हे कार्य इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरणारे आहे.समीर कुणावार, आमदार हिंगणघाट.

टॅग्स :agricultureशेती