शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

सेवाग्रामला मिळणार पायाभूत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:08 AM

महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यात वरुड व पवनार गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु बापूंची कर्मभूमी राहिलेले सेवाग्राम हे गाव या आराखड्यातून बाद झाले होते.

ठळक मुद्दे१० कोटींची तरतूद : जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामसभेत ठराव घेण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यात वरुड व पवनार गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु बापूंची कर्मभूमी राहिलेले सेवाग्राम हे गाव या आराखड्यातून बाद झाले होते. त्यामुळे सेवाग्राम वासियांनी नाराजी व्यक्त करीत पाठपुरावा केला असता सेवाग्राम गावाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच १० कोटींची तरतुद करुन गावातील कामांचा प्राधान्यक्र म ठरवून ग्रामसभेत ठराव घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला करण्यात आल्या आहे.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वरूड व पवनार या गावांसह सेवाग्राम आश्रमपर्यंतच्याच विकास कामांचा अंतर्भाव करण्यात आला होता. त्यामुळे आश्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेवाग्राम या गावातही पायाभूत सुविधा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. याबाबत सेवाग्रामवासीयांनी खासदार रामदास तडस आणि आमदार रणजित कांबळे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करीत पायाभूत सुविधा देण्याची मागणी केली. तेव्हा या दोन्ही लोकप्रतिनिंधींनी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर सेवाग्राम गावातही पायाभूत सुविधांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. सेवाग्राम ग्रामपंचायतने योजलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करुन सादर करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन समितीच्यावतीने सेवाग्राम विकास आराखडाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार मे.अडारकर असोसिएट यांना दिल्या आहे. तसेच ग्रामपंचायतने १० कोटीच्या मर्यादेतील कामाचा प्राधान्यक्रम ठरवून ग्रामसभेचा ठराव घ्यावा. तसेच तो ठराव अंदाजपत्रकीय प्रस्तावासोबत सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहे. या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडून सेवाग्राम ग्रामपंचायतलाही पत्र प्राप्त झाले असून आता कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सेवाग्राम गावातही पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने गावाचाही कायापालट होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.खासदार-आमदारांचा पाठपुरावाखा.रामदास तडस यांनी वित्त व नियोजन मंत्री यांना सेवाग्राम येथे पायाभूत सुविधेसाठी ३४ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देण्याबाबत विनती केली होती. वित्त मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली होती. सेवाग्राम हे गाव आ.रणजित कांबळे यांच्या मतदार संघातील असल्याने सेवाग्राम विकास आराखडयात सेवाग्राममध्ये सहा कामांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी पत्राद्वारे कार्यालयाकडे केली होती. या मागणीची निवेदने कार्यवाहीसाठी मे. अडारकर असोसिएट यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. यात सेवाग्राम ग्रामपंचायतकडून पायाभूत सुविधा कामाचे प्राधान्यक्रम ठरवावे. जागेची पाहणी करुन उपयोगिता प्रमाणे कामाच्या अंदाज पत्रकासह आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आले आहे.पाठपुराव्याला आले यशसेवाग्राममध्ये गांधीजींचे वास्तव्य आणि कार्य राहीले आहे. सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये सेवाग्राम गावातील विकास कामांचा अंतर्भाव नव्हता. सरपंच रोशना जामलेकर, जि.प.सदस्य विजय आगलावे पं.स.सदस्य भारती उगले, उपसरपंच संजय गवयी व सर्व सदस्य आणि गावकऱ्यांनी हा प्रश्न लावून धरला होता. यासंदर्भात वेळोवेळी निवेदने दिली. मुंबईत खा.रामदास तडस यांच्या उपस्थितीत वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घेऊन मागणी केली होती.गावकऱ्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला होता. आता या कामाला यश आल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी