शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

सेवाग्रामला मिळणार पायाभूत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:11 IST

महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यात वरुड व पवनार गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु बापूंची कर्मभूमी राहिलेले सेवाग्राम हे गाव या आराखड्यातून बाद झाले होते.

ठळक मुद्दे१० कोटींची तरतूद : जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामसभेत ठराव घेण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यात वरुड व पवनार गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु बापूंची कर्मभूमी राहिलेले सेवाग्राम हे गाव या आराखड्यातून बाद झाले होते. त्यामुळे सेवाग्राम वासियांनी नाराजी व्यक्त करीत पाठपुरावा केला असता सेवाग्राम गावाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच १० कोटींची तरतुद करुन गावातील कामांचा प्राधान्यक्र म ठरवून ग्रामसभेत ठराव घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला करण्यात आल्या आहे.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वरूड व पवनार या गावांसह सेवाग्राम आश्रमपर्यंतच्याच विकास कामांचा अंतर्भाव करण्यात आला होता. त्यामुळे आश्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेवाग्राम या गावातही पायाभूत सुविधा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. याबाबत सेवाग्रामवासीयांनी खासदार रामदास तडस आणि आमदार रणजित कांबळे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करीत पायाभूत सुविधा देण्याची मागणी केली. तेव्हा या दोन्ही लोकप्रतिनिंधींनी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर सेवाग्राम गावातही पायाभूत सुविधांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. सेवाग्राम ग्रामपंचायतने योजलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करुन सादर करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन समितीच्यावतीने सेवाग्राम विकास आराखडाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार मे.अडारकर असोसिएट यांना दिल्या आहे. तसेच ग्रामपंचायतने १० कोटीच्या मर्यादेतील कामाचा प्राधान्यक्रम ठरवून ग्रामसभेचा ठराव घ्यावा. तसेच तो ठराव अंदाजपत्रकीय प्रस्तावासोबत सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहे. या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडून सेवाग्राम ग्रामपंचायतलाही पत्र प्राप्त झाले असून आता कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सेवाग्राम गावातही पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने गावाचाही कायापालट होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.खासदार-आमदारांचा पाठपुरावाखा.रामदास तडस यांनी वित्त व नियोजन मंत्री यांना सेवाग्राम येथे पायाभूत सुविधेसाठी ३४ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देण्याबाबत विनती केली होती. वित्त मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली होती. सेवाग्राम हे गाव आ.रणजित कांबळे यांच्या मतदार संघातील असल्याने सेवाग्राम विकास आराखडयात सेवाग्राममध्ये सहा कामांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी पत्राद्वारे कार्यालयाकडे केली होती. या मागणीची निवेदने कार्यवाहीसाठी मे. अडारकर असोसिएट यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. यात सेवाग्राम ग्रामपंचायतकडून पायाभूत सुविधा कामाचे प्राधान्यक्रम ठरवावे. जागेची पाहणी करुन उपयोगिता प्रमाणे कामाच्या अंदाज पत्रकासह आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आले आहे.पाठपुराव्याला आले यशसेवाग्राममध्ये गांधीजींचे वास्तव्य आणि कार्य राहीले आहे. सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये सेवाग्राम गावातील विकास कामांचा अंतर्भाव नव्हता. सरपंच रोशना जामलेकर, जि.प.सदस्य विजय आगलावे पं.स.सदस्य भारती उगले, उपसरपंच संजय गवयी व सर्व सदस्य आणि गावकऱ्यांनी हा प्रश्न लावून धरला होता. यासंदर्भात वेळोवेळी निवेदने दिली. मुंबईत खा.रामदास तडस यांच्या उपस्थितीत वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घेऊन मागणी केली होती.गावकऱ्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला होता. आता या कामाला यश आल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी