शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:39 IST

मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमाचा शुभारंभ समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे झाला. या कार्यक्रमात समुद्रपूरचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून तलावातून गाळ काढण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहन : ‘अनुलोम’च्या मदतीने ग्रामपंचायतींचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमाचा शुभारंभ समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे झाला. या कार्यक्रमात समुद्रपूरचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून तलावातून गाळ काढण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.यावेळी मंचावर नायब तहसीलदार सूर्यवंशी, सरपंच सविता डडमल, उपसरपंच प्रमोद डफ, सुनील डुकरे, प्रकाश पाहुणे, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता एस.एम. धसे, शाखा अभियंता ए.आर. कठाळे, कनिष्ठ अभियंता अश्विन पवार, अनुगामी लोकराज्य महाअभियानचे (अनुलोम) जनसेवक हेमंत ब्राम्हणकर, अश्विन सवालाखे, प्रविण पोहाणे, दिलीप तिमांडे आदी उपस्थित होते. राष्टÑसंत तुकडोजी व गाडगे महाराजांच्या पूजनाने या सोहळ्याला प्रारंभ झाला.‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून मृद व जलसंधारणासह लोकसहभागातून मनसंधारणही शक्य आहे. यामुळे गावातील विकासकामांना गती येते. दुष्काळाची संकटे, घसरत चाललेला जमिनीचा पोत, घटलेली पिकांची उत्पादकता लक्षात घेता काळाची गरज म्हणून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ सारख्या योजना संजीवन ठरताहेत. अशा उपक्रम वजा योजनांमुळे ग्रामस्थांच्या लोकसहभागातील कामांमुळे अन्य विकासकामांनाही गती मिळते. अशा जलदायी योजनांचा ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी पुरेपुर लाभ घेण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार दीपक कारंडे यांनी केले.प्रा. विजय कुंभलकर आणि अनुलोमचे हेमंत ब्राम्हणकर यांनी प्रास्ताविकातून या योजनेचे नियोजन तथा उद्देशाची माहिती दिली. यावेळी लघुसिंचन विभागाचे अधिकाºयांनी उपस्थितांना गाळ काढण्याबाबतची तांत्रिक माहिती देत त्याचे महत्त्व पटवून दिले.ग्रामविकास अधिकारी अनिल बालपांडे यांनी संचालन केले तर उपसरपंच प्रमोद डफ यांनी आभार मानले. यावेळी गावातील नारायण पाहुणे, सदानंद जंगरी, भारत कुंभलकर, हेमंत पाहुणे, माणिक चमडे, व्यंकटेश चमडे, प्रमोद पाहुणे, गणेश काठोळे, गोपाल डफ, सुधाकर तडस, श्रावण दांडेकर, गणेश वाघमारे, बाबाराव वरभे यांचा सत्कार करण्यात आला.साखरा तलावक्षेत्रातही कार्यारंभसाखरा (ता. समुद्रपूर) येथील तलावक्षेत्रातही जेसीबी पूजनाने या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी मंचावर सरपंच शुभांगी कढाणे, उपसरपंच महेंद्र भगत, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता एस.एम. धसे, शाखा अभियंता ए.आर. कठाळे, कनिष्ठ अभियंता अश्विन पवार, अनुगामी लोकराज्य महाअभियानचे (अनुलोम) जनसेवक हेमंत ब्राम्हणकर, अश्विन सव्वालाखे, प्रवीण पोहाणे, शीलवंत गोवारकर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली गोवारकर, मिना राऊत, सोहन बैस, गजानन ढोले, अंकुश भुजाडे, संध्या चौधरी, शीला धारणे, कृषी पर्यवेक्षक डी.बी. धोटे, कृषी सहाय्यक शेख, किटे, विलास रोहकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी या योजनेस सहकार्य करणारे डोमाजी मुन, शंकर चेनेकर, धनराज तामगाडगे, हरिदास खेळकर, धर्मराज बरडे, संजय बोंडे, शालीक भुजाडे, कृषीपर्यवेक्षक डी.बी. धोटे, कृषी सहाय्यक शेख, किटे आदी उपस्थित होते.अशी आहे योजनाग्रामपंचातींच्या पुढाकाराने ‘अनुलोम’ या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने राज्य शासनाची ही योजना जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी, संस्था आणि ग्रामपंचायतीला या योजनेत सहभागी होता येणार असून त्याची आॅनलाईन अथवा आॅफलाईन नोंदणी करावयाची आहे. गाळ काढण्याच्या कामाकरिता लागणाºया जेसीबीचा डिझेलचा खर्च शासन देणार असून शेतकºयांना गाळही मोफत मिळणार आहे. आपल्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील, कृषी कार्यालयांमध्ये या योजनेची माहिती दिली जाणार आहे.गाळ शेतात टाकण्याचे आवाहनजिल्ह्यातील धरणातून काढण्यात येत असलेला गाळ शेतात टाकण्याकरिता शेतकºयांनी ती गाळयुक्त माती नेण्यात यावी असे आवाहल करण्यात आले आहे.