शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:39 IST

मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमाचा शुभारंभ समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे झाला. या कार्यक्रमात समुद्रपूरचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून तलावातून गाळ काढण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहन : ‘अनुलोम’च्या मदतीने ग्रामपंचायतींचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमाचा शुभारंभ समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे झाला. या कार्यक्रमात समुद्रपूरचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून तलावातून गाळ काढण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.यावेळी मंचावर नायब तहसीलदार सूर्यवंशी, सरपंच सविता डडमल, उपसरपंच प्रमोद डफ, सुनील डुकरे, प्रकाश पाहुणे, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता एस.एम. धसे, शाखा अभियंता ए.आर. कठाळे, कनिष्ठ अभियंता अश्विन पवार, अनुगामी लोकराज्य महाअभियानचे (अनुलोम) जनसेवक हेमंत ब्राम्हणकर, अश्विन सवालाखे, प्रविण पोहाणे, दिलीप तिमांडे आदी उपस्थित होते. राष्टÑसंत तुकडोजी व गाडगे महाराजांच्या पूजनाने या सोहळ्याला प्रारंभ झाला.‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून मृद व जलसंधारणासह लोकसहभागातून मनसंधारणही शक्य आहे. यामुळे गावातील विकासकामांना गती येते. दुष्काळाची संकटे, घसरत चाललेला जमिनीचा पोत, घटलेली पिकांची उत्पादकता लक्षात घेता काळाची गरज म्हणून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ सारख्या योजना संजीवन ठरताहेत. अशा उपक्रम वजा योजनांमुळे ग्रामस्थांच्या लोकसहभागातील कामांमुळे अन्य विकासकामांनाही गती मिळते. अशा जलदायी योजनांचा ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी पुरेपुर लाभ घेण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार दीपक कारंडे यांनी केले.प्रा. विजय कुंभलकर आणि अनुलोमचे हेमंत ब्राम्हणकर यांनी प्रास्ताविकातून या योजनेचे नियोजन तथा उद्देशाची माहिती दिली. यावेळी लघुसिंचन विभागाचे अधिकाºयांनी उपस्थितांना गाळ काढण्याबाबतची तांत्रिक माहिती देत त्याचे महत्त्व पटवून दिले.ग्रामविकास अधिकारी अनिल बालपांडे यांनी संचालन केले तर उपसरपंच प्रमोद डफ यांनी आभार मानले. यावेळी गावातील नारायण पाहुणे, सदानंद जंगरी, भारत कुंभलकर, हेमंत पाहुणे, माणिक चमडे, व्यंकटेश चमडे, प्रमोद पाहुणे, गणेश काठोळे, गोपाल डफ, सुधाकर तडस, श्रावण दांडेकर, गणेश वाघमारे, बाबाराव वरभे यांचा सत्कार करण्यात आला.साखरा तलावक्षेत्रातही कार्यारंभसाखरा (ता. समुद्रपूर) येथील तलावक्षेत्रातही जेसीबी पूजनाने या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी मंचावर सरपंच शुभांगी कढाणे, उपसरपंच महेंद्र भगत, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता एस.एम. धसे, शाखा अभियंता ए.आर. कठाळे, कनिष्ठ अभियंता अश्विन पवार, अनुगामी लोकराज्य महाअभियानचे (अनुलोम) जनसेवक हेमंत ब्राम्हणकर, अश्विन सव्वालाखे, प्रवीण पोहाणे, शीलवंत गोवारकर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली गोवारकर, मिना राऊत, सोहन बैस, गजानन ढोले, अंकुश भुजाडे, संध्या चौधरी, शीला धारणे, कृषी पर्यवेक्षक डी.बी. धोटे, कृषी सहाय्यक शेख, किटे, विलास रोहकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी या योजनेस सहकार्य करणारे डोमाजी मुन, शंकर चेनेकर, धनराज तामगाडगे, हरिदास खेळकर, धर्मराज बरडे, संजय बोंडे, शालीक भुजाडे, कृषीपर्यवेक्षक डी.बी. धोटे, कृषी सहाय्यक शेख, किटे आदी उपस्थित होते.अशी आहे योजनाग्रामपंचातींच्या पुढाकाराने ‘अनुलोम’ या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने राज्य शासनाची ही योजना जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी, संस्था आणि ग्रामपंचायतीला या योजनेत सहभागी होता येणार असून त्याची आॅनलाईन अथवा आॅफलाईन नोंदणी करावयाची आहे. गाळ काढण्याच्या कामाकरिता लागणाºया जेसीबीचा डिझेलचा खर्च शासन देणार असून शेतकºयांना गाळही मोफत मिळणार आहे. आपल्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील, कृषी कार्यालयांमध्ये या योजनेची माहिती दिली जाणार आहे.गाळ शेतात टाकण्याचे आवाहनजिल्ह्यातील धरणातून काढण्यात येत असलेला गाळ शेतात टाकण्याकरिता शेतकºयांनी ती गाळयुक्त माती नेण्यात यावी असे आवाहल करण्यात आले आहे.