शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'संपकाळात' जिल्हा कचेरीतील 'सेवादूत' केंद्र ठरतेय 'आधारवड'; दीड दिवसांत ६५ तक्रारी प्राप्त

By महेश सायखेडे | Updated: March 15, 2023 18:03 IST

जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना

वर्धा : संप काळात तक्रार किंवा निवेदन सादर करण्यासह विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा कचेरीत सेवादूत केंद्रात निवेदन व तक्रारी स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची ही संकल्पना संपकाळात नागरिकांसाठी आधारवड ठरू पाहत आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस असलेल्या बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत सेवादूत केंद्राला एकूण ६५ तक्रारी अथवा निवेदन प्राप्त झाली आहेत. या सर्वच तक्रारींचा झटपट निपटारा कसा होईल या दृष्टीनेही प्रत्यक्ष कार्य होत असल्याचे सांगण्यात आले.जिल्हाधिकारी म्हणाले... मावशी येथे सादर कर तक्रार

बुधवारी भोजन अवकाश पूर्वीचे कार्यालयीन कामकाज पूर्ण केल्यावर जिल्हा कचेरीच्या पायऱ्या उतरत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नियोजित ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्या शासकीय वाहनाजवळ गेले. ते शासकीय वाहनात बसणार एवढ्यात त्यांचे तक्रार घेऊन जिल्हा कचेरीत आलेल्या एका वृद्ध महिलेवर लक्ष गेले. जिल्हाधिकारी कर्डिले यांनीही या मायमाउलीला आपुलकीने विचारपूस करीत मावशी तुमची तक्रार सेवादूत केंद्रात द्या, असे अतिशय नम्रपणे सांगितले. आपले साहेब सामाजिक बांधीलकी जोपासत आहेत, मग मी का मागे राहू असाच काहीसा विचार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाने एक पाऊल पुढे टाकत त्या मायमाउलीला सेवादूत केंद्रापर्यंत नेत तिची तक्रार सेवादूत केंद्रात दाखल करून घेतली.

हे सांभाळत आहेत सेवादूत केंद्राची जबाबदारी

संप काळातील दीड दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतील सेवादूत केंद्रात एकूण ६५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्रात तहसील कार्यालयाशी संबंधित तक्रारी सुनील सोमवंशी, उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी नलिनी थूल, तर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी शीतल सुटे स्वीकारत आहेत.

दीड दिवसातील प्राप्त तक्रारींची स्थिती

जिल्हाधिकारी कार्यालय : ४७उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय : ०४तहसील कार्यालय : १४

टॅग्स :GovernmentसरकारYavatmalयवतमाळ