शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

'संपकाळात' जिल्हा कचेरीतील 'सेवादूत' केंद्र ठरतेय 'आधारवड'; दीड दिवसांत ६५ तक्रारी प्राप्त

By महेश सायखेडे | Updated: March 15, 2023 18:03 IST

जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना

वर्धा : संप काळात तक्रार किंवा निवेदन सादर करण्यासह विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा कचेरीत सेवादूत केंद्रात निवेदन व तक्रारी स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची ही संकल्पना संपकाळात नागरिकांसाठी आधारवड ठरू पाहत आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस असलेल्या बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत सेवादूत केंद्राला एकूण ६५ तक्रारी अथवा निवेदन प्राप्त झाली आहेत. या सर्वच तक्रारींचा झटपट निपटारा कसा होईल या दृष्टीनेही प्रत्यक्ष कार्य होत असल्याचे सांगण्यात आले.जिल्हाधिकारी म्हणाले... मावशी येथे सादर कर तक्रार

बुधवारी भोजन अवकाश पूर्वीचे कार्यालयीन कामकाज पूर्ण केल्यावर जिल्हा कचेरीच्या पायऱ्या उतरत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नियोजित ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्या शासकीय वाहनाजवळ गेले. ते शासकीय वाहनात बसणार एवढ्यात त्यांचे तक्रार घेऊन जिल्हा कचेरीत आलेल्या एका वृद्ध महिलेवर लक्ष गेले. जिल्हाधिकारी कर्डिले यांनीही या मायमाउलीला आपुलकीने विचारपूस करीत मावशी तुमची तक्रार सेवादूत केंद्रात द्या, असे अतिशय नम्रपणे सांगितले. आपले साहेब सामाजिक बांधीलकी जोपासत आहेत, मग मी का मागे राहू असाच काहीसा विचार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाने एक पाऊल पुढे टाकत त्या मायमाउलीला सेवादूत केंद्रापर्यंत नेत तिची तक्रार सेवादूत केंद्रात दाखल करून घेतली.

हे सांभाळत आहेत सेवादूत केंद्राची जबाबदारी

संप काळातील दीड दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतील सेवादूत केंद्रात एकूण ६५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्रात तहसील कार्यालयाशी संबंधित तक्रारी सुनील सोमवंशी, उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी नलिनी थूल, तर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी शीतल सुटे स्वीकारत आहेत.

दीड दिवसातील प्राप्त तक्रारींची स्थिती

जिल्हाधिकारी कार्यालय : ४७उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय : ०४तहसील कार्यालय : १४

टॅग्स :GovernmentसरकारYavatmalयवतमाळ