शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम हे तीर्थस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:12 IST

आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.

ठळक मुद्देकिरणकुमार : गांधी १५० जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.आम्ही ट्रम्प आणि इमरान खान यांच्या बाबतीत सर्व काही माहिती करुन घेतो. परंतु या महामानवाचे जीवन चरित्र समजून घेत नाही हे दुर्दैव आहे. अहिंसेचा पाठ घेऊन हिंसेवर विजय मिळविला. त्यांचे योगदानाचे मुल्य नाही. गांधी विचार संपूर्ण विश्वाला दिला आहे. सेवाग्राम ही त्यांची कर्मस्थळी असल्याने हे तिर्थक्षेत्र असल्याचे मी मानतो असे प्रतिपादन अभिनेता किरणकुमार यांनी केले.एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्रच्यावतीने आयोजीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्य व एकता संस्थेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्याने अग्निहोत्री इंजिनीअरींग कॉलेज, नागठाणा रोड, सिंदी (मेघे) वर्धा येथील सभागृहात महात्मा गांधी विचार मंथन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अभिनेता किरणकुमार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, होते. एकता सेवा भावी मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष व फिल्म निर्माते अजमत खान, अभिनेता आफताब खान, मोहन अग्रवाल, ठाणेदार चंद्रकांत मदने, विनय राजे, अनिल नरेडी व प्राचार्य पडघम व्यासपीठावर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त करतांना पं. अग्निहोत्री म्हणाले, प्रत्येकांनी गांधीजींचे  सिध्दांत आत्मसात करुन त्यांच्या विचारानुसार वाटचाल करावी. अनुभव हेच सिद्ध ज्ञान आहे. जो तत्त्व आणि आदर्श सोबत चालतो तोच पुज्यनीय असतो. चांगले कार्य करणाऱ्यांंचाच सत्कार होतो असे ते म्हणाले.प्रास्ताविक अजमत खान यांनी केले संचालन आणि आभार इमरान राही यांनी मानले. यावेळी गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, निवृत्त कार्यकारी अभियंता के. आर. बजाज, माजी पोलीस आयुक्त, चंद्रकांत उदगीरकर, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. एम. नारंग, कवियत्री आभा पारगावकर, महेश बुधवानी, भारत राठोड, तुकाराम महाराज मुंढे, प्रकाश महाराज फड, संगीता जामगे, जयश्री देशमुख परभणी, प्रा. रफिक शेख,, डॉ. सुनील कुमार, अमरावती, राजाराम जाधव, उद्धवराव खेडेकर, जालना, किरण वाडिया, हिंगणघाट, डॉ. अनिल बेग, वर्धा व साहिस्ता परवीन अयुब खान, यवतमाळ यांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तर जय महाकाली शिक्षण संस्थेतर्फे अभिनेता किरण कुमार यांचा सत्कार संस्थाध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित अभिनेता किरणकुमार यांनी बापूकुटीला भेट दिली.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामMahatma Gandhiमहात्मा गांधी