शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

सेवाग्राम हे तीर्थस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:12 IST

आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.

ठळक मुद्देकिरणकुमार : गांधी १५० जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.आम्ही ट्रम्प आणि इमरान खान यांच्या बाबतीत सर्व काही माहिती करुन घेतो. परंतु या महामानवाचे जीवन चरित्र समजून घेत नाही हे दुर्दैव आहे. अहिंसेचा पाठ घेऊन हिंसेवर विजय मिळविला. त्यांचे योगदानाचे मुल्य नाही. गांधी विचार संपूर्ण विश्वाला दिला आहे. सेवाग्राम ही त्यांची कर्मस्थळी असल्याने हे तिर्थक्षेत्र असल्याचे मी मानतो असे प्रतिपादन अभिनेता किरणकुमार यांनी केले.एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्रच्यावतीने आयोजीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्य व एकता संस्थेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्याने अग्निहोत्री इंजिनीअरींग कॉलेज, नागठाणा रोड, सिंदी (मेघे) वर्धा येथील सभागृहात महात्मा गांधी विचार मंथन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अभिनेता किरणकुमार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, होते. एकता सेवा भावी मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष व फिल्म निर्माते अजमत खान, अभिनेता आफताब खान, मोहन अग्रवाल, ठाणेदार चंद्रकांत मदने, विनय राजे, अनिल नरेडी व प्राचार्य पडघम व्यासपीठावर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त करतांना पं. अग्निहोत्री म्हणाले, प्रत्येकांनी गांधीजींचे  सिध्दांत आत्मसात करुन त्यांच्या विचारानुसार वाटचाल करावी. अनुभव हेच सिद्ध ज्ञान आहे. जो तत्त्व आणि आदर्श सोबत चालतो तोच पुज्यनीय असतो. चांगले कार्य करणाऱ्यांंचाच सत्कार होतो असे ते म्हणाले.प्रास्ताविक अजमत खान यांनी केले संचालन आणि आभार इमरान राही यांनी मानले. यावेळी गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, निवृत्त कार्यकारी अभियंता के. आर. बजाज, माजी पोलीस आयुक्त, चंद्रकांत उदगीरकर, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. एम. नारंग, कवियत्री आभा पारगावकर, महेश बुधवानी, भारत राठोड, तुकाराम महाराज मुंढे, प्रकाश महाराज फड, संगीता जामगे, जयश्री देशमुख परभणी, प्रा. रफिक शेख,, डॉ. सुनील कुमार, अमरावती, राजाराम जाधव, उद्धवराव खेडेकर, जालना, किरण वाडिया, हिंगणघाट, डॉ. अनिल बेग, वर्धा व साहिस्ता परवीन अयुब खान, यवतमाळ यांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तर जय महाकाली शिक्षण संस्थेतर्फे अभिनेता किरण कुमार यांचा सत्कार संस्थाध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित अभिनेता किरणकुमार यांनी बापूकुटीला भेट दिली.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामMahatma Gandhiमहात्मा गांधी