शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिल्या १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z समाज आक्रमक, सरकारविरोधात जोरदार निदर्शने
3
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
4
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
5
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
6
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
7
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
8
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
9
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
10
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
11
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
12
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक
13
"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."
14
विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
15
Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!
16
खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
17
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
18
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
19
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
20
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

सेवाग्रामचे डॉक्टर्स केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:35 IST

केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे झालेल्या प्रचंड विनाशाचा विचार करून सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या डॉ. प्रियदर्शन तुर्य, डॉ. अमित सिंग, डॉ. जानकी बोरकर यांच्यासह तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टर, १ परिचारिका आणि १६ पदवीपूर्व विद्यार्थी, ७ केरळ येथील विद्यार्थी, ३ स्वंयसेवक २३ आॅगस्ट रोजी रवाना झाले.

ठळक मुद्देचार टीमद्वारे मदत कार्य सुरू : नागरिकांना पुरानंतर उद्भवणाऱ्या संकटांवरही मात करण्यासाठी मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे झालेल्या प्रचंड विनाशाचा विचार करून सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या डॉ. प्रियदर्शन तुर्य, डॉ. अमित सिंग, डॉ. जानकी बोरकर यांच्यासह तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टर, १ परिचारिका आणि १६ पदवीपूर्व विद्यार्थी, ७ केरळ येथील विद्यार्थी, ३ स्वंयसेवक २३ आॅगस्ट रोजी रवाना झाले. त्यांनी एनाकुर्लम् गाठून कार्य सुरू केले आहे. या डॉक्टरांनी पूरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्यासाठी तेथे चार चमू तयार केल्या आहेत.डॉ. बोरकर आणि डॉ. उक्के यांना जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी कोट्टायमला पाठविण्यात आले आहे. डॉ. अमित सिंग आणि डॉ. देदेव अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यासोबत आघाडीत काम करण्यासाठी कोथमंगलम् येथे कार्यरत आहे. डॉ. टीअर, डॉ. गणेश हे दोघे एनाकुर्लम् जवळील परिसरात डॉक्टर्स फॉर यू (डीएफवाय) नावाच्या गैर सरकारी संस्थेसोबत काम करीत आहेत. आपत्तीनंतर अत्यंत महत्त्वाचे असलेले स्वच्छ पाणी, घर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, अन्न स्वच्छता आदी विषयांवर आरोग्य विषयक शिक्षण देण्यावरही लक्ष केंद्रीत करून आहे. कोठमांगलम् येथील पथकाने एनएसएसच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेतले आहे. शिवाय पूरग्रस्त क्षेत्रामध्ये जात असताना त्यांना स्वच्छता व स्वच्छतेविषयक कामांचे मुलभूत धडे देण्यात येत आहे. मुख्य आरोग्य निरीक्षक, पंचायत उपाध्यक्ष, आशा कामगार आणि स्थानिकांना आरोग्य समस्याबद्दल चर्चा करून दुर्गम आदिवासी बहुल भागात ५० पेक्षा जास्त लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पुरग्रस्त भागात भिंत, फरशी, घर परिसराची स्वच्छता व निजंर्तूकिकरण आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांना प्रात्याक्षिकाद्वारे माहिती दिली जात आहे. स्थानिक एम. ए महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. सर्व संघांना विहिरी, पाण्याची टाकी, शाळा, रुग्णालये स्वच्छ करण्यामध्ये आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सांगण्यात आले आहे. सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयाची चमु घरे, रुग्णालये, कृषी जमिनी, पिके, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांच्या नियमित भेटी आदीवर लक्ष केंद्रीत करून आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गंगणे यांचे यात सहकार्य लाभत आहे. शिवाय फार्मासिस्ट असोसिएशन आॅफ वर्धा यांनीही या चमूला सहकार्य केले आहे. वर्धा शहरातील लोकांकडून पुरेशी रक्कम गोळा करून येथे मदत कार्य राबविण्यात येत आहे. केरळला गेलेल्या चमूत डॉ. प्रियदर्शन, डॉ. अमित सिंग, डॉ. जानकी बोरकर, डॉ. गणेश भंडारे, डॉ. विद्या पांचाल, डॉ. पंकज उके, डॉ. महादेव घोरपडे, सारिका गायकवाड, सावित्रीदेवी चित्रलक्ष्मी, अंजली मोहन, मधुर श्रॉफ, सुधीर वर्मा, शिजू शिवरामण, अब्दुल वहाब, अशिक्क, सौरभ शर्मा, राजेंद्र यादव, जावेद झुएर अली आबिद आदी आहेत.सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची मदत चमू केरळमध्ये अतिशय चांगल व जबाबदारीने काम करीत आहे. चार गटात त्यांचे विभाजन करण्यात आले आहे. आरोग्य सेवा पुरविण्यासोबतच पुरानंतर उद्भवणाºया परिस्थितीबाबतही प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी तेथील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या चमूसोबत केरळ राज्यातील आपल्या येथे शिकणारे विद्यार्थी सोबत असल्याने अतिशय चांगल काम करण्यात येत आहे. एक लाख रूपयाचा आर्थिक मदतही तत्काळ देण्यात आली. शिवाय एक दिवसाचा पगार आयुर्विज्ञान संस्थेमार्फत केरळच्या पीडितांना लवकरच पाठविला जाणार आहे.- डॉ. नितीन गंगणे, अधिष्ठाता महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.