शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

सेवाग्रामचे डॉक्टर्स केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:35 IST

केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे झालेल्या प्रचंड विनाशाचा विचार करून सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या डॉ. प्रियदर्शन तुर्य, डॉ. अमित सिंग, डॉ. जानकी बोरकर यांच्यासह तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टर, १ परिचारिका आणि १६ पदवीपूर्व विद्यार्थी, ७ केरळ येथील विद्यार्थी, ३ स्वंयसेवक २३ आॅगस्ट रोजी रवाना झाले.

ठळक मुद्देचार टीमद्वारे मदत कार्य सुरू : नागरिकांना पुरानंतर उद्भवणाऱ्या संकटांवरही मात करण्यासाठी मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे झालेल्या प्रचंड विनाशाचा विचार करून सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या डॉ. प्रियदर्शन तुर्य, डॉ. अमित सिंग, डॉ. जानकी बोरकर यांच्यासह तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टर, १ परिचारिका आणि १६ पदवीपूर्व विद्यार्थी, ७ केरळ येथील विद्यार्थी, ३ स्वंयसेवक २३ आॅगस्ट रोजी रवाना झाले. त्यांनी एनाकुर्लम् गाठून कार्य सुरू केले आहे. या डॉक्टरांनी पूरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्यासाठी तेथे चार चमू तयार केल्या आहेत.डॉ. बोरकर आणि डॉ. उक्के यांना जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी कोट्टायमला पाठविण्यात आले आहे. डॉ. अमित सिंग आणि डॉ. देदेव अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यासोबत आघाडीत काम करण्यासाठी कोथमंगलम् येथे कार्यरत आहे. डॉ. टीअर, डॉ. गणेश हे दोघे एनाकुर्लम् जवळील परिसरात डॉक्टर्स फॉर यू (डीएफवाय) नावाच्या गैर सरकारी संस्थेसोबत काम करीत आहेत. आपत्तीनंतर अत्यंत महत्त्वाचे असलेले स्वच्छ पाणी, घर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, अन्न स्वच्छता आदी विषयांवर आरोग्य विषयक शिक्षण देण्यावरही लक्ष केंद्रीत करून आहे. कोठमांगलम् येथील पथकाने एनएसएसच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेतले आहे. शिवाय पूरग्रस्त क्षेत्रामध्ये जात असताना त्यांना स्वच्छता व स्वच्छतेविषयक कामांचे मुलभूत धडे देण्यात येत आहे. मुख्य आरोग्य निरीक्षक, पंचायत उपाध्यक्ष, आशा कामगार आणि स्थानिकांना आरोग्य समस्याबद्दल चर्चा करून दुर्गम आदिवासी बहुल भागात ५० पेक्षा जास्त लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पुरग्रस्त भागात भिंत, फरशी, घर परिसराची स्वच्छता व निजंर्तूकिकरण आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांना प्रात्याक्षिकाद्वारे माहिती दिली जात आहे. स्थानिक एम. ए महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. सर्व संघांना विहिरी, पाण्याची टाकी, शाळा, रुग्णालये स्वच्छ करण्यामध्ये आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सांगण्यात आले आहे. सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयाची चमु घरे, रुग्णालये, कृषी जमिनी, पिके, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांच्या नियमित भेटी आदीवर लक्ष केंद्रीत करून आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गंगणे यांचे यात सहकार्य लाभत आहे. शिवाय फार्मासिस्ट असोसिएशन आॅफ वर्धा यांनीही या चमूला सहकार्य केले आहे. वर्धा शहरातील लोकांकडून पुरेशी रक्कम गोळा करून येथे मदत कार्य राबविण्यात येत आहे. केरळला गेलेल्या चमूत डॉ. प्रियदर्शन, डॉ. अमित सिंग, डॉ. जानकी बोरकर, डॉ. गणेश भंडारे, डॉ. विद्या पांचाल, डॉ. पंकज उके, डॉ. महादेव घोरपडे, सारिका गायकवाड, सावित्रीदेवी चित्रलक्ष्मी, अंजली मोहन, मधुर श्रॉफ, सुधीर वर्मा, शिजू शिवरामण, अब्दुल वहाब, अशिक्क, सौरभ शर्मा, राजेंद्र यादव, जावेद झुएर अली आबिद आदी आहेत.सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची मदत चमू केरळमध्ये अतिशय चांगल व जबाबदारीने काम करीत आहे. चार गटात त्यांचे विभाजन करण्यात आले आहे. आरोग्य सेवा पुरविण्यासोबतच पुरानंतर उद्भवणाºया परिस्थितीबाबतही प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी तेथील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या चमूसोबत केरळ राज्यातील आपल्या येथे शिकणारे विद्यार्थी सोबत असल्याने अतिशय चांगल काम करण्यात येत आहे. एक लाख रूपयाचा आर्थिक मदतही तत्काळ देण्यात आली. शिवाय एक दिवसाचा पगार आयुर्विज्ञान संस्थेमार्फत केरळच्या पीडितांना लवकरच पाठविला जाणार आहे.- डॉ. नितीन गंगणे, अधिष्ठाता महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.