शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

पीक कर्जासाठी ११०० कोटींचे ध्येय ठरवा

By admin | Updated: May 1, 2016 02:05 IST

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ८० टक्के कर्ज ३१ मे पूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, ....

किशोर तिवारी : शेतकऱ्यांना सातबारा व आठ-अ घरपोच मिळणारवर्धा : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ८० टक्के कर्ज ३१ मे पूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतकऱ्यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ आदी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकऱ्यांना अकराशे कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा सर्व बँकांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.विकास भवन येथे शनिवारी राष्ट्रीयकृत व खासगी बँकेच्या १३८ बँक व्यवस्थापक, तालुकास्तरावरील महसूल, कृषी, सहकार आदींच्या अधिकाऱ्यांची खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपासंदर्भात बैठक पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. समीर कुणावार, प्रभारी जिल्हाधिकारी दीपक नलवडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, माजी खासदार सुरेश वाघमारे, प्रशांत इंगळे तिगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड यांची उपास्थिती होती. खरीप हंगामासाठी गत वर्षी केवळ ४० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले होते; परंतु यावर्षी ८० टक्के शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना करताना किशोर तिवारी यांनी यावेळी केली. यावेळी ते म्हणाले, शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी ३१ मे पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांला कर्ज पुरवठा होईल, यादृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावा घेण्याची सूचना करताना तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांनी तालुकानिहाय यादी करून शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून बँकांना उपलब्ध करून द्यावेत. कर्ज मिळण्यासाठी विलंब होणार नाही, यादृष्टीने महसूल यंत्रणा व बँकेच्या शाखा प्रमुखांमध्ये समन्वय ठेवावा, कोरडवाहू, शेतकरी, अल्पभूधारक, सिलिंगमध्ये मिळालेले जमीनधारक तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, असेही यावेळी तिवारी यांनी सांगितले.१.९६ शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करण्याच्या सूचना वर्धा जिल्ह्यासाठी ७०० कोटी रुपये कर्जाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. परंतु १ लाख ९६ हजार शेतकऱ्याना पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे. याकरिता जिल्ह्याने १ हजार १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे. याकरिता तहसीलदारांकडून गावनिहाय शेतकऱ्यांची यादी तसेच त्यासोबत सातबारा व आठ अ हा नमुना बँकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.