शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-हिंगणघाट मार्गावर खड्ड्यांची मालिका

By admin | Updated: August 5, 2016 02:05 IST

वर्धा ते हिंगणघाट मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग आता प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

अपघाताचा धोका : वाहनधारकांना करावी लागते कसरत हिंगणघाट : वर्धा ते हिंगणघाट मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग आता प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. मार्गावरील मोठमोठे खड्डे चुकविताना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहन चालक व प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. हिंगणघाट ते वर्धा या रस्त्याचे पाच वर्षांपूर्वी नव्याने बांधकाम केले होते. तसेच मागील वर्षी रस्त्याची डागडुजी केली. मात्र या रस्त्याची आता दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: खराब झाला असून जागोजागी असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे. खड्ड्यांपासून वाहन काढताना अनेकांची तारांबळ उडते. अनेकदा वाहन चालकांना खड्डे चुकविण्याचा प्रयत्नात अपघाताचा धोका असतो. खड्ड्यातून होणारी ही वाहतूक अधिक धोकादायक झाली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे. काही भागातील गिट्टी उघडी पडली आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरलेले असतात. खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता असते. जिल्हा कार्यालयाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. कामानिमित्त शेकडो लोक ये-जा करतात. जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याची खंतही व्यक्त होते. यवतमाळ, अमरावतीकडे जाण्यासाठी हिंगणघाटकरांना हाच रस्ता आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर) कोरा-हिंगणघाट मार्ग ठरतो जीवघेणा कोरा : हिंगणघाट ते कोरा मार्गावरील कडजना येथील पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक अत्यंत धोकादयक ठरत आहे. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या पुलाचे उन्हाळ्यातच काम पूर्ण होणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केले. पावसाळ्यापासून रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहन धारकांना जाम मार्गे जवे लागत आहे. येथून वाहन काढताना चिखलात वाहन रुतत असल्याने वाहन धारकांना नाहक मनस्ताप होतो. शिवाय अपघाताचा धोका असतो. या मार्गावर जडवाहन फसण्याचा धोका आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. याला जबाबदार असलेल्या घटकांवर कार्यवाहीची मागणी होत आहे. पुलाचे व रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)