शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पाणीटंचाईपायी वर्ध्यातील ज्येष्ठ नागरिकांनी धरला पुण्या-मुंबईचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 14:40 IST

मागील ४० वर्षांत पहिल्यांदाच वर्धा शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी एक ते दीड महिन्यांपूर्वीच वर्धा शहर सोडून आपल्या मुला व मुलींकडे पुणे, मुंबईत आपला मुक्काम हलविला आहे.

ठळक मुद्देपुणे, मुंबईत मुलांकडे रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील ४० वर्षांत पहिल्यांदाच वर्धा शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच वर्धा शहराचे तापमानही वाढतीवरच आहे. त्यामुळे या दोन्ही समस्यांनी त्रस्त झालेल्या साठीपलीकडील ज्येष्ठ नागरिकांनी एक ते दीड महिन्यांपूर्वीच वर्धा शहर सोडून आपल्या मुला व मुलींकडे पुणे, मुंबईत आपला मुक्काम हलविला आहे. वर्धा शहरातून ५०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक सध्या पुणे व मुंबईत दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.गतवर्षी पावसाळ्यात वर्धा जिल्ह्यात केवळ ७७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा जलाशय कोरडे झाले आहेत. वर्धा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पातही आता केवळ मृत पाणी साठा शिल्लक राहिला आहे. मागील दोन महिन्यांपासून वर्धा शहराला ६ ते ८ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील अनेक भागातील विहिरी, बोअरवेल कोरड्या झाल्या आहेत. काही भागात खासगी टँकर बोलावून पाणीपुरवठा केला जातो. या पाणी समस्येला तोंड देताना ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. अनेकजण पाण्याच्या समस्येमुळे तणावात असून त्याचा आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. पाणी आणायचे कोठून, हा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. बहुतांश ज्येष्ठ नागरिक पेन्शनरधारक आहेत. एक ते दोन सदस्यांचे कुटुंब त्यातही पाणी व उष्णतामानाचे संकट अशा परिस्थितीत कूलर चालविणेही कठीण झाल्याने त्यांनी वर्धा शहर सोडण्याचा निर्णय घेऊन आपल्या मुलांमुलींकडे पुणे शहरात जाण्याचा निर्णय घेतला. शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मागील दोन ते अडीच महिन्यांपासून घरांना कुलूप लावून पुण्या-मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते दररोज वर्धा शहराच्या पाणी समस्येची माहिती जवळच्या नातलगांकडून घेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर आमचे तिकडे येणे होईल, असा निरोपही काहींनी आपल्या नातलगांना दिला आहे. वर्धा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी समस्या उद्भवली आहे.

इच्छा नसताना पुण्यात वास्तव्यसंपूर्ण नोकरीचा, शेतीचा काळ वर्धा जिल्ह्यात, शहरात गेला. आता या भागात मोठा गोतावळा निर्माण झाला. तो सोडून केवळ पाणी समस्येमुळे वर्धा शहर सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची इच्छा नसताना आई-बाबांना त्रास होऊन नये म्हणून मुला मुलींनी आपल्या आईवडिलांना तेथे बोलावून घेतले आहे.मुलगा पुण्यामध्ये खासगी कंपनीत नोकरीवर आहे. वर्धा शहरात पाणीटंचाईचे सावट गडद झाल्याने मोठे पाणी मिळविण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यावर मात करणे आम्हाला शक्य होत नव्हते. त्यामुळे मुलाने तुम्ही तातडीने निघून या, अशी सूचना केली. आता पुण्याला त्याच्याकडे आहोत.अरविंद वैद्य, रहिवासी, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई