शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

पाणीटंचाईपायी वर्ध्यातील ज्येष्ठ नागरिकांनी धरला पुण्या-मुंबईचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 14:40 IST

मागील ४० वर्षांत पहिल्यांदाच वर्धा शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी एक ते दीड महिन्यांपूर्वीच वर्धा शहर सोडून आपल्या मुला व मुलींकडे पुणे, मुंबईत आपला मुक्काम हलविला आहे.

ठळक मुद्देपुणे, मुंबईत मुलांकडे रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील ४० वर्षांत पहिल्यांदाच वर्धा शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच वर्धा शहराचे तापमानही वाढतीवरच आहे. त्यामुळे या दोन्ही समस्यांनी त्रस्त झालेल्या साठीपलीकडील ज्येष्ठ नागरिकांनी एक ते दीड महिन्यांपूर्वीच वर्धा शहर सोडून आपल्या मुला व मुलींकडे पुणे, मुंबईत आपला मुक्काम हलविला आहे. वर्धा शहरातून ५०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक सध्या पुणे व मुंबईत दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.गतवर्षी पावसाळ्यात वर्धा जिल्ह्यात केवळ ७७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा जलाशय कोरडे झाले आहेत. वर्धा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पातही आता केवळ मृत पाणी साठा शिल्लक राहिला आहे. मागील दोन महिन्यांपासून वर्धा शहराला ६ ते ८ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील अनेक भागातील विहिरी, बोअरवेल कोरड्या झाल्या आहेत. काही भागात खासगी टँकर बोलावून पाणीपुरवठा केला जातो. या पाणी समस्येला तोंड देताना ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. अनेकजण पाण्याच्या समस्येमुळे तणावात असून त्याचा आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. पाणी आणायचे कोठून, हा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. बहुतांश ज्येष्ठ नागरिक पेन्शनरधारक आहेत. एक ते दोन सदस्यांचे कुटुंब त्यातही पाणी व उष्णतामानाचे संकट अशा परिस्थितीत कूलर चालविणेही कठीण झाल्याने त्यांनी वर्धा शहर सोडण्याचा निर्णय घेऊन आपल्या मुलांमुलींकडे पुणे शहरात जाण्याचा निर्णय घेतला. शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मागील दोन ते अडीच महिन्यांपासून घरांना कुलूप लावून पुण्या-मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते दररोज वर्धा शहराच्या पाणी समस्येची माहिती जवळच्या नातलगांकडून घेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर आमचे तिकडे येणे होईल, असा निरोपही काहींनी आपल्या नातलगांना दिला आहे. वर्धा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी समस्या उद्भवली आहे.

इच्छा नसताना पुण्यात वास्तव्यसंपूर्ण नोकरीचा, शेतीचा काळ वर्धा जिल्ह्यात, शहरात गेला. आता या भागात मोठा गोतावळा निर्माण झाला. तो सोडून केवळ पाणी समस्येमुळे वर्धा शहर सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची इच्छा नसताना आई-बाबांना त्रास होऊन नये म्हणून मुला मुलींनी आपल्या आईवडिलांना तेथे बोलावून घेतले आहे.मुलगा पुण्यामध्ये खासगी कंपनीत नोकरीवर आहे. वर्धा शहरात पाणीटंचाईचे सावट गडद झाल्याने मोठे पाणी मिळविण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यावर मात करणे आम्हाला शक्य होत नव्हते. त्यामुळे मुलाने तुम्ही तातडीने निघून या, अशी सूचना केली. आता पुण्याला त्याच्याकडे आहोत.अरविंद वैद्य, रहिवासी, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई