शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

सेना-भाजपने शेती व्यवस्था उद्ध्वस्त केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

शरद पवार म्हणाले, विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोटी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे.

ठळक मुद्देशरद पवार : उद्योगपतीधार्जिणे सरकार उलथवून टाका

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली असून औद्योगिकरणही पूर्णत: बंद पडलेल्या अवस्थेत आहे. आज बेरोजगारांच्या हाताला काम नाही, येणारी तरुणपिढी ही कामाअभावी भरकटली जाणार आहे. विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम शासनाचे आहे;परंतु आज सरकार नावाची यंत्रणा ही उद्योगपतींची वेठबिगार झाली आहे, देशात जेथे भाजपचे राज्य आहे, त्याठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र्र पवार यांनी गुरुवारी येथे केला. हिंगणघाट विधानसभा मतदार क्षेत्रात गोकुलधाम मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार वसंत बोंडे, किशोर माथनकर, दिवाकर गमे, संतोषराव तिमांडे, काँग्रेसचे माधव घुसे, पंढरी कापसे, श्रावण ढगे, राजेंद्र डागा, सुरेखा ठाकरे, वर्षा निकम उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोटी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. आज मुंबईसारख्या महानगरातील गिरणी उद्योग बंद करून त्याठिकाणी चाळीस मजली इमारती उभ्या होत आहेत. हेच षड्यंत्र हिंगणघाटसारख्या शहरातही राबविण्यात येणार आहे. हे चित्र अतिशय विदारक आहे. राज्य तुमच्या हातात दिले; परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील एकाही गावाचा रस्ता ठिक नाही. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. आज खड्डेयुक्त महाराष्ट्राची ओळख होत आहे, ही स्थिती बदलण्याची आज आहे. लोकांचे आर्थिक जीवनमान सुधारायचे आहे त्यासाठी कारखानदारी नव्याने सुरू करून शेतीला पुनर्जीवित करण्याची गरज आहे, तरच तरुण पिढीचे भविष्य उज्ज्वल होईल. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; परंतु त्याविषयी कोणती उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही, केवळ आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून गुन्हे नोंदविण्याचे काम हे सरकार करीत आहे, असे ते म्हणाले.सभेचे संचालन राजेश शेंडे यांनी केले. प्रास्ताविक शेषकुमार येरलेकर यांनी केले.

टॅग्स :wardha-acवर्धाSharad Pawarशरद पवार