शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दारूविक्री; पती-पत्नीला तीन वर्षे सश्रम कारावास २५ हजारांचा दंड

By admin | Updated: May 27, 2017 00:36 IST

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या तिगाव येथील पाटील दाम्पत्याला दोन कलमान्वये तीन वर्षे सश्रम कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या तिगाव येथील पाटील दाम्पत्याला दोन कलमान्वये तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठाण्यात आली. सदर निकाल प्रथम श्रेणी न्यायालयाने शुक्रवारी दिला. शुभांगी जयंत पाटील (३२) व जयंत शंकर पाटील (३७) रा. तिगाव अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना प्रथम श्रेणी न्यायालय क्रमांक ७ यांनी दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) मध्ये तीन वर्ष आणि कलम ८३ दारूबंदी अधिनियम अंतर्गत तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. शिवाय दोघांनाही प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला. सदर गुन्ह्याचा तपास सावंगी पोलीस ठाण्याचे रामदास बिसने यांनी केला होता. या प्रकरणात सरकारी वकील समीर डुगे यांनी बाजू मांडल्याची माहिती ठाणेदार शेगावकर यांनी दिली. दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूच्या गुन्ह्यात दोषसिद्धी होण्याचे प्रमाण कमी असल्याने हा निकाल पोलिसांच्या कारवाईकरिता महत्त्वाचा ठरणारा असल्याच्या प्रतिक्रीया पोलीस विभागातून मिळत आहेत.