शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

अत्यल्प दरात कापूस विक्री

By admin | Updated: January 24, 2015 01:41 IST

शेतकरी केवळ आशेवर जगतो हे वाक्य नेहमीच ऐकावयास मिळते. तो आशेवर असता तरी त्याच्य पदरी नेहमी निराशाच येणे ही काळ्या दगडावरची रेघ, असं विसंगत चित्रही नेहमीचच.

दिलीप चव्हाण सेवाग्रामशेतकरी केवळ आशेवर जगतो हे वाक्य नेहमीच ऐकावयास मिळते. तो आशेवर असता तरी त्याच्य पदरी नेहमी निराशाच येणे ही काळ्या दगडावरची रेघ, असं विसंगत चित्रही नेहमीचच. त्यामुळे कापसाचे भाव वाढेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपत आली आहे. भाव वाढण्याचे कुठलेही संकेत दिसत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी न परवडणाऱ्या भावात कापूस विकायला सुरुवात केली. ३ हजार ८५० रुपये प्रती क्विंटल भावाने अखेर शेतकरी आपला सांभाळून ठेवलेला कापूस विकत असतानाचे चित्र सेवाग्राम पंचक्रोशीत दिसत आहे. एकेकाळी विदर्भाचे पांढरे सोने म्हणून ओळख असणारी कापसाची ओळख आता काळवंडत आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे कवडीमोल भावाने कापूस विकला जात आहे. सोन्याचा भाव सदैव तेजीत असतो. कधी काळी थोडा फार चढउतार असला तरी सोने नेहमीच तेजीत असते. परंतु विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याबाबत आज मात्र असे दिसत नाही. विदर्भातील कित्येक कास्तकारांनी पांढऱ्या सोन्यावरच आतापर्यंत आपले भविष्य घडविलेले आहे. अनेकांच्या यशोगाथा प्रेरक ठरल्या आहेत; परंतु गत काही वर्षात हे पांढरे सोने मातीमोल भावात विकले जात आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा, कौटुंबिक कार्य, घर बांधणी आणि विवाह इत्यादी कार्य कुटुंब प्रमुखांना कापसाच्या भरोश्यावर पार पाडणे कठीण जात आहे. नवीन बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशके यांची भाववाढ तसेच त्याच्या अती वापरामुळे शेतीचे व्यवस्थापन बिघडले. खर्चाच्या तुलनेत भावात वाढ झाली नसल्याने कापूस उत्पादक संकटात सापडला. यात भर पडली ती नैसर्गिक संकटाची पण कापूस उत्पादन दरवर्षी कमी होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. या वर्षाला सामान्यपणे कोरडवाहू दीड ते दोन तर ओलती चार क्विंटल प्रती एकर असा राहिला आहे. ३ हजार ८५० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला असला तरी यात गाडीभाडे प्रति क्विंटल शंभर रुपये भराई व गाडी खाली करणे प्रती क्विंटल वीस रुपये असा खर्च वजा जाता प्रती क्विंटल ३ हजार ७३० रुपये असा शेतकऱ्यांच्या पदरी भाव पडला. यात त्यांच्या परिश्रमाचे मुल्यच कुठे धरल्या गेले नाही. कापसाच्या उत्पादनाने शेतकरी हतबल झाला. शासन मदतीचा अद्यापही पत्ता नाही. जगायचे की कर्ज फेडायचे हा एकच प्रश्न आता मानगुटीवर बसला असून सरकारापासून अशा व्यर्थ ठरत आहे. दहा हजार रुपयांच्या दराची मागणी पण अर्धा भावही पदरी नसल्यामुळे अखेर आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी कापूस विकायला लागला आहे.