शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प दरात कापूस विक्री

By admin | Updated: January 24, 2015 01:41 IST

शेतकरी केवळ आशेवर जगतो हे वाक्य नेहमीच ऐकावयास मिळते. तो आशेवर असता तरी त्याच्य पदरी नेहमी निराशाच येणे ही काळ्या दगडावरची रेघ, असं विसंगत चित्रही नेहमीचच.

दिलीप चव्हाण सेवाग्रामशेतकरी केवळ आशेवर जगतो हे वाक्य नेहमीच ऐकावयास मिळते. तो आशेवर असता तरी त्याच्य पदरी नेहमी निराशाच येणे ही काळ्या दगडावरची रेघ, असं विसंगत चित्रही नेहमीचच. त्यामुळे कापसाचे भाव वाढेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपत आली आहे. भाव वाढण्याचे कुठलेही संकेत दिसत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी न परवडणाऱ्या भावात कापूस विकायला सुरुवात केली. ३ हजार ८५० रुपये प्रती क्विंटल भावाने अखेर शेतकरी आपला सांभाळून ठेवलेला कापूस विकत असतानाचे चित्र सेवाग्राम पंचक्रोशीत दिसत आहे. एकेकाळी विदर्भाचे पांढरे सोने म्हणून ओळख असणारी कापसाची ओळख आता काळवंडत आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे कवडीमोल भावाने कापूस विकला जात आहे. सोन्याचा भाव सदैव तेजीत असतो. कधी काळी थोडा फार चढउतार असला तरी सोने नेहमीच तेजीत असते. परंतु विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याबाबत आज मात्र असे दिसत नाही. विदर्भातील कित्येक कास्तकारांनी पांढऱ्या सोन्यावरच आतापर्यंत आपले भविष्य घडविलेले आहे. अनेकांच्या यशोगाथा प्रेरक ठरल्या आहेत; परंतु गत काही वर्षात हे पांढरे सोने मातीमोल भावात विकले जात आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा, कौटुंबिक कार्य, घर बांधणी आणि विवाह इत्यादी कार्य कुटुंब प्रमुखांना कापसाच्या भरोश्यावर पार पाडणे कठीण जात आहे. नवीन बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशके यांची भाववाढ तसेच त्याच्या अती वापरामुळे शेतीचे व्यवस्थापन बिघडले. खर्चाच्या तुलनेत भावात वाढ झाली नसल्याने कापूस उत्पादक संकटात सापडला. यात भर पडली ती नैसर्गिक संकटाची पण कापूस उत्पादन दरवर्षी कमी होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. या वर्षाला सामान्यपणे कोरडवाहू दीड ते दोन तर ओलती चार क्विंटल प्रती एकर असा राहिला आहे. ३ हजार ८५० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला असला तरी यात गाडीभाडे प्रति क्विंटल शंभर रुपये भराई व गाडी खाली करणे प्रती क्विंटल वीस रुपये असा खर्च वजा जाता प्रती क्विंटल ३ हजार ७३० रुपये असा शेतकऱ्यांच्या पदरी भाव पडला. यात त्यांच्या परिश्रमाचे मुल्यच कुठे धरल्या गेले नाही. कापसाच्या उत्पादनाने शेतकरी हतबल झाला. शासन मदतीचा अद्यापही पत्ता नाही. जगायचे की कर्ज फेडायचे हा एकच प्रश्न आता मानगुटीवर बसला असून सरकारापासून अशा व्यर्थ ठरत आहे. दहा हजार रुपयांच्या दराची मागणी पण अर्धा भावही पदरी नसल्यामुळे अखेर आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी कापूस विकायला लागला आहे.