शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी गोधन काढले विकायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:00 IST

आता ग्रामीण भागातही गुरे चारण्याकरिता गुराखी मिळत नाही. परिणामी, गोपालक तथा शेतकरी हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी विवंचनेत : गुरे सोडली मोकाट

ऑनलाईन लोकमतचिकणी (जामणी) : आता ग्रामीण भागातही गुरे चारण्याकरिता गुराखी मिळत नाही. परिणामी, गोपालक तथा शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी गायी, म्हशी, बकºया आदी गोधन विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे.शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. दुग्ध व्यवसाय उत्तम धंदा आहे. शेतकºयांचे शेती, दूध असे समीकरण समजले जात होते; पण कालांतराने जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पडिक जमिनी कमी झाल्यामुळे गुरे चारायची कुठे, असा प्रश्न गुराख्यांसमोर निर्माण झाला आहे. शिवाय शहरांसह ग्रामीण भागातील चराई क्षेत्रसुद्धा कमालीचे घटले आहे. यामुळे गुरे चारण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाळीव गुरांपासून शेतीला उपयुक्त ठरणारे शेणखत मिळते. दूध, शेणखतामुळे उत्पन्न अधिक होत होते. यासाठी गायी, म्हशी तसेच बकऱ्या आदी गुरे पाळली जात होती; पण सध्या महागाईच्या काळात गायी, म्हशी व बकऱ्यांची रखवाली देणे न परवडणारी बाब ठरत आहे. गाय, बकरीसाठी मासिक २०० रुपये तर म्हशींसाठी २५० रूपये द्यावे लागतात. एवढी रक्कम देऊनही गुराखी मिळत नसल्याची खंत शेतकरी, गोपालकांकडून व्यक्त केली जाते. जामणी येथे गुरे चारण्याकरिता पुलगाव दारूगोळा भांडाराची पडिक जमीन होती; पण यावर्षी नव्यानेच सदर पडिक जमिनीला कुंपण घालण्यात आले आहे. यामुळे गुरे चारण्याकरिता पडिक शेतजमीनच राहिलेली नाही. यामुळे जामणी येथील गोपालक तथा शेतकरी गुरे विकत असल्याचे दिसून येत आहे.चाराही महागगुरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करतानाही आता शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. शेतातील कुटार खाण्यायोग्य राहिले नाही. यामुळेही गुरे पाळणे कमी होत आहे.