शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

व्याजाने रक्कम काढत आत्महत्याग्रस्त शेतकरी अस्थिकलश दर्शनयात्रा

By admin | Updated: May 14, 2017 00:46 IST

शेतकऱ्यांचे दु:ख मंत्रालयापर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील विजय जाधव यांनी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांचे दु:ख मंत्रालयापर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील विजय जाधव यांनी त्यांचे शेत गहाण करून व्याजाने पैसे घेत दुचाकीवरून आत्महत्याग्रस्त शेतकरी अस्थिकलश दर्शनयात्रा सुरू केली आहे. शेतकरी समस्या, तसेच कर्जमुक्तीकरिता ‘कोडोली ते मुंबई’, अशी असलेली त्यांची यात्रा शनिवारी वर्धेत पोहोचली. विजय जाधव यांच्याकडे दहा गुंठे कोरडवाहू शेती आहे. त्यांची पत्नी रोजमजुरी करते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांनाही इतर शेतकऱ्यांप्रमाणेच दु:ख आहे. कधी त्यांच्याही मनात आत्महत्येचा विचार आला. यातून राज्यभर फिरून शक्य होईल तितक्या शेतकऱ्यांच्या घरी भेट देत त्यांच्या अस्थि गोळा करून त्या मंत्रालयात नेण्याचे त्यांचे हे आंदोलन आहे. याकरिता त्यांचा दुचाकीने प्रवास सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे, हे सरकारला सांगण्यासाठी ते दुचाकीने कोल्हापूर ते मुंबई व्हाया नागपूर, असे निघाले आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ बंगला या ठिकाणी ते शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथील शेतकरी स्व. विलास शितापे, महादेव खोत, सांगली जिल्हा भैरू कोडलकर, चंदुबाई कोडलकर जिल्हा लातूर, वडिलांना कर्ज मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेली मुलगी स्व. शीतल वायाळ व इतर अनेक जिल्ह्यांत अनेक शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकरी अस्थी रक्षा दर्शन यात्रा सुरू केली आहे. इतर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी गोळा करीत ते आज वर्धेत पोहोचले. तत्पूर्वी, यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण ता. महागाव येथे पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या स्व. साहेबराव करपे यांच्या अस्थी कलशात घेणार आहेत. झाडगाव राळेगाव येथील आत्महत्या केलेल्या स्व. सदाशिव भोयर यांच्या अस्थी त्यांनी घेतल्या आहेत. यात वर्धेतील काही शेतकऱ्यांच्या घरी त्यांनी आज भेट देत त्यांच्या अस्थी घेतल्या. जेथे अस्थी मिळाल्या नाही, तेथील स्मशानभूमीची माती त्यांनी घेतली आहे. आत्महत्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन मुख्यमंत्र्यांना दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत. कोडोली ते मुंबई दुचाकी यात्रा : मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार कोडोली ते मुंबई दुचाकी यात्रा : मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार