शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

बांधकाम विभागावरील जप्ती पुन्हा टळली

By admin | Updated: March 30, 2016 02:22 IST

वर्धा बायपासकरिता घेतलेल्या जमिनीचा मोबदला अत्यल्प असल्याचे म्हणत विनायक उमाटे व जीवन उमाटे यांनी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाच्या आदेशाला मुदतवाढीचे ग्रहण : शेतकऱ्याची मोबदल्याकरिता फरफटवर्धा : वर्धा बायपासकरिता घेतलेल्या जमिनीचा मोबदला अत्यल्प असल्याचे म्हणत विनायक उमाटे व जीवन उमाटे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश निर्गमित केले; मात्र जिल्हा प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे सदर शेतकऱ्यांने तिसऱ्यांदा न्यायालयाच्या आदेशाने येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर मंगळवारी जप्ती आणली. याही वेळी गतवेळेप्रमाणे कार्यकारी अभियंत्याने मुदत वाढ घेत आलेली जप्ती टाळली. राज्य शासनाने वर्धा बायपासकरिता विनायक अर्जून उमाटे व जीवन विनायक उमाटे यांच्या मालकीची म्हसाळा येथील सर्वे नं. ३३ व ३४ मधील सुमारे ७१०० चौरसमिटर वडीलोपार्जित जमीन मामला क्र. ३/एलएक्यू.४७/१९९७-९८ अन्वये संपादन केलेली होती. या वडीलोपार्जित जमिनीचा त्यांनी जून १९९४ मध्ये अकृषक केली होती. त्यांच्या जमिनीमध्ये एक विहीर व पाच खोल्या होत्या. जमीन अधिग्रहीत करताना मिळालेला मोबदला अत्यल्प असल्याने उमाटे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने उमाटे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी मुद्दल ८० लाख ७९ हजार २७३ रुपये व्याजासह देण्याचा आदेश शासनाला दिला. त्या विरूद्ध शासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सुद्धा वर्धा न्यायालयाचा आदेश कायम ठेवून सरकारला रक्कम व्याजासह उमाटे यांना देण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उमाटे यांनी वारंवार संबंधित कार्यालयांना भेटी देवून रक्कम न्यायालयात जमा करण्याच्या विणवन्या केल्या. न्यायालयाच्या या आदेशाबाबत जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचे दिसले. यामुळे उमाटे यांनी ३१ मार्च २०१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर पहिला जप्ती आदेश आणला. उमाटे जप्ती घेवून गेले असता येथे एकमेकांकडे बोट दाखविण्याचे प्रकार झाले. अखेर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा यांनी उमाटे यांच्याशी चर्चा करून सदर रक्कम ३१ जुलै २०१५ पर्यंत न्यायालयात जमा करण्याचे आश्वासन देत जप्ती टाळली.जुलै महिना लोटूनसुद्धा त्याची पूर्तता झाली नाही. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयाला पुन्हा एका महिन्याची मुदतवाढ मागितली. तरीही त्यांच्याकडून मोबदला मिळाला नाही. यामुळे १५ आॅक्टोबर २०१५ रोजी दुसरा जप्ती आदेश जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. याही वेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्यालयाने पत्रान्वये डिसेंबर २०१५ पर्यंत भूसंपादनाची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आश्वासन देवून जप्ती टाळली. या मुदतीतही शासनाने उमाटे यांना रक्कम दिले नाही. शासनाजवळ निधी नसेल तर त्यांनी आमच्या जमिनी परत कराव्यात असे उमाटे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. नाईलाजास्तव आज पुन्हा उमाटे तिसरा जप्ती आदेश घेवून दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची जप्ती केल्याशिवाय व सिल लावल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती; मात्र याही वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पुन्हा २ महिन्याचा वेळ मागून जप्ती टाळली.(प्रतिनिधी)