शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

कृषी विभागातर्फे बियाणे वाटपात दुजाभाव

By admin | Updated: November 29, 2014 01:57 IST

बिज उत्पादन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयाकडून बियाणे वाटपात दुजाभाव झाल्याची चर्चा असून, मर्जीतील काही लोकांना...

कारंजा (घाडगे) : बिज उत्पादन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयाकडून बियाणे वाटपात दुजाभाव झाल्याची चर्चा असून, मर्जीतील काही लोकांना ते देण्यात आल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या या कार्यक्रमांतर्गत प्रति शेतकरी ४० किलो चना व २० किलो गहू बियाणे वाटप करायचे होते, हे बियाणे केव्हा आले आणि केव्हा वितरीत झाले याचा थांगपत्ताच शेतकऱ्यांना लागला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दलालामार्फत आलेल्या शेतकऱ्यांना बियाणे देत बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. खतांचेही वाटप असेच करण्यात आले. एका गावासाठी आलेली खते, गुपचूपपणे एजंटामार्फत दुसऱ्या गावातील मर्जीतील शेतकऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. सन २०१४-१५ करीता मनरेगांतर्गत फळबाग लागवड कार्र्यक्रमामध्ये, तालुका स्तरावर ५११ लाभार्र्थ्यांची निवड झाली. ४२ ग्रामपंचायती मिळून इस्त्राईल पद्धतीने ४२८ हेक्टर मध्ये संत्रा लागवड झाली. ६.७ हेक्टर लिंबू, ३.६ हेक्टर मोसंबी, ६.७ हेक्टर आवळा, २.५० हेक्टर सिताफळ व ९.१० हेक्टरमध्ये आंबा लावलेला दाखविण्यात आला. खड्डे खोदले व इतर कामासाठी अनुदान देण्यात आले. पण बऱ्याच प्रमाणात हे अनुदान कागदोपत्रीच दाखवून घोळ झाल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)