शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागातर्फे बियाणे वाटपात दुजाभाव

By admin | Updated: November 29, 2014 01:57 IST

बिज उत्पादन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयाकडून बियाणे वाटपात दुजाभाव झाल्याची चर्चा असून, मर्जीतील काही लोकांना...

कारंजा (घाडगे) : बिज उत्पादन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयाकडून बियाणे वाटपात दुजाभाव झाल्याची चर्चा असून, मर्जीतील काही लोकांना ते देण्यात आल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या या कार्यक्रमांतर्गत प्रति शेतकरी ४० किलो चना व २० किलो गहू बियाणे वाटप करायचे होते, हे बियाणे केव्हा आले आणि केव्हा वितरीत झाले याचा थांगपत्ताच शेतकऱ्यांना लागला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दलालामार्फत आलेल्या शेतकऱ्यांना बियाणे देत बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. खतांचेही वाटप असेच करण्यात आले. एका गावासाठी आलेली खते, गुपचूपपणे एजंटामार्फत दुसऱ्या गावातील मर्जीतील शेतकऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. सन २०१४-१५ करीता मनरेगांतर्गत फळबाग लागवड कार्र्यक्रमामध्ये, तालुका स्तरावर ५११ लाभार्र्थ्यांची निवड झाली. ४२ ग्रामपंचायती मिळून इस्त्राईल पद्धतीने ४२८ हेक्टर मध्ये संत्रा लागवड झाली. ६.७ हेक्टर लिंबू, ३.६ हेक्टर मोसंबी, ६.७ हेक्टर आवळा, २.५० हेक्टर सिताफळ व ९.१० हेक्टरमध्ये आंबा लावलेला दाखविण्यात आला. खड्डे खोदले व इतर कामासाठी अनुदान देण्यात आले. पण बऱ्याच प्रमाणात हे अनुदान कागदोपत्रीच दाखवून घोळ झाल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)