शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवी सुरक्षित

By admin | Updated: June 8, 2016 01:42 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर रिझर्व्ह बँकेनी लावलेली निर्बंध मागे घेवून २ मे रोजी बँकींग परवाना परत केला. यामुळे बँक पुढील

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती बँकेवर रिझर्व्ह बँकेनी लावलेली निर्बंध मागे घेवून २ मे रोजी बँकींग परवाना परत केला. यामुळे बँक पुढील व्यवसाय सुरू करण्यास पात्र झालेली आहे. बँकेच्या प्राधिकृत समिती सभेने बँकेच्या आर्थिक स्थितीचा १ जून रोजी आढावा घेऊन बँकींग व्यवहार सुरू करण्यासाठी धोरण ठरविल्याची माहिती वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाने कळविली आहे. बँकेतील ठेवीबाबत अनेकांची चिंता कायमच होती. त्यांची ही चिंता कमी करण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवीदाराच्या ठेवी सुरक्षित असून ठेवी परत करण्यासंदर्भात आवश्यक धोरण ठरविण्यात आले आहे. सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर व्याज आकरणी करण्यात येत असल्याचेही त्यांच्याकडून कळविण्यात आले आहे. बँकेचे व्यवहार गत दोन वर्षांपासून पूर्णत: बंद असल्यामुळे बहुतांश मुदती ठेवीची ड्यूट डेट संपलेली आहे. तसेच त्यांचे नुतणीकरण करता आले नाही. अशा ठेवींवर ड्यू डेटपासून आज पर्यंतच्या कालावधीकरिता निर्धारित व्याजदाराने किंवा ठेवीचे ड्यू डेट झाल्यापासून जो कालावधी झाला असेल त्या कालावधीसाठी मुदती ठेवीचा व्याजदर या दोन पैकी जो जो कमी असेल त्या दराने व्याज आकारून नुतणीकरण करण्यात येणार आहे. यापुढे सुधारित व्याजदराने त्याचे नुतणीकरण करण्यात येणार आहे. ठेवीदाराचे हित सुरक्षित राहील व त्यांच्या ठेवीवरील व्याजावरचेही नुकसान होणार नाही.ठेवीदारांकडे कोणत्याही प्रकारचे तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे थकित कर्ज असल्यास ठेवीची रक्कम त्यांच्या कर्जात वळती करण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडे असलेल्या बँक कर्जाच्या वसुलीपोटी ठेवीदारांच्या संमतीने बँकेत असलेल्या ठेवीची रक्कम वळती करून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल. असे करताना मात्र इतरांच्या कर्ज खात्यावर ठेवीची रक्कम वळविता येणार नाही.बँकेचे व्यवहार बंद असल्यामुळे मंजूर कर्ज मर्यादेवर व्यवहार होऊ न शकल्याने कर्ज थकित झालेले आहे. अशा कर्जदारांकडून घेणे असलेल्या रक्कमेसह ड्यू झालेल्या व्याजाचा भरणा करून त्यांचे कर्ज खात्यांचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाने कळविले आहे.(प्रतिनिधी)बँकेचे नवे धोरण ४मुदती ठेवी, चालू खाते व बचत खात्याबाबत कोणत्याही ठेवीदाराला त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम मुदतपूर्व, मुदतीनंतर सद्यस्थितीत किमान एक वर्ष परत करता येणार नाही. फक्त वैयक्तिक खातेदारांना बचत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाची उचल ५० टक्के प्रमाणे तिमाही अदा करण्यात येईल. चालू खात्यावर तथा बचत खात्यावर जुन्या बाकीतून रक्कम काढता येणार नाही. ही कारवाई १ जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे. नागरी बँक व सोसायटीचे मुदती ठेवीचे ड्यू डेटपर्यंत व्याजाची रक्कम त्याचे बचत ठेव, चालू ठेव खात्यात जमा करण्यात येईल; परंतु व्याजाची रक्कम उचल करता येणार नसल्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.