शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

वर्धेत निलंबित बीटीची ४,६१५ पाकिटे सील

By admin | Updated: May 22, 2017 01:45 IST

खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. यात अनेक बनावट बियाणे आणि खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची

शेतकऱ्यांना सावधानीचा इशारा : गत हंगामात बनावटीच्या प्रकारातून ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. यात अनेक बनावट बियाणे आणि खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची प्रकरणे आहेत. यात कृषी संचालकांनी नुकतेच निलंबित केलेली बीटी बियाणे बाजारात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. यावरून कृषी विभागाने निलंबित केलेल्या ‘राशी ६५९’ या वाणाची बीटी बियाणे सील केली आहे. या कंपनीने कृषी संचालकांच्या कारवाई विरोधात वरिष्ठाकडे धाव घेतली आहे. यावर निर्णय होईपर्यंत या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात बीटी बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहे. गत हंगामात कारंजा येथे बोगस कापूस बियाणे विक्री आणि साठवणूक प्रकरणी चंद्रशेखर फरकाडे याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तसेच बोगस रासायनिक खत साठवणूक केल्याप्रकरणी हिंंगणघाट तालुक्यातील सास्ताबाद येथील सुभाष चौधरी व मंगेश चौधरी तसेच गुजरात येथील अश्विन पटेल या तिघांचर गुन्हा दाखल केला होता. तर बोगस किटकनाशक विक्री प्रकरणी वर्धेतील रामचंद्र मोहरकर नामक व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर तक्रार करताच पोलीस कारवाई झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यंदा पावसाळा लवकर असल्याचे वेधशाळेने जाहीर केले आहे. शेतकरी आपल्या कामात व्यस्त झाला आहे. यामुळे लवकरच बळीराजाकडून बी-बियाणे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू होणार आहे. त्याची घाई पाहून बाजारात बोगस बियाणे आणि खत विक्री करणाऱ्यांकडून त्याची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणतेही बियाणे खरेदी करताना त्याची पावती अवश्य घ्यावी अशा सूचना आहेत. ९१ कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द ४गत हंगामात बोगस बियाणे, खत व किटकनाशक विक्री प्रकरणी कृषी विभागाच्यावतीने चांगलीच कामगीरी केली. कृषी विभागाच्यावतीने बियाणे, खत व किटकनाशकाची एकूण ४५९ नमुन्यांची तपासणी केली. यात दोषी आढळलेल्या एकूण ९१ कृषीकेंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेल्या परवाण्यात २९ बियाणे विक्रेते, ३१ खत विक्रेते आणि ३१ किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दोन बियाणे विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आला आहे. तर ंिबयाणे, खत आणि किटकनाशकाची प्रत्येकी एक अशी तीन प्रकरणे पोलिसांत दाखल करण्यात आली आहेत. ३५ व्यावसायिकांना विक्रीबंदचे आदेश ४कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्ह्यतील एकूण ३५ व्यावसायिकांना विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यात २९ बियाणे विक्रेते, चार खत दोन किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. कृषी संचालकांच्या आदेशावरून बीटीचे ‘राशी ६५९’ हे वाण जप्त करण्यात आले आहे. - संजय बमनोटे, सहायक जिल्हा कृषी अधिकारी, जि.प. वर्धा