शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

एसडीओंकडे विद्यार्थ्यांच्या येरझारा

By admin | Updated: June 21, 2015 02:30 IST

दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते.

प्रवेशातील अडसर : प्रमाणपत्रांच्या प्रकरणांचा पाऊसवर्धा : दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. सर्वप्रथम विविध प्रमाणपत्रांकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे विद्यार्थी धाव घेतात; पण तेथून वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. तीन ते चार दिवसांपासूनची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांद्वारे रोष व्यक्त होत आहे. वर्धा उपविभागात देवळी-पुलगाव, सेलू आणि वर्धा या तालुक्यांचा समावेश आहे. तीनही तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रांची प्रकरणे येत आहेत. यात तहसीलदार कार्यालयांतून आलेल्या प्रकरणांसह पालक, विद्यार्थी स्वत: घेऊन आलेल्या प्रकरणांचाही मोठा वाटा आहे. ही प्रकरणे निकाली काढताना उपविभागीय अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाकरिता महत्त्वाची ठरणारी ही प्रमाणपत्रे वेळेत होणे अपेक्षित आहे. गत तीन दिवसांपासून एसडीओ कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होत आहे. यातही प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने प्रवेशापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, अशी भीती विद्यार्थी, पालक व्यक्त करीत आहेत. या प्रकारामुळेच एका युवकाने एसडीओ कार्यालयात शिवीगाळ करीत तोडफोड केली. सध्या जात, नॉन क्रिमीलेअर यासह अन्य प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी व पालक एसडीओ कार्यालयात ठिय्या मांडून असल्याचे दिसते. तहसील कार्यालयातून प्रकरणे त्वरित पाठविली जात नसल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक तहसीलदारांच्या सहीनंतर प्रकरण स्वत: घेऊन एसडीओ कार्यालय गाठतात; पण येथे ती स्वीकारली जात नाहीत. यामुळे त्यांना संताप अनावर होतो. गत तीन दिवसांपासून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय याच बाबीमुळे चर्चेत आले आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी याकडे लक्ष देत विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांतून होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)वेळेवर आणली जाताहेत प्रकरणेदहावी, बारावीचे निकाल लागताच विद्यार्थ्यांनी जात, नॉन क्रिमीलेअर आदी प्रमाणपत्रांची प्रकरणे सादर करणे गरजेचे होते; पण तसे होताना दिसत नाही. विद्यार्थी व पालक वेळेवर प्रकरणे घेऊन येत आहेत. यामुळे प्रवेशाच्या वेळी त्यांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसते. गत १५ दिवसांत जेवढी प्रकरणे आली नाही तेवढी प्रकरणे गत तीन ते चार दिवसांतच प्राप्त होत आहेत. प्रवेशाचा दिनांक जवळ आल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्रांसाठी प्रकरणे दाखल करीत असल्याने त्यांची तारांबळ उडत असल्याचे एसडीओ कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.प्रवेशातही होतोय विलंबगत काही दिवसांपासून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पालकांद्वारे सांगितले जात आहे. यामुळे त्वरित प्रमाणपत्र मिळणे गरजेचे झाले आहे.