शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओंकडे विद्यार्थ्यांच्या येरझारा

By admin | Updated: June 21, 2015 02:30 IST

दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते.

प्रवेशातील अडसर : प्रमाणपत्रांच्या प्रकरणांचा पाऊसवर्धा : दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. सर्वप्रथम विविध प्रमाणपत्रांकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे विद्यार्थी धाव घेतात; पण तेथून वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. तीन ते चार दिवसांपासूनची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांद्वारे रोष व्यक्त होत आहे. वर्धा उपविभागात देवळी-पुलगाव, सेलू आणि वर्धा या तालुक्यांचा समावेश आहे. तीनही तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रांची प्रकरणे येत आहेत. यात तहसीलदार कार्यालयांतून आलेल्या प्रकरणांसह पालक, विद्यार्थी स्वत: घेऊन आलेल्या प्रकरणांचाही मोठा वाटा आहे. ही प्रकरणे निकाली काढताना उपविभागीय अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाकरिता महत्त्वाची ठरणारी ही प्रमाणपत्रे वेळेत होणे अपेक्षित आहे. गत तीन दिवसांपासून एसडीओ कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होत आहे. यातही प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने प्रवेशापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, अशी भीती विद्यार्थी, पालक व्यक्त करीत आहेत. या प्रकारामुळेच एका युवकाने एसडीओ कार्यालयात शिवीगाळ करीत तोडफोड केली. सध्या जात, नॉन क्रिमीलेअर यासह अन्य प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी व पालक एसडीओ कार्यालयात ठिय्या मांडून असल्याचे दिसते. तहसील कार्यालयातून प्रकरणे त्वरित पाठविली जात नसल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक तहसीलदारांच्या सहीनंतर प्रकरण स्वत: घेऊन एसडीओ कार्यालय गाठतात; पण येथे ती स्वीकारली जात नाहीत. यामुळे त्यांना संताप अनावर होतो. गत तीन दिवसांपासून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय याच बाबीमुळे चर्चेत आले आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी याकडे लक्ष देत विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांतून होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)वेळेवर आणली जाताहेत प्रकरणेदहावी, बारावीचे निकाल लागताच विद्यार्थ्यांनी जात, नॉन क्रिमीलेअर आदी प्रमाणपत्रांची प्रकरणे सादर करणे गरजेचे होते; पण तसे होताना दिसत नाही. विद्यार्थी व पालक वेळेवर प्रकरणे घेऊन येत आहेत. यामुळे प्रवेशाच्या वेळी त्यांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसते. गत १५ दिवसांत जेवढी प्रकरणे आली नाही तेवढी प्रकरणे गत तीन ते चार दिवसांतच प्राप्त होत आहेत. प्रवेशाचा दिनांक जवळ आल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्रांसाठी प्रकरणे दाखल करीत असल्याने त्यांची तारांबळ उडत असल्याचे एसडीओ कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.प्रवेशातही होतोय विलंबगत काही दिवसांपासून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पालकांद्वारे सांगितले जात आहे. यामुळे त्वरित प्रमाणपत्र मिळणे गरजेचे झाले आहे.