शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

एसडीओंकडे विद्यार्थ्यांच्या येरझारा

By admin | Updated: June 21, 2015 02:30 IST

दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते.

प्रवेशातील अडसर : प्रमाणपत्रांच्या प्रकरणांचा पाऊसवर्धा : दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. सर्वप्रथम विविध प्रमाणपत्रांकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे विद्यार्थी धाव घेतात; पण तेथून वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. तीन ते चार दिवसांपासूनची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांद्वारे रोष व्यक्त होत आहे. वर्धा उपविभागात देवळी-पुलगाव, सेलू आणि वर्धा या तालुक्यांचा समावेश आहे. तीनही तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रांची प्रकरणे येत आहेत. यात तहसीलदार कार्यालयांतून आलेल्या प्रकरणांसह पालक, विद्यार्थी स्वत: घेऊन आलेल्या प्रकरणांचाही मोठा वाटा आहे. ही प्रकरणे निकाली काढताना उपविभागीय अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाकरिता महत्त्वाची ठरणारी ही प्रमाणपत्रे वेळेत होणे अपेक्षित आहे. गत तीन दिवसांपासून एसडीओ कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होत आहे. यातही प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने प्रवेशापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, अशी भीती विद्यार्थी, पालक व्यक्त करीत आहेत. या प्रकारामुळेच एका युवकाने एसडीओ कार्यालयात शिवीगाळ करीत तोडफोड केली. सध्या जात, नॉन क्रिमीलेअर यासह अन्य प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी व पालक एसडीओ कार्यालयात ठिय्या मांडून असल्याचे दिसते. तहसील कार्यालयातून प्रकरणे त्वरित पाठविली जात नसल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक तहसीलदारांच्या सहीनंतर प्रकरण स्वत: घेऊन एसडीओ कार्यालय गाठतात; पण येथे ती स्वीकारली जात नाहीत. यामुळे त्यांना संताप अनावर होतो. गत तीन दिवसांपासून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय याच बाबीमुळे चर्चेत आले आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी याकडे लक्ष देत विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांतून होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)वेळेवर आणली जाताहेत प्रकरणेदहावी, बारावीचे निकाल लागताच विद्यार्थ्यांनी जात, नॉन क्रिमीलेअर आदी प्रमाणपत्रांची प्रकरणे सादर करणे गरजेचे होते; पण तसे होताना दिसत नाही. विद्यार्थी व पालक वेळेवर प्रकरणे घेऊन येत आहेत. यामुळे प्रवेशाच्या वेळी त्यांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसते. गत १५ दिवसांत जेवढी प्रकरणे आली नाही तेवढी प्रकरणे गत तीन ते चार दिवसांतच प्राप्त होत आहेत. प्रवेशाचा दिनांक जवळ आल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्रांसाठी प्रकरणे दाखल करीत असल्याने त्यांची तारांबळ उडत असल्याचे एसडीओ कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.प्रवेशातही होतोय विलंबगत काही दिवसांपासून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पालकांद्वारे सांगितले जात आहे. यामुळे त्वरित प्रमाणपत्र मिळणे गरजेचे झाले आहे.