शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पुन्हा ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील काही शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश : शनिवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना कोरोनामुक्त ठेवणे तसेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळून इतर सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी निर्गमित केला आहे.जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ३२५ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तर पाचवी ते आठवीचे शिक्षण देणाऱ्या ९९९ शाळा आहेत. हिंगणघाट तालुक्यातील एका निवासी शाळेत तब्बल १०० विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील काही शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत. 

ऑनलाईन पद्धतीने देणार शिक्षणवैद्यकीय शिक्षणाशी संबंधीत महाविद्यालय वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असले तरी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. शिवाय शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना आपले काम नियमितपणे करता येणार आहे.

परिसर करावा लागेत निर्जंतूक खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालय परिसर तसेच वर्ग खोल्या शाळा व महाविद्यालय प्रशासनाकडून निर्जंतूक करणे क्रमप्राप्त राहणार आहे.

विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये या हेतूने खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. तर वर्धा शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८ वा.पासून सोमवारी २२ फेब्रुवारी सकाळी ८ वा.पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी राहणार आहे. या काळात नागरिकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

आता ३६ तास राहणार सक्तीची संचारबंदी

कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता संसर्ग लक्षात घेता शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणचा परिसर निर्जंतूक केला जाणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर पोलीस, महसूल व राजस्व विभागातील अधिकारी व कर्मचारी दंडात्मक कारवाई करणार आहेत.

ही प्रतिष्ठाने राहतील बंदचहा व पानटपरी, बिगर जीवनावश्यक साहित्याचे दुकान, हॉटेल, रेस्टॉरेंट, ट्रॅव्हल्स, रापमच्या बसेस, ऑटोरिक्षा, जीम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, चित्रपटगृह, मॉल, वाचनालय, ग्रंथालय, आठवडी बाजार, पर्यटनस्थळ, पार्क, बगीचे, पेट्रोलपंप, खासगी व शासकीय बँका आदी बंद राहणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या