शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पुन्हा ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील काही शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश : शनिवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना कोरोनामुक्त ठेवणे तसेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळून इतर सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी निर्गमित केला आहे.जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ३२५ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तर पाचवी ते आठवीचे शिक्षण देणाऱ्या ९९९ शाळा आहेत. हिंगणघाट तालुक्यातील एका निवासी शाळेत तब्बल १०० विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील काही शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत. 

ऑनलाईन पद्धतीने देणार शिक्षणवैद्यकीय शिक्षणाशी संबंधीत महाविद्यालय वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असले तरी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. शिवाय शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना आपले काम नियमितपणे करता येणार आहे.

परिसर करावा लागेत निर्जंतूक खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालय परिसर तसेच वर्ग खोल्या शाळा व महाविद्यालय प्रशासनाकडून निर्जंतूक करणे क्रमप्राप्त राहणार आहे.

विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये या हेतूने खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. तर वर्धा शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८ वा.पासून सोमवारी २२ फेब्रुवारी सकाळी ८ वा.पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी राहणार आहे. या काळात नागरिकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

आता ३६ तास राहणार सक्तीची संचारबंदी

कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता संसर्ग लक्षात घेता शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणचा परिसर निर्जंतूक केला जाणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर पोलीस, महसूल व राजस्व विभागातील अधिकारी व कर्मचारी दंडात्मक कारवाई करणार आहेत.

ही प्रतिष्ठाने राहतील बंदचहा व पानटपरी, बिगर जीवनावश्यक साहित्याचे दुकान, हॉटेल, रेस्टॉरेंट, ट्रॅव्हल्स, रापमच्या बसेस, ऑटोरिक्षा, जीम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, चित्रपटगृह, मॉल, वाचनालय, ग्रंथालय, आठवडी बाजार, पर्यटनस्थळ, पार्क, बगीचे, पेट्रोलपंप, खासगी व शासकीय बँका आदी बंद राहणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या