शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पुन्हा ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील काही शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश : शनिवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना कोरोनामुक्त ठेवणे तसेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळून इतर सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी निर्गमित केला आहे.जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ३२५ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तर पाचवी ते आठवीचे शिक्षण देणाऱ्या ९९९ शाळा आहेत. हिंगणघाट तालुक्यातील एका निवासी शाळेत तब्बल १०० विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील काही शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत. 

ऑनलाईन पद्धतीने देणार शिक्षणवैद्यकीय शिक्षणाशी संबंधीत महाविद्यालय वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असले तरी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. शिवाय शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना आपले काम नियमितपणे करता येणार आहे.

परिसर करावा लागेत निर्जंतूक खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालय परिसर तसेच वर्ग खोल्या शाळा व महाविद्यालय प्रशासनाकडून निर्जंतूक करणे क्रमप्राप्त राहणार आहे.

विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये या हेतूने खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. तर वर्धा शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८ वा.पासून सोमवारी २२ फेब्रुवारी सकाळी ८ वा.पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी राहणार आहे. या काळात नागरिकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

आता ३६ तास राहणार सक्तीची संचारबंदी

कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता संसर्ग लक्षात घेता शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणचा परिसर निर्जंतूक केला जाणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर पोलीस, महसूल व राजस्व विभागातील अधिकारी व कर्मचारी दंडात्मक कारवाई करणार आहेत.

ही प्रतिष्ठाने राहतील बंदचहा व पानटपरी, बिगर जीवनावश्यक साहित्याचे दुकान, हॉटेल, रेस्टॉरेंट, ट्रॅव्हल्स, रापमच्या बसेस, ऑटोरिक्षा, जीम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, चित्रपटगृह, मॉल, वाचनालय, ग्रंथालय, आठवडी बाजार, पर्यटनस्थळ, पार्क, बगीचे, पेट्रोलपंप, खासगी व शासकीय बँका आदी बंद राहणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या