शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

स्कूल बसला अपघात; चालकासह विद्यार्थी जखमी

By admin | Updated: February 2, 2016 01:47 IST

शाळेतन विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्याकरिता निघालेल्या स्कूल बसला भूगाव परिसरात अपघात झाला.

भूगाव येथील घटना : लॉएड्स स्कूलची बस वर्धा : शाळेतन विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्याकरिता निघालेल्या स्कूल बसला भूगाव परिसरात अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला तर सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उत्तम गाल्वा कंपनीच्या मुख्य द्वाराजवळ घडली. ही बस भूगाव येथील भवन्स लॉएड्स विद्या निकेतनची आहे. वेदांत गोपाल राठी, प्रथमेश राजेश इंगोले, तंजिला बेग, नारंग निनावे, हृषीकेश महेश कुंभारे, नीतू महेश कुंभारे, मुक्ता मंगरूळकर अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे असल्याची माहिती सेवाग्राम रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली. या अपघातात चालक मनोज किन्हाळकर (४२) रा. वायगाव (नि.) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत व सेवाग्राम रुग्णालयात एकच गर्दी केली. विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याकरिता व त्यांना घरी सोडण्याकरिता शाळेकडून भंगार बसेस वापरण्यात येत असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला.पोलीस सूत्रानुसार, भूगाव येथील भवन्स लॉयस्ट विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन एमएच ३१ - ६२३० ही बस मुख्य मार्गाकडे येत होती. दरम्यान येथील उत्तम गाल्वा कंपनीच्या द्वाराजवळ ही बसला अपघात झाला. बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्रोषाणे संपूर्ण परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढत त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. घटनेची माहिती सावंगी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (तालुका प्रतिनिधी)भंगार बसमुळे अपघात ?शाळेतून विद्यार्थ्यांना घरी सोडण्याकरिता व शाळेत नेण्याकरिता शाळा व्यवस्थापनाकडून भंगार बसचा वापर होत असल्याचा आरोप यावेळी पालकांकडून करण्यात येत होता. या संदर्भात शाळेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्याचे पालक बोलत होते. मात्र शाळेकडून या संदर्भात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळेच अपघात झाल्याचे म्हणत पालकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.मुख्याध्यापिकेची चुप्पीशाळेच्या वाहनाला झालेल्या अपघाताबाबत मुख्याध्यापिका कीर्ती मिश्रा यांना विचारणा केली असता त्यांनी ‘या संदर्भात मी काहीच बोलण्याच्या स्थितीत नाही’ असे उत्तर दिले. यामुळे शाळेकडून या संदर्भात कुठलीही माहिती मिळू शकली नाही.