शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

स्कूल बसला अपघात; चालकासह विद्यार्थी जखमी

By admin | Updated: February 2, 2016 01:47 IST

शाळेतन विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्याकरिता निघालेल्या स्कूल बसला भूगाव परिसरात अपघात झाला.

भूगाव येथील घटना : लॉएड्स स्कूलची बस वर्धा : शाळेतन विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्याकरिता निघालेल्या स्कूल बसला भूगाव परिसरात अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला तर सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उत्तम गाल्वा कंपनीच्या मुख्य द्वाराजवळ घडली. ही बस भूगाव येथील भवन्स लॉएड्स विद्या निकेतनची आहे. वेदांत गोपाल राठी, प्रथमेश राजेश इंगोले, तंजिला बेग, नारंग निनावे, हृषीकेश महेश कुंभारे, नीतू महेश कुंभारे, मुक्ता मंगरूळकर अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे असल्याची माहिती सेवाग्राम रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली. या अपघातात चालक मनोज किन्हाळकर (४२) रा. वायगाव (नि.) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत व सेवाग्राम रुग्णालयात एकच गर्दी केली. विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याकरिता व त्यांना घरी सोडण्याकरिता शाळेकडून भंगार बसेस वापरण्यात येत असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला.पोलीस सूत्रानुसार, भूगाव येथील भवन्स लॉयस्ट विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन एमएच ३१ - ६२३० ही बस मुख्य मार्गाकडे येत होती. दरम्यान येथील उत्तम गाल्वा कंपनीच्या द्वाराजवळ ही बसला अपघात झाला. बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्रोषाणे संपूर्ण परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढत त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. घटनेची माहिती सावंगी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (तालुका प्रतिनिधी)भंगार बसमुळे अपघात ?शाळेतून विद्यार्थ्यांना घरी सोडण्याकरिता व शाळेत नेण्याकरिता शाळा व्यवस्थापनाकडून भंगार बसचा वापर होत असल्याचा आरोप यावेळी पालकांकडून करण्यात येत होता. या संदर्भात शाळेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्याचे पालक बोलत होते. मात्र शाळेकडून या संदर्भात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळेच अपघात झाल्याचे म्हणत पालकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.मुख्याध्यापिकेची चुप्पीशाळेच्या वाहनाला झालेल्या अपघाताबाबत मुख्याध्यापिका कीर्ती मिश्रा यांना विचारणा केली असता त्यांनी ‘या संदर्भात मी काहीच बोलण्याच्या स्थितीत नाही’ असे उत्तर दिले. यामुळे शाळेकडून या संदर्भात कुठलीही माहिती मिळू शकली नाही.