शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ योजना जिल्हा परिषदेमार्फतच राबवाव्या

By admin | Updated: December 24, 2014 23:04 IST

शेतकरी हिताच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्यावतीने प्रभावीपणे राबविण्यात आल्या. कुठलीही तक्रार नसताना त्या अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे वळविण्यात आल्या आहेत.

वर्धा : शेतकरी हिताच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्यावतीने प्रभावीपणे राबविण्यात आल्या. कुठलीही तक्रार नसताना त्या अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी हिताच्या या योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फतच राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जि.प. कृषी सभापती श्यामलता अग्रवाल यांनी वरिष्ठांना निवेदनही सादर केले आहे.मंगळवारी (दि.२३) जिल्हा परिषदेला अहमदनगर येथील जि.प. उपाध्यक्षांनी भेट दिली. त्यांच्याशीही माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल यांनी चर्चा केली. जि.प. मार्फत केंद्रपुरस्कृत गळित धान्य, कडधान्य, सधन कापूस, ऊस विकास, कृषी अभियांत्रिकी, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन आदी योजना विना तक्रार प्रभावीपणे राबविण्यात आल्यात; पण या सर्व योजना सध्या कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकरी हिताच्या या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या योजनेत पीक संरक्षण उपकरणे, कृषी अवजारे, जिप्सम, सिंचन पाईप, ट्रॅक्टरवरील अवजारे, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन आदी वस्तू गरजू व वंचित शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या योजना जि.प. कृषी विभभागामार्फत आजपर्यंत विनातक्रार राबविण्यात आल्या असताना त्या हस्तांतरित करण्यात आल्याने संशय व्यक्त होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)