शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘त्या’ योजना जिल्हा परिषदेमार्फतच राबवाव्या

By admin | Updated: December 24, 2014 23:04 IST

शेतकरी हिताच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्यावतीने प्रभावीपणे राबविण्यात आल्या. कुठलीही तक्रार नसताना त्या अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे वळविण्यात आल्या आहेत.

वर्धा : शेतकरी हिताच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्यावतीने प्रभावीपणे राबविण्यात आल्या. कुठलीही तक्रार नसताना त्या अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी हिताच्या या योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फतच राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जि.प. कृषी सभापती श्यामलता अग्रवाल यांनी वरिष्ठांना निवेदनही सादर केले आहे.मंगळवारी (दि.२३) जिल्हा परिषदेला अहमदनगर येथील जि.प. उपाध्यक्षांनी भेट दिली. त्यांच्याशीही माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल यांनी चर्चा केली. जि.प. मार्फत केंद्रपुरस्कृत गळित धान्य, कडधान्य, सधन कापूस, ऊस विकास, कृषी अभियांत्रिकी, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन आदी योजना विना तक्रार प्रभावीपणे राबविण्यात आल्यात; पण या सर्व योजना सध्या कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकरी हिताच्या या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या योजनेत पीक संरक्षण उपकरणे, कृषी अवजारे, जिप्सम, सिंचन पाईप, ट्रॅक्टरवरील अवजारे, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन आदी वस्तू गरजू व वंचित शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या योजना जि.प. कृषी विभभागामार्फत आजपर्यंत विनातक्रार राबविण्यात आल्या असताना त्या हस्तांतरित करण्यात आल्याने संशय व्यक्त होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)