शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

वेळापत्रकाच्या अ‍ॅलर्जीने विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:42 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे विद्यार्थी, नोकरदार तथा प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतील वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, एकही बस वेळेवर सुटत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनोकरदारांचे ‘शेड्यूल’ही प्रभावित : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे विद्यार्थी, नोकरदार तथा प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतील वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, एकही बस वेळेवर सुटत नसल्याचे चित्र आहे. परिवहनचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शहरांतील शाळा, महाविद्यालये गाठताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा आधार घ्यावा लागतो. वर्धा हे जिल्हास्थळ असल्याने देवळी, सेलू, खरांगणा (मो.), कानगाव, वायगाव (नि.), रोहणा तथा अन्य ग्रामीण भागातील विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येतात. यासाठी त्यांना बसचा प्रवास करावा लागतो. महामंडळाने विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परिवहनचा प्रवास सोईस्कर पडतो; पण बसेसचे वेळापत्रक पाळले जात नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर येत आहे.पुलगाव, आर्वी, हिंगणघाट, वर्धा व तळेगाव (श्या.पं.), असे जिल्ह्यात पाच आगार आहेत. या आगारांतून सुटणाºया बसेस वेळेवर सोडल्या जात नाहीत. यामुळे जिल्ह्यात कुठेही बसेस वेळेवर पोहोचत नसल्याचे दिसून येते. परिणामी, विद्यार्थी, नोकरदार यांचे ‘शेड्यूल’ प्रभावित होत आहे. नोकरदार व्यक्तींना कार्यालयात तर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात पोहोचायला वेळ होतो. यात त्यांना नुकसानही सोसावे लागते.परिवहन महामंडळाने वेळापत्रक पाळत वेळेवर बसेस सोडण्याची मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे; पण परिवहनला वेळापत्रकाची अ‍ॅलर्जी असल्याचेच दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.सकाळची बस दुपारी तर सायंकाळची बस रात्री उशिराआर्वी - तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या मनमानी कारभारामुळे शैक्षणिक फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील गावांतून मोठ्या प्रमाणात प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरात येतात. येथे येण्याकरिता एसटीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. यातच एसटीचे अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याने शाळा, महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.सकाळी १०.३० वाजता गावात पोहोचणारी बस दुपारपर्यंतही पोहोचत नाही. सायंकाळी ५ वाजताची आर्वी येथून सुटणारी बस रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत सोडली जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचालयाही वेळ होतो आणि परतीचा प्रवास करतानाही ताटकळ होते. रात्री ९ ते १० वाजता विद्यार्थी घरी पोहोचत आहेत. यात विशेषत: मुलींचे पालक ती घरी परतली नाही म्हणून गावातील प्रवासी निवाºयांवर प्रतीक्षा करताना दिसतात. हे चित्र तालुक्यात नित्याचे झाले आहे. अद्याप बस का आली नाही, याबाबत दूरध्वनीवर चौकशी केली असता उद्धट उत्तरे दिली जातात. या सर्व बाबींमुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांमध्ये एसटीबाबत रोष निर्माण झाला आहे. याचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सर्कसपूर येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचणारी बस आणि सायंकाळी ५ वाजताची बस कधीही वेळेवर येत नाही. निंबोली (शेंडे) येथे तर फारच बिकट परिस्थिती आहे. या गावाला जाण्याकरिता असलेली बस महिन्यातील निम्मे दिवस नादुरुस्त असते. शिवाय आर्वी तालुक्यातील संपूर्ण गावांत अशीच स्थिती आहे. याबाबत सरपंच संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसटी आगार आणि एसटी व्यवस्थापन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ग्रामीण भगातील बसेस वेळेवर पोहोचत नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील बसफेºया वेळेवर न सोडल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ