शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचा तुटवडा; शेतकरी हैरान

By admin | Updated: September 18, 2014 23:39 IST

खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही.

आर्वी : खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही. खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी पेरणी विलंबाने केली आहे. आता खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. खताची उपलब्धता करुन देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांची डवरणी व फवारणीची कामे आटोपली आहे. आता पिकांची जोमदार वाढ असते. पिके परिपक्व होण्याच्या मार्गावर असल्याने या पिकांना योग्य वाढीसाठी युरिया खताची नितांत गरज असते. परंतू सध्या तालुक्यातील कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना युरिया न घेताच आल्या पावली परतावे लागते. हे चित्र तालुक्यातील अनेक गावात पहायला मिळते. यावर्षी खरीप हंगामातील बराचसा काळ पावसाच्या विलंबाने वाया गेला. पावसाच्या आगमानानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. यानंतरही काहीकाळ पाऊस गडप झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. अखेर पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता पिकांची स्थिती समाधानकारक असताना पिकांना द्यायला खत नसल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक गावातील सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव असल्याने उर्वरीत पिकातून माफक उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. पिकांना देण्याकरिता युरियाच बाजाराच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी कोणती खते पिकांना द्यावी, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)