शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
7
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
8
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
9
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
10
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
11
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
12
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
13
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
14
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
16
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
17
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
18
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर

युरियाचा तुटवडा; शेतकरी हैरान

By admin | Updated: September 18, 2014 23:39 IST

खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही.

आर्वी : खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही. खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी पेरणी विलंबाने केली आहे. आता खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. खताची उपलब्धता करुन देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांची डवरणी व फवारणीची कामे आटोपली आहे. आता पिकांची जोमदार वाढ असते. पिके परिपक्व होण्याच्या मार्गावर असल्याने या पिकांना योग्य वाढीसाठी युरिया खताची नितांत गरज असते. परंतू सध्या तालुक्यातील कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना युरिया न घेताच आल्या पावली परतावे लागते. हे चित्र तालुक्यातील अनेक गावात पहायला मिळते. यावर्षी खरीप हंगामातील बराचसा काळ पावसाच्या विलंबाने वाया गेला. पावसाच्या आगमानानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. यानंतरही काहीकाळ पाऊस गडप झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. अखेर पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता पिकांची स्थिती समाधानकारक असताना पिकांना द्यायला खत नसल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक गावातील सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव असल्याने उर्वरीत पिकातून माफक उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. पिकांना देण्याकरिता युरियाच बाजाराच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी कोणती खते पिकांना द्यावी, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)