शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

युरियाचा तुटवडा; शेतकरी हैरान

By admin | Updated: September 18, 2014 23:39 IST

खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही.

आर्वी : खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही. खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी पेरणी विलंबाने केली आहे. आता खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. खताची उपलब्धता करुन देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांची डवरणी व फवारणीची कामे आटोपली आहे. आता पिकांची जोमदार वाढ असते. पिके परिपक्व होण्याच्या मार्गावर असल्याने या पिकांना योग्य वाढीसाठी युरिया खताची नितांत गरज असते. परंतू सध्या तालुक्यातील कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना युरिया न घेताच आल्या पावली परतावे लागते. हे चित्र तालुक्यातील अनेक गावात पहायला मिळते. यावर्षी खरीप हंगामातील बराचसा काळ पावसाच्या विलंबाने वाया गेला. पावसाच्या आगमानानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. यानंतरही काहीकाळ पाऊस गडप झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. अखेर पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता पिकांची स्थिती समाधानकारक असताना पिकांना द्यायला खत नसल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक गावातील सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव असल्याने उर्वरीत पिकातून माफक उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. पिकांना देण्याकरिता युरियाच बाजाराच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी कोणती खते पिकांना द्यावी, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)