शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पक्षकाराच्या पैशाची अन् वेळेची बचत होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:23 IST

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. शिवाय, प्रकरणे आपसी समझोत्याने लवकर निकाली निघाल्यामुळे दोन्ही पक्षकरांना मानसिक समाधान मिळते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार पाटकर यांनी केले.

ठळक मुद्देविजयकुमार पाटकर : २९८ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. शिवाय, प्रकरणे आपसी समझोत्याने लवकर निकाली निघाल्यामुळे दोन्ही पक्षकरांना मानसिक समाधान मिळते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार पाटकर यांनी केले.राष्ट्रीय लोक अदालतीच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, जिल्हा शासकीय अभियोक्ता, वकील संघाचे अध्यक्ष सदस्य आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव निशांत परमा यांची उपस्थिती होती.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटकर पुढे म्हणाले, आपसी समझोत्यामुळे तडा गेलेल्या मनांना व दुरावलेल्या संबंधांना जोडण्याचा प्रयत्न या लोक अदालतीच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये पारिवारिक व सामाजिक स्नेह वाढतो, असे सांगितले.जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी १७२ प्रकरणे आपसी तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. सदर तडजोड झालेल्या प्रकरणामधील तडजोडीच्या रकमेचे मूल्य १ कोटी ९२ लाख ७६ हजार १८६ रुपये होते. त्याप्रमाणे वाद दाखलपूर्व प्रकरणांपैकी १२६ प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधील तडजोडीचे मूल्य ३१ लाख ५ हजार ९३७ रुपये होते.जिल्ह्यातील एकूण २९८ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले असून तडजोडीचे एकूण मूल्य २ कोटी २३ लाख ८२ हजार १२३ रुपये आहे.लोक अदालतीमध्ये सामोपचाराने वाद मिटवावे - निशांत परमादोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असल्यामुळे अदालतीमध्ये निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे, असे आवाहन याप्रसंगी निशांत परमा यांनी केले.

टॅग्स :Lokadalatलोकअदालत