शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दिल्ली येथे अहिंसा, अराजकीय व असंप्रदायिक तत्त्वावर सत्याग्रह

By admin | Updated: September 25, 2016 02:12 IST

संपूर्ण गोवंश हत्याबंदी आणि मांस निर्यात बंदी या दोन मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सत्याग्रह सुरू आहे.

सुगन बरंठ : नई तालीममध्ये कार्यकर्ता बैठकसेवाग्राम : संपूर्ण गोवंश हत्याबंदी आणि मांस निर्यात बंदी या दोन मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सत्याग्रह सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. आता केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्या मागण्या मान्य करण्यासाठी अहिंसा, अराजकीय व असांप्रदायिक तत्वावर सत्याग्रह सुरू असल्याचे गोवंश रक्षा अभियानचे डॉ. सुगन बरंठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नई तालीम समिती कार्यालयात गोवंश रक्षा अभियानच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, अण्णा जाधव, शंकर बगाडे, प्रसाद प्रशांत गुजर आदी उपस्थित होते. डॉ. बरंठ यांनी आॅगस्ट महिन्यात पवनार आश्रममध्ये बैठक झाली व दिल्लीत सत्याग्रह सुरू झाला. मुंबई येथे बांद्रा व देवनार कत्तल खान्याजवळ संपूर्ण गोवंश हत्या बंदीसाठी ३३ वर्षे ३ महिने सत्याग्रह पू. विनोबाजींच्या विचार व तत्वानुसार झाला. राज्य शासनाने कायदा केल्याने गोवंश प्रेमी तसेच कृषी व्यवस्था व अर्थव्यवस्थेचा अभ्यासकांना दिलासा मिळाला; पण केंद्र शासनाचे काय, असा प्रश्न निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. गांधी, विनोबांची भूमिका समाज वैकल्पिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची आहे. उच्चस्तरीय समितीत ज्येष्ठ गांधीवादी माजी कुलपती डॉ. रामजीसिंग, खुदाई खिदमदगारचे फैजल खान, महाविर त्यागी, अशोक शरण, राजस्थानच्या आशा बोभ्रा, आश्रम प्रतिष्ठान अध्यक्ष जयवंत मठकर आदींचा समावेश असल्याचे डॉ. बरंठ यांनी सांगितले.(वार्ताहर)