शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

संत गाडगेबाबा यांची पालखी आज जिल्ह्यात

By admin | Updated: November 12, 2016 01:15 IST

संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश राज्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने

स्वच्छता मिशन : २५ गावांत करणार जागरवर्धा : संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश राज्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संत गाडगेबाबा पालखीचे आगमन जिल्ह्यात शनिवारी सेलू तालुक्यातील हिंगणी येथे होणार आहे. सदर पालखी १२ व १३ नोव्हेंबर अशी दोन दिवस जिल्ह्यातील सेलू, वर्धा, समुद्रपूर, हिंगणघाट व देवळी तालुक्यातील अनेक गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने पालखीच्या आगमनाची तयारी करण्यात आली आहे.स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीमधून जागोजागी अनेक गावांमध्ये जाऊन प्रबोधन केले, जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले, त्या गाडीचे पालखीत रूपांतर केले आहे. शासनाने २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियानाचा एक उपक्रम म्हणून राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर पालखी राज्यातील अनेक जिल्ह्यामधून मार्गक्रमण करीत आहे. नागपूर जिल्ह्यातून या पालखीचे वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत हिंगणी येथे आगमन होत आहे. हिंगणी येथून ही पालखी मोई, घोराड, जयपूर, खडका, चानकी (कोपरा), हमदापूर आदी गावामधून समुद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, देवळी तालुक्यातील गावांमधून मार्र्गक्रमण करीत यवतमाळ जिल्ह्यात दाखल जाणार होईल, अशी माहिती विभागाने दिली.(जिल्हा प्रतिनिधी)