शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

संत गाडगेबाबा यांची पालखी आज जिल्ह्यात

By admin | Updated: November 12, 2016 01:15 IST

संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश राज्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने

स्वच्छता मिशन : २५ गावांत करणार जागरवर्धा : संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश राज्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संत गाडगेबाबा पालखीचे आगमन जिल्ह्यात शनिवारी सेलू तालुक्यातील हिंगणी येथे होणार आहे. सदर पालखी १२ व १३ नोव्हेंबर अशी दोन दिवस जिल्ह्यातील सेलू, वर्धा, समुद्रपूर, हिंगणघाट व देवळी तालुक्यातील अनेक गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने पालखीच्या आगमनाची तयारी करण्यात आली आहे.स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीमधून जागोजागी अनेक गावांमध्ये जाऊन प्रबोधन केले, जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले, त्या गाडीचे पालखीत रूपांतर केले आहे. शासनाने २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियानाचा एक उपक्रम म्हणून राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर पालखी राज्यातील अनेक जिल्ह्यामधून मार्गक्रमण करीत आहे. नागपूर जिल्ह्यातून या पालखीचे वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत हिंगणी येथे आगमन होत आहे. हिंगणी येथून ही पालखी मोई, घोराड, जयपूर, खडका, चानकी (कोपरा), हमदापूर आदी गावामधून समुद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, देवळी तालुक्यातील गावांमधून मार्र्गक्रमण करीत यवतमाळ जिल्ह्यात दाखल जाणार होईल, अशी माहिती विभागाने दिली.(जिल्हा प्रतिनिधी)