शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

प्रगत शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान संजीवनी

By admin | Updated: September 26, 2016 02:19 IST

भारत हा कृषीप्रदान देश आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या ६२ टक्के आहे.

प्रकाश महाराज वाघ : चर्चासत्रात राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेवर भरआष्टी (श.) : भारत हा कृषीप्रदान देश आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या ६२ टक्के आहे. शेतीला बदलत्या वातावरणाप्रमाणे अद्ययावत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची संजीवनी आवश्यक आहे. त्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेली प्रत्येक ओवी आज सार्थ ठरते, असे मत गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले. वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन सहकारी संस्था तळेगाव (श्या.पं.) यांच्यावतीने ‘राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील शेतकरी व शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार विजय मुडे तर अतिथी म्हणून अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिर्री गावाचे नागरिक अरुण विधळे, महाआॅरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, कुक्कुटपालन संस्थेचे अध्यक्ष राहुल ठाकरे, उपाध्यक्ष विनायक धोंगडी, शरद पाराशर, अप्सर खा पठाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी आष्टी तालुक्यातील शिर्री येथील शेतकरी पूत्र अरुण विधळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याता आला. विधळे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रशासकीय सेवा मिळते. तेव्हा जीवनभर प्रामाणिक सेवाव्रत कायम ठेवण्याची प्रेरणाही मिळते. जीवनात जिद्द, चिकाटी, साहसी वृत्ती आणि प्रामाणिकपणा या चतुसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुडे यांनी तळेगाव कुक्कुटपालन संस्था संपूर्ण राज्यात प्रथम असून तिला मिळालेला पुरस्कार ठाकरे कुटुंबियांचे परिश्रम असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल ठाकरे यांनी केले. संचालन अनिल निस्ताने यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद पाराशर यांनी मानले. चर्चासत्राला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)