शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

प्रगत शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान संजीवनी

By admin | Updated: September 26, 2016 02:19 IST

भारत हा कृषीप्रदान देश आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या ६२ टक्के आहे.

प्रकाश महाराज वाघ : चर्चासत्रात राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेवर भरआष्टी (श.) : भारत हा कृषीप्रदान देश आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या ६२ टक्के आहे. शेतीला बदलत्या वातावरणाप्रमाणे अद्ययावत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची संजीवनी आवश्यक आहे. त्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेली प्रत्येक ओवी आज सार्थ ठरते, असे मत गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले. वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन सहकारी संस्था तळेगाव (श्या.पं.) यांच्यावतीने ‘राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील शेतकरी व शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार विजय मुडे तर अतिथी म्हणून अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिर्री गावाचे नागरिक अरुण विधळे, महाआॅरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, कुक्कुटपालन संस्थेचे अध्यक्ष राहुल ठाकरे, उपाध्यक्ष विनायक धोंगडी, शरद पाराशर, अप्सर खा पठाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी आष्टी तालुक्यातील शिर्री येथील शेतकरी पूत्र अरुण विधळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याता आला. विधळे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रशासकीय सेवा मिळते. तेव्हा जीवनभर प्रामाणिक सेवाव्रत कायम ठेवण्याची प्रेरणाही मिळते. जीवनात जिद्द, चिकाटी, साहसी वृत्ती आणि प्रामाणिकपणा या चतुसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुडे यांनी तळेगाव कुक्कुटपालन संस्था संपूर्ण राज्यात प्रथम असून तिला मिळालेला पुरस्कार ठाकरे कुटुंबियांचे परिश्रम असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल ठाकरे यांनी केले. संचालन अनिल निस्ताने यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद पाराशर यांनी मानले. चर्चासत्राला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)