शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पावसामुळे पिकांना संजीवनी

By admin | Updated: September 4, 2016 00:37 IST

तीन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली होती. पाऊस वेळेत न आल्यास शेतकऱ्यांचा

शेतकऱ्यांत समाधान : पिके बहरलीआष्टी (श.) : तीन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली होती. पाऊस वेळेत न आल्यास शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशातच ३० आॅगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने सर्व पिकांना संजीवनी मिळाली आहे. कोमेजलेली पिके आता बहरत आहेत. यामुळे शेतकरी सुखावला आहे. यावर्षी सातत्याने दीड महिना हजेरी लावणाऱ्या पावसाने तीन आठवडे विश्रांती घेतली होती. सोयाबीन, भूईमुंग पिकासह अन्य पिके फुलासह पोषक अवस्थेत असताना कडक उन्हामुळे सोयाबीनसह भूईमुंग पिकांना पाण्याची नितांत गरज होती. पावसाअभावी पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली. तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या होत्या. उशीरा का होईना ३० आॅगस्टला मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला आणि शेतकरी सुखावला. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे. परिसरातील सर्व पिके बहरू लागली आहेत. केवळ पावसाअभावी वाया जाणारी पिके आता समाधानकारक दिसत असल्याने आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव उमटले आहेत. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन समस्या निकाली काढली होती; पण सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी पाण्याचा तीन आठवड्याचा खंड पाहून चिंतीत झाले होते. येथील चुनखडीयुक्त जमीन असल्याने परिसरात पाण्याची नितांत गरज होती. ती गरज मंगळवारी आलेल्या जोरदार पावसाने पूर्ण केली. यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातात आला आहे. पूढे पिके घरी येईपर्यंत काय होणार, हे सांगता येत नसले तरी या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापुढे पावसाने अधून -मधून हजेरी लावली तर अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली घट भरून निघू शकते, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.(तालुका प्रतिनिधी)