शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पावसामुळे पिकांना संजीवनी

By admin | Updated: September 4, 2016 00:37 IST

तीन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली होती. पाऊस वेळेत न आल्यास शेतकऱ्यांचा

शेतकऱ्यांत समाधान : पिके बहरलीआष्टी (श.) : तीन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली होती. पाऊस वेळेत न आल्यास शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशातच ३० आॅगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने सर्व पिकांना संजीवनी मिळाली आहे. कोमेजलेली पिके आता बहरत आहेत. यामुळे शेतकरी सुखावला आहे. यावर्षी सातत्याने दीड महिना हजेरी लावणाऱ्या पावसाने तीन आठवडे विश्रांती घेतली होती. सोयाबीन, भूईमुंग पिकासह अन्य पिके फुलासह पोषक अवस्थेत असताना कडक उन्हामुळे सोयाबीनसह भूईमुंग पिकांना पाण्याची नितांत गरज होती. पावसाअभावी पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली. तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या होत्या. उशीरा का होईना ३० आॅगस्टला मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला आणि शेतकरी सुखावला. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे. परिसरातील सर्व पिके बहरू लागली आहेत. केवळ पावसाअभावी वाया जाणारी पिके आता समाधानकारक दिसत असल्याने आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव उमटले आहेत. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन समस्या निकाली काढली होती; पण सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी पाण्याचा तीन आठवड्याचा खंड पाहून चिंतीत झाले होते. येथील चुनखडीयुक्त जमीन असल्याने परिसरात पाण्याची नितांत गरज होती. ती गरज मंगळवारी आलेल्या जोरदार पावसाने पूर्ण केली. यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातात आला आहे. पूढे पिके घरी येईपर्यंत काय होणार, हे सांगता येत नसले तरी या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापुढे पावसाने अधून -मधून हजेरी लावली तर अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली घट भरून निघू शकते, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.(तालुका प्रतिनिधी)