शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पर्यावरण अनुमतीमुळे रखडले वाळूघाटांचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

राज्यभरात वाळूघाटांचे लिलाव झाले नसले तरीही अवैधरीत्या वारेमाप वाळूचा उपसा सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाचीही दमछाक होत आहे. अवैधरीत्या वाळू उपसा करून वाळूमाफिया दामदुपटीने ग्राहकांना विकत आहे. त्यामुळे बांधकामाचेही आर्थिक बजेट बिघडत असल्याने अनेकांनी कामांना थांबा दिला आहे.

ठळक मुद्देअवैध उपसा सुरूच : दामदुप्पट दरामुळे बांधकामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन वाळू निर्गती धोरणानुसार यावर्षी राज्यातील सर्वच जिल्ह्यांनी वाळूघाटांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर लवकरच वाळूघाटांचे लिलाव होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, मार्च महिना उजाडला तरीही वाळूघाटांच्या लिलावाकरिता निकषांअभावी पर्यावरणाची अनुमती प्रलंबित असल्याने घाटांचे लिलाव रखडले आहे. त्यामुळे शासकीय बांधकामासह खासगी बांधकामालाही थांबा देण्यात आला आहे.राज्यभरात वाळूघाटांचे लिलाव झाले नसले तरीही अवैधरीत्या वारेमाप वाळूचा उपसा सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाचीही दमछाक होत आहे. अवैधरीत्या वाळू उपसा करून वाळूमाफिया दामदुपटीने ग्राहकांना विकत आहे. त्यामुळे बांधकामाचेही आर्थिक बजेट बिघडत असल्याने अनेकांनी कामांना थांबा दिला आहे. मार्च एंन्डिग असल्यामुळे शासकीय कामांना गती देण्याची गरज असतानाच वाळूअभावी शासकीय बांधकामेही रखडली आहेत. वाळूअभावी इमारत बांधकाम रखडल्याने कंत्राटदार, बांधकाम मजूर यांच्यावरही मोठे संकट ओढवले. अवैधरीत्या उपसा सुरू असल्याने आधीच वाळू घाट घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातही घाट लिलाव होईपर्यंत महसूल विभागाने मोजमाप केला तेवढाही साठा शिल्लक राहील की नाही, ही शंकाच आहे. लिलावाला उशीर झाला तर यात शासनाचाही महसूल बुडण्याची शक्यता असल्याने वाळू घाटांचा लिलाव करण्याची मागणी होत आहे.एक वर्षासाठी मिळणार वाळूघाटनवीन वाळू निर्गती धोरणानुसार वाळूघाटांचा पाच वर्षांकरिता लिलाव करण्याचे ठरविण्यात आले होते. याकरिता वाळूघाटांचे क्षेत्र पाच हेक्टरपर्यंत असणे आवश्यक आहे. या नव्या नियमानुसार तालुकास्तरीय तांत्रिक समित्यांद्वारे वाळूघाटांचे सर्वेक्षण व घाटांचे एकत्रीकरण करण्यात आले. मात्र, बहुतांश जिल्ह्यामध्ये एकत्रीकरण केल्यानंतरही पाच हेक्टरपर्यंत वाळूघाट जात नसल्याने एक वर्षाकरिताच लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, अद्याप लिलावाकरिता आवश्यक असलेल्या पर्यावरणाच्या अनुमती प्रलंबित असल्याने वाळू घाटांच्या लिलावकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात तालुकास्तरीय तांत्रिक समित्यांद्वारे प्रत्येक तालुक्यातील वाळूघाटांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही घाटांचे एकत्रीकरण करून उत्खननाकरिता योग्य असलेल्या वाळूघाटांचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. आता पर्यावरण अनुमती प्राप्त होताच वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया राबविली जाईल.- डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.