शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण अनुमतीमुळे रखडले वाळूघाटांचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

राज्यभरात वाळूघाटांचे लिलाव झाले नसले तरीही अवैधरीत्या वारेमाप वाळूचा उपसा सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाचीही दमछाक होत आहे. अवैधरीत्या वाळू उपसा करून वाळूमाफिया दामदुपटीने ग्राहकांना विकत आहे. त्यामुळे बांधकामाचेही आर्थिक बजेट बिघडत असल्याने अनेकांनी कामांना थांबा दिला आहे.

ठळक मुद्देअवैध उपसा सुरूच : दामदुप्पट दरामुळे बांधकामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन वाळू निर्गती धोरणानुसार यावर्षी राज्यातील सर्वच जिल्ह्यांनी वाळूघाटांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर लवकरच वाळूघाटांचे लिलाव होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, मार्च महिना उजाडला तरीही वाळूघाटांच्या लिलावाकरिता निकषांअभावी पर्यावरणाची अनुमती प्रलंबित असल्याने घाटांचे लिलाव रखडले आहे. त्यामुळे शासकीय बांधकामासह खासगी बांधकामालाही थांबा देण्यात आला आहे.राज्यभरात वाळूघाटांचे लिलाव झाले नसले तरीही अवैधरीत्या वारेमाप वाळूचा उपसा सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाचीही दमछाक होत आहे. अवैधरीत्या वाळू उपसा करून वाळूमाफिया दामदुपटीने ग्राहकांना विकत आहे. त्यामुळे बांधकामाचेही आर्थिक बजेट बिघडत असल्याने अनेकांनी कामांना थांबा दिला आहे. मार्च एंन्डिग असल्यामुळे शासकीय कामांना गती देण्याची गरज असतानाच वाळूअभावी शासकीय बांधकामेही रखडली आहेत. वाळूअभावी इमारत बांधकाम रखडल्याने कंत्राटदार, बांधकाम मजूर यांच्यावरही मोठे संकट ओढवले. अवैधरीत्या उपसा सुरू असल्याने आधीच वाळू घाट घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातही घाट लिलाव होईपर्यंत महसूल विभागाने मोजमाप केला तेवढाही साठा शिल्लक राहील की नाही, ही शंकाच आहे. लिलावाला उशीर झाला तर यात शासनाचाही महसूल बुडण्याची शक्यता असल्याने वाळू घाटांचा लिलाव करण्याची मागणी होत आहे.एक वर्षासाठी मिळणार वाळूघाटनवीन वाळू निर्गती धोरणानुसार वाळूघाटांचा पाच वर्षांकरिता लिलाव करण्याचे ठरविण्यात आले होते. याकरिता वाळूघाटांचे क्षेत्र पाच हेक्टरपर्यंत असणे आवश्यक आहे. या नव्या नियमानुसार तालुकास्तरीय तांत्रिक समित्यांद्वारे वाळूघाटांचे सर्वेक्षण व घाटांचे एकत्रीकरण करण्यात आले. मात्र, बहुतांश जिल्ह्यामध्ये एकत्रीकरण केल्यानंतरही पाच हेक्टरपर्यंत वाळूघाट जात नसल्याने एक वर्षाकरिताच लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, अद्याप लिलावाकरिता आवश्यक असलेल्या पर्यावरणाच्या अनुमती प्रलंबित असल्याने वाळू घाटांच्या लिलावकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात तालुकास्तरीय तांत्रिक समित्यांद्वारे प्रत्येक तालुक्यातील वाळूघाटांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही घाटांचे एकत्रीकरण करून उत्खननाकरिता योग्य असलेल्या वाळूघाटांचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. आता पर्यावरण अनुमती प्राप्त होताच वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया राबविली जाईल.- डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.