शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

वाळू चोरट्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्याची कपाशी लोळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात दोन नद्यांचा संगम असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यावर वायगाव, वर्धा, देवळी, सालोड व सावंगी येथील वाळू चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी पात्राला पोखरणे सुरु केले आहे. नदीपात्रातून शेतशिवारात जाणारा रस्ता पोखरण्यासोबतच पांदण रस्त्यावरुनही नदीपात्रापर्यंत जाण्याकरिता चोरटा मार्ग तयार केला आहे.

ठळक मुद्देअडीच एकरांतून केला रस्ता : सोनेगाव (बाई) येथील प्रकार, तहसील कार्यालयाच्या आशीर्वादाने चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुुक्यातील सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदी पात्रात वाळू चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे तक्रार करुनही योग्य कारवाई होत नसल्याने निर्ढावलेल्या वाळू चोरट्यांनी नदीपात्रालगतच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची अडीच एकरातील कपाशी लोळवून तेथून मार्ग काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने याची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात दोन नद्यांचा संगम असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यावर वायगाव, वर्धा, देवळी, सालोड व सावंगी येथील वाळू चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी पात्राला पोखरणे सुरु केले आहे. नदीपात्रातून शेतशिवारात जाणारा रस्ता पोखरण्यासोबतच पांदण रस्त्यावरुनही नदीपात्रापर्यंत जाण्याकरिता चोरटा मार्ग तयार केला आहे. त्याकरिता शेतातील पिकांचेही नुकसान होत आहे.नदीपात्रालगत विठ्ठल इवनाथे यांचे अडीच एक शेत आहे. त्यांच्या शेतात कपाशीची लागवड केली असून या पिकातून वाळूचे वाहने नेऊन रस्ता तयार केला आहे.त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी त्यांनी तहसील कार्यालयाकडेही तक्रार केली आहे. रात्री ११ वाजतापासून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी राहत असून सकाळी ५ वाजतापर्यंत अवैध उपसा चालतो. गावकºयांनी हटकले असता त्यांच्या अंगावर चाल करुन जातात किंवा तुम्हाला ज्यांच्याकडे तक्रार करायची ते करा,अधिकारी आमच्या खिशात असल्याच्या बाता करतात. त्यामुळे नागरिकांचाही नाईलाच आहे.मात्र दिवसेंदिवस वाळू चोरट्यांचा त्रास वाढत असल्याने याचा तत्काळ बंदोबस्त करा अन्यथा शेतकºयांच्या होणाºया नुकसानीची भरपाई तहसील कार्यालयाने द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.गावकऱ्यांना अधिकाऱ्यांचा ‘नो रिस्पॉन्स’याच वाळू घाटात वरिष्ठांच्या सूचनेनंतर देवळी तहसीलदारांनी कारवाई करीत दहा ते बारा दिवसांपूर्वी चार ट्रक व एक जेसीबी जप्त केला होता. कारवाई होताच दुसऱ्या दिवसापासून जैसे थेच अवस्था असल्याने गावकरी विचारात पडले आहे. दररोज रात्रभर अवैध उपसा चालत असल्याने नागरिक तहसील कार्यालयातील वरिष्ठांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधतात पण; प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचीही या वाळू माफीयांना मूक संमती असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तत्काळ दखल घेत कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :sandवाळू