शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

वाळू चोरट्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्याची कपाशी लोळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात दोन नद्यांचा संगम असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यावर वायगाव, वर्धा, देवळी, सालोड व सावंगी येथील वाळू चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी पात्राला पोखरणे सुरु केले आहे. नदीपात्रातून शेतशिवारात जाणारा रस्ता पोखरण्यासोबतच पांदण रस्त्यावरुनही नदीपात्रापर्यंत जाण्याकरिता चोरटा मार्ग तयार केला आहे.

ठळक मुद्देअडीच एकरांतून केला रस्ता : सोनेगाव (बाई) येथील प्रकार, तहसील कार्यालयाच्या आशीर्वादाने चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुुक्यातील सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदी पात्रात वाळू चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे तक्रार करुनही योग्य कारवाई होत नसल्याने निर्ढावलेल्या वाळू चोरट्यांनी नदीपात्रालगतच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची अडीच एकरातील कपाशी लोळवून तेथून मार्ग काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने याची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात दोन नद्यांचा संगम असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यावर वायगाव, वर्धा, देवळी, सालोड व सावंगी येथील वाळू चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी पात्राला पोखरणे सुरु केले आहे. नदीपात्रातून शेतशिवारात जाणारा रस्ता पोखरण्यासोबतच पांदण रस्त्यावरुनही नदीपात्रापर्यंत जाण्याकरिता चोरटा मार्ग तयार केला आहे. त्याकरिता शेतातील पिकांचेही नुकसान होत आहे.नदीपात्रालगत विठ्ठल इवनाथे यांचे अडीच एक शेत आहे. त्यांच्या शेतात कपाशीची लागवड केली असून या पिकातून वाळूचे वाहने नेऊन रस्ता तयार केला आहे.त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी त्यांनी तहसील कार्यालयाकडेही तक्रार केली आहे. रात्री ११ वाजतापासून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी राहत असून सकाळी ५ वाजतापर्यंत अवैध उपसा चालतो. गावकºयांनी हटकले असता त्यांच्या अंगावर चाल करुन जातात किंवा तुम्हाला ज्यांच्याकडे तक्रार करायची ते करा,अधिकारी आमच्या खिशात असल्याच्या बाता करतात. त्यामुळे नागरिकांचाही नाईलाच आहे.मात्र दिवसेंदिवस वाळू चोरट्यांचा त्रास वाढत असल्याने याचा तत्काळ बंदोबस्त करा अन्यथा शेतकºयांच्या होणाºया नुकसानीची भरपाई तहसील कार्यालयाने द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.गावकऱ्यांना अधिकाऱ्यांचा ‘नो रिस्पॉन्स’याच वाळू घाटात वरिष्ठांच्या सूचनेनंतर देवळी तहसीलदारांनी कारवाई करीत दहा ते बारा दिवसांपूर्वी चार ट्रक व एक जेसीबी जप्त केला होता. कारवाई होताच दुसऱ्या दिवसापासून जैसे थेच अवस्था असल्याने गावकरी विचारात पडले आहे. दररोज रात्रभर अवैध उपसा चालत असल्याने नागरिक तहसील कार्यालयातील वरिष्ठांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधतात पण; प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचीही या वाळू माफीयांना मूक संमती असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तत्काळ दखल घेत कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :sandवाळू